शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
5
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
6
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
7
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
9
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
10
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
11
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
12
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
13
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
14
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
15
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
16
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
17
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
18
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
19
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान
20
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर

विहूर धरणातून दूषित पाणीपुरवठा, ग्रामस्थ त्रस्त : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांकडे तक्रार   

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2020 12:14 AM

Raigad News : या समस्येचे निराकरण व्हावे, यासाठी या ग्रामपंचायतीमधील सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी मंगळवारी रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता पारधी यांच्या दालनात भेट घेऊन ही समस्या सोडविण्याची विनंती केली.

मुरुड : तालुक्यातील विहूर धरणातून मजगाव,उसरोली, नांदगाव, विहूर अशा चार ग्रामपंचायतींना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. सुमारे ३६ हजारांपेक्षा जास्त लोकसंख्येला या धरणातून पाणीपुरवठा होत असतो. एकमेव व अतिशय महत्त्वाचे असे धरण आहे; परंतु गेल्या काही दिवसांपासून या धरणातून दुर्गंधीयुक्त व पिवळसर पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे या पाण्यामुळे असंख्य ग्रामस्थ त्रस्त झाले होते.या समस्येचे निराकरण व्हावे, यासाठी या ग्रामपंचायतीमधील सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी मंगळवारी रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता पारधी यांच्या दालनात भेट घेऊन ही समस्या सोडविण्याची विनंती केली. यावेळी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस.पी.वेंगुर्लेकर उपस्थित होते.यावेळी रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता पारधी यांनी विहूर धरणाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या अभियंत्यांना पाठवून परिस्थितीचे अवलोकन करावे, विहूर धरणातून दुर्गंधीयुक्त पाणी येते का याचा तपास करावा, या समस्या कायमस्वरूपी नष्ट होण्यासाठी नवीन अंदाज पत्रक बनवून आवश्यक त्याबाबी पूर्ण करून घ्याव्यात, पुन्हा अशी समस्या उद्भवणार नाही, याची दक्षता अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे आदेश यावेळी त्यांनी पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना दिले आहेत.यावेळी मजगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रीतम पाटील यांनी विहूर धरणातून मुख्य पुरवठा करणारी वाहिनी लोखंडी टाकण्यात  आली आहे. याशिवाय ज्या पाइपलाइनमधून धरणाच्या पाण्याचा पुरवठा होतो, तिथे कचरा अडकू नये, यासाठी जाळी बसवणे आवश्यक होते, परंतु असे न केल्यामुळे पाइपलाइनमध्ये कचरा अडकून दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत आहे. दोन वॉश आउट घेऊनही पाणी तसेच येत आहे. या ग्रामपंचायतींना पाण्याचा कोणताही स्रोत नाही. यासाठी विहूर धरणाची समस्या सोडवून द्यावी, अशी विनंती केली. उसरोली सरपंच मनीष नांदगावक यांनी, सध्या ग्रामपंचायतीच्या साठवण पाण्याच्या टाकीत टी.सी.एल टाकून पाणीपुरवठा करीत आहेत, परंतु आमचे प्रयत्न तोकडे पडत आहेत. तरी तातडीने उपाययोजना करण्याचे सांगितले.   जिल्हा परिषद अध्यक्षांना निवेदन देण्यात आले. यावेळी उसरोली सरपंच मनीष नांदगावकर, उपसरपंच महेश पाटील, मजगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रीतम पाटील, सदस्य अमित कोळी, नांदगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच अस्लम हलडे, सदस्य भाई सुर्वे, रमेश दिवेकर आदी मान्यवर उपस्थित होते. 

उपायाची मागणी  उसरोली सरपंच मनीष नांदगावक यांनी, सध्या ग्रामपंचायतीच्या साठवण पाण्याच्या टाकीत टी.सी.एल टाकून पाणीपुरवठा करीत आहेत, परंतु आमचे प्रयत्न तोकडे पडत आहेत. एकमेव हेच धरण चार ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा करणारे आहे, तरी तातडीने उपाययोजना करण्याचे सांगितले. या समस्येकडे ल देण्याची मागणी केली आहे. 

पाणीसमस्या सोडवण्यासाठी मी आपल्यासोबत असणार आहे. ग्रामपंचायतीमधील लोकांना शुद्ध पाणी मिळालेच पाहिजे, यासाठी जिल्हा परिषद आपल्यासोबत आहे.-योगिता पारधी, अध्यक्षा, जिल्हा परिषद  

टॅग्स :Raigadरायगड