शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

उरण परिसराला प्रदूषणाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 01:41 IST

वाढते औद्योगिकीकरण आणि तेल, रासायनिक कंपन्यांमुळे उरण परिसराला प्रदूषणाचा विळखा बसला आहे.

मधुकर ठाकूरउरण : वाढते औद्योगिकीकरण आणि तेल, रासायनिक कंपन्यांमुळे उरण परिसराला प्रदूषणाचा विळखा बसला आहे. या वाढत्या प्रदूषणाकडे महाराष्ट्र प्रदूषण मंडळही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने परिसरातील हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.मागील ३५ वर्षांपासून उरण परिसरात औद्योगिकीकरणाला सुरुवात झाली आहे. जेएनपीटी, ओएनजीसी, नौदलाचे शस्त्रागार, वायू विद्युत केंद्र, बीपीसीएल या केंद्र-राज्य शासनाच्या अखत्यारित असलेल्या विविध प्रकल्पांवर आधारित अनेक छोट्या-मोठ्या कंपन्या उभारण्यात आल्या आहेत. जेएनपीटी परिसरात तर ५०० हेक्टर क्षेत्रात मोठमोठे रासायनिक प्रकल्प उभारण्यात आले आहेत, तर आणखी उभारले जात आहेत. मात्र, बंदरातील जहाज वाहतूक, तेल आणि रासायनिक कंपन्यांमुळे परिसरात जल, वायुप्रदूषण वाढले आहे.जेएनपीटी आणि या बंदरावर आधारित असलेल्या अन्य दोन बंदरातून दरवर्षी सुमारे ५० लाख कंटेनर मालाची जहाजातून वाहतूक केली जाते. चौथे बंदर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर कंटेनर हाताळणीची क्षमता एक कोटीच्या घरात पोहोचणार आहे. मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या कंटेनर मालाच्या आयात-निर्यातीसाठी जगभरातून मालवाहू जहाजे जेएनपीटी बंदरात येत असतात. जहाजातून केरकचरा, वापरून झालेले काळे तेल बंदी असतानाही चोरीछुपे समुद्रात सोडले जाते, त्यामुळे समुद्रात जलप्रदूषण होत आहे. परिसरातील रासायनिक कंपन्यांमधून सोडण्यात येणाºया प्रदूषित रसायनमिश्रित सांडपाण्यावर कोणत्याही प्रकारची रासायनिक प्रक्रिया न करताच नाल्यात सोडले जाते. रसायनमिश्रित दूषित सांडपाणी नाल्यातून समुद्र, खाड्यांत मिसळत असल्यानेही जलप्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. ओएनजीसी प्रकल्पातून हायड्रोजन सल्फाइड (एचटूओ) हा विषारी वायू हवेत सोडला जात असल्याने लगतच्या गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हा वायू हवेपेक्षा जड असल्याने खालीच राहतो, त्यामुळे नागाव, म्हातवली, उरण, चाणजे, केगाव आदी गावातील नागरिकांना श्वसनाच्या अनेक व्याधीने ग्रासले आहे.प्रदूषणाचा फटका परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या बोअरवेल आणि विहिरींनाही बसला आहे. विहीर आणि बोअरवेलच्या पाण्याला उग्र दर्प येत असून, पाण्यावर तेलतवंग दिसू लागल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. डोंगरातून येणारे पाण्याचे झरेही दूषित झाले आहेत, त्यामुळे नागाव-म्हातवली परिसरातील विहिरी, बोअरवेल दूषित झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. प्रदूषणाला आळा घालण्यासाठी झाडे लावण्याचा खटाटोप कंपन्या आणि प्रकल्पांकडून केला जात असला तरी झाडे लावण्याचे आणि जगविण्याचे प्रमाण फारच कमी आहे. मागील अनेक वर्षांपासून विकासाच्या नावाखाली दगड-मातीच्या भरावासाठी डोंगर पोखरून भुईसपाट केले आहेत, त्यामुळे झाडे, झुडपे, वनराईच नष्ट झाली आहे. त्याचा दुष्परिणामही प्रदूषणवाढीत झाला आहे. जलप्रदूषणामुळे समुद्र, खाड्यांतील मासेमारीही संकटात सापडली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळही परिसरातील वाढत्या प्रदूषणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.महिनाभरापूर्वीच माझी याठिकाणी नियुक्ती झाली आहे. संबंधित प्रकाराची चौकशी करून त्यानुसार दोषी कारखान्यांवर कारवाई करण्यात येईल.- राहुल मोटे,उपप्रादेशिक अधिकारी,महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळ

टॅग्स :pollutionप्रदूषणRaigadरायगड