शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
2
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
3
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
4
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
5
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
6
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
7
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
8
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
9
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
10
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
11
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
12
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
13
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
14
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
15
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
16
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
17
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
18
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
19
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
Daily Top 2Weekly Top 5

आपद्ग्रस्त ५५ कुटुंबांची सरकारकडून १३ वर्षे अवहेलना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2018 02:46 IST

महाड आणि पोलादपूर तालुक्यांतील दरडग्रस्त गावांत अतिवृष्टीमुळे २००५मध्ये भूस्खलन झाले होते.

- जयंत धुळप अलिबाग : महाड आणि पोलादपूर तालुक्यांतील दरडग्रस्त गावांत अतिवृष्टीमुळे २००५मध्ये भूस्खलन झाले होते. या वेळी अनेक ग्रामस्थ मृत्युमुखी पडले, तर काही बेपत्ता झाले, अनेकांची राहती घरे दरडीखाली गाडली गेली होती. पोलादपूर तालुक्यातील कोंढवी आणि कोतवाल खुर्द या दोन गावांतही भूस्खलन झाले होते. कोंढवी गावात २९ तर कोतवाल खुर्द गावात २६ कुटुंबे अशी एकूण ५५ कुटुंबे या वेळी बेघर झाली होती. या कुटुंबांची राज्य सरकारकडून तब्बल १३ वर्षे अवहेलना सुरू असून त्यांना अद्याप हक्काचे घर मिळाले नसल्याचे वास्तव ‘लोकमत’च्या हाती आले आहे.नैसर्गिक आपत्तीनंतर रायगडचे तत्कालीन जिल्हाधिकारी भास्कर वानखेडे आणि जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाचे तत्कालीन प्रमुख निवासी उप जिल्हाधिकारी संजय यादव यांनी आर्थिक साहाय्य आणि मदतीचे आवाहन केले. त्यास देशातील अनेक संस्था, कंपन्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्या वेळी मुंबईतील प्रभादेवी येथील सुप्रसिद्ध श्री सिद्धिविनायक न्यासाने सहकार्याचा मोठा हात पुढे केला. पोलादपूर तालुक्यातील कोंढवी आणि कोतवाल खुर्द या दोन गावांत प्रत्येकी १५ अशी एकूण ३० घरे अवघ्या दीड महिन्यांत बांधून दिली.कोंढवी गावात २९ आपद्ग्रस्त कुटुंबांकरिता १५ आणि कोतवाल खु. गावातील २६ आपद्ग्रस्त कुटुंबांकरिता १५ अशी घरे बांधल्यावर कोणत्या १५ आपद्ग्रस्तांना घर द्यायची, असा प्रश्न या उभय गावांमध्ये निर्माण झाला. त्या वेळी तत्कालीन महाड उप विभागीय महसूल अधिकाऱ्यांनी कोंढवी गावाकरिता लॉटरी पद्धतीने १५ कुटुंबांची निवड केली. निवडलेल्या १५ आपद्ग्रस्त कुटुंबांपैकी पाच कुटुंबे प्रारंभी त्या नव्या घरात राहायला गेली. मात्र, कालांतराने ती पुन्हा आपल्या मूळ गावात आली. सद्यस्थितीत गंगाराम काळू यादव हे एकमेव त्या १५ घरांपैकी एका घरात राहत असल्याची माहिती तहसीलदार जाधव यांनी दिली. म्हणजे उर्वरित २९ घरे १३ वर्षे विनावापर पडून आहेत आणि २८ आपद्ग्रस्त कुटुंबे आजही धोक्याच्या छायेतील कोंढवी गावातच राहत आहेत. कोतवाल खु. गावातही अशीच परिस्थिती आहे. २००५च्या अतिवृष्टी आणि भूस्खलन नैसर्गिक आपत्तीमधील पात्र आपद्ग्रस्त कुटुंबे २६ आहेत आणि श्री सिद्धिविनायक न्यासाच्या सहकार्याने बांधण्यात आलेली नवी घरे १५ आहेत. येथे देखील लॉटरी काढण्यात आली मात्र, सर्वांना एकाच वेळी घरे द्या, अशी मागणी करून आपद्ग्रस्त २६ पैकी २५ कुटुंबे नव्या घरात स्थलांतरित झाली नाहीत. केवळ रामाजी ढेबे हे एकमेव नव्या घरात राहत आहेत.>जमीन देणारे शेतकरीही मोबदल्याच्या प्रतीक्षेत१३ वर्षांत दोन्ही गावांतील ५५ कुटुंबांची सरकारच्या निष्क्रियतेमुळे अवहेलना सुरू आहे. श्री सिद्धिविनायक न्यासाने केवळ लाखो रुपये खर्चून बांधून दिलेली घरे विनावापर पडून राहिल्याने आता घरांचीही वाताहात झाली आहे.त्याचबरोबर २००५ मध्ये ही ३० घरे बांधण्याकरिता सरकारी जमीन उपलब्ध नसल्याने कोंढवी गावातील दोन, तर कोतवाल गावातील चार शेतकºयांनी आपली कसती भातशेती अत्यल्प दराने सरकारला दिली.परंतु या सहा शेतकºयांना त्यांच्या जमिनीचे सरकारी दराने मिळणारे अपेक्षित पैसे अद्याप मिळाले नसल्याचे कोतवाल खुर्द ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अविनाश शिंदे यांनी सांगितले.पोलादपूर तालुक्यातील कोंढवी आणि कोतवाल खु. या दोन्ही गावांना आजही भूस्खलनाचा धोका आहे. कोंढवी गावची ६८०, तर कोतवाल खु. गावची ७५९ लोकसंख्या असून, ग्रामस्थांनी स्थलांतरित होणे सुरक्षेच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे. मात्र, या दोन्ही गावांतील ग्रामस्थांनी स्थलांतरित होण्यास नकार दिला आहे. तीव्र भूस्खलन धोकाग्रस्त कोंढवी आणि कोतवाल खुर्द या दोन्ही गावांत प्रत्यक्ष जाऊन ग्रामस्थांशी चर्चा करून, संबंधित अहवाल जिल्हाधिकाºयांकडे पाठविला आहे.- शिवाजी जाधव, तहसीलदार, पोलादपूर