शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
4
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
5
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
6
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
7
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
8
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
10
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
11
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
12
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
13
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
14
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
15
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
16
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
17
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
18
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
19
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
20
९ मे रोजी सुरू होत आहे वैशाख मास; रखरखीत उन्हाळ्यातही तो का ठरतो खास? वाचा!

कोरोनाच्या भीतीने लसीसाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 12:22 AM

महाड तालुक्यात रुग्णसंख्येत वाढ : दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीसाठी रांग 

लोकमत न्यूज नेटवर्कदासगाव : महाड तालुक्यात सध्या कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कोरोनाच्या भीतीने महाड तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने लसीकरणासाठी प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये धाव घेताना दिसून येत आहेत. मात्र लसीचा तुटवडा असल्याने नागरिकांना विनालस परत जावे लागत आहे.सध्या संपूर्ण महाराष्ट्रात करोनाने हाहाकार माजवला आहे. दर दिवस हा आकडा हजारोंच्या संख्येने वाढत चालला आहे. त्याचप्रमाणे महाड तालुक्यातदेखील दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. सुरवातीला लसीकरणाबाबत कोणीही गांभीर्याने विचार केला नाही. मात्र जसजशी करोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये वाढ होत गेली तशी नागरिकांमध्ये भीती निर्माण झाल्याने, महाड तालुक्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रावर लसीकरणासाठी नागरिकांनी धाव घेण्यास सुरुवात केली आहे.सध्या महाड तालुक्यात लशींचा तुटवडा निर्माण झाला आहे. येणारी लस ही एक तासात संपून जात असल्याचे चित्र दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रावर पहावयास मिळत आहे. लशींचे शंभर डोस असताना सकाळी ७ वाजल्या पासूनच दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शेकडो लोकांच्या रांगाच रांगा लागत आहेत. डॉक्टरांच्या समोर लस किती जणांना द्यायची हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात झालेल्या लसीकरणामध्ये शंभर डोस असताना जवळपास तिनशे लोकांची रांग लागली होती. प्रत्येक जण आपल्याला कशा प्रकारे लस मिळेल या प्रयत्नात होता. लसीकरणासाठी महाड तालुक्यातून आणि शहरातून मोठ्या संख्येने नागरिक आल्याचे दिसून आले.अलिबाग कार्यालयात संपर्क साधला असता सध्या लस उपलबध नाही स्टॉक शून्य आहे. आज महाड तालुक्याला मोठ्या प्रमाणात लसीची गरज आहे. करोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. आशा परस्थितीत महाड तालुक्याला मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होणे गरजेचे आहे.  जिल्हा प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याबरोबरच जास्तच जास्त लसीचा साठा महाड तालुक्याला उपलबध करून देणे तेवढेच गरजेचे आहे.दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत २२ गावांचा समावेश आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. या केंद्रावर डॉक्टर आणि कर्मचारी वर्ग सक्षम आहे. नेटवर्कचा ही अडथळा येत नाही, लसीकरण वेगाने केले जाते त्यामुळे तालुक्यातील बहुतेक गावातील नागरिक लसीकरणासाठी दासगव प्राथमिक आरोग्य केंद्रावर येतात. महाड शहरातील नागरिकदेखील लसीकरणासाठी मोठ्या संख्येने येतात. मात्र दर वेळी लसींचा तुटवडा निर्माण होत असल्याने शेकडो नागरिकांना परत जावे लागते. सुरुवातीपासून आतापर्यंत दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रावर १३५० नागरिकांना लसीकरण करण्यात आले असले तरी जवळपास ३०००हून जास्त नागरिक या केंद्रावरून लस न घेता परत गेले आहेत. तरी जिल्हा प्रशासनाने या केंद्राचा विचार करत मोठ्या प्रमाणात लस उपलबध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस