शहरं
Join us  
Trending Stories
1
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
4
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
5
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
6
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
7
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
8
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
9
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
10
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
11
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
12
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
13
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
14
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
15
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
16
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
17
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
19
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
20
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं

जिल्ह्यातील ७८७ राजकीय बॅनर्स हटवले; पनवेलमध्ये सर्वाधिक ४२५ बॅनर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 11:43 PM

आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीवर भर

अलिबाग : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक जाहीर होताच पुढील २४ तासांत राजकीय पक्षांकडून लावण्यात आलेले बॅनर्स, जाहिराती, भित्तीपत्रके, पोस्टर्स, कटआऊट, होर्डिंग्ज, झेंडे काढून टाकणे अपेक्षित असते. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रातील ७८७ बॅनर्स व पोस्टर्स तत्काळ हटविण्यात आले आहेत.पनवेलमधून सर्वाधिक ४२५ बॅनर्स हटवण्यात आले आहेत, तर अलिबाग ३२,पेण २५, मुरुड ९, उरण ४६, कर्जत १२, खोपोली ३४, रोहा ५३, महाड ४६, श्रीवर्धन ५७, म्हसळा ९, माणगाव ६, खालापूर १२, तळा १३ आणि पोलादपूरमधून ८ बॅनर्स हटवण्यात आले आहेत. याशिवाय जिल्ह्यातील अन्य ठिकाणे व महामार्गावरील बॅनर्स हटवण्याचे काम सध्या सुरू असल्याची माहिती रायगडचे जिल्हाधिकारी तथा रायगड लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सोमवारी दिली. निवडणूक पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडावी यासाठी आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीवर भर दिला जाणार असल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले.रायगड लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी भरत शितोळे, निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, जिल्हा कोषागार अधिकारी फिरोज मुल्ला आदी अधिकारी उपस्थित होते.निवडणूक प्रचाराकरिता शासकीय संपत्तीचे विद्रूपीकरण व सार्वजनिक जागेचा गैरवापर, खासगी संपत्तीचे विद्रूपीकरण, शासकीय वाहनांचा दुरु पयोग, जाहिरात, शासकीय संकेतस्थळावरील राजकीय कार्यकर्त्यांचे फोटो प्रसिद्धी यास आचारसंहितेत बंदी करण्यात आली आहे. तसेच ज्या विकासकामांचे कार्यादेश निघून ती सुरू करण्यात आली आहेत, ती सुरू राहतील. मात्र जी विकासकामे प्रत्यक्षात सुरू झालेली नाही, ती आचारसंहिता संपेपर्यंत सुरू करता येणार नाहीत. यात अतितातडीच्या कामांचा समावेश असल्यास त्याबाबतचा निर्णय निवडणूक आयोगाकडून घेण्यात येणार आहे. आचारसंहिता लागू झाल्याने मतदार संघातील प्रचार सभांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथक तैनात आहे. आचारसंहितेच्या काटेकोर पालनावर पथकाचे लक्ष राहील.तक्रारींकरिता १९५० टोल फ्री क्रमांकतक्रार निवारण कक्ष २४ तास सुरू राहणार असून जिल्हा नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. त्याचबरोबर मतदारांना निवडणुकीच्या अनुषंगाने तक्रार करायची असल्यास, १९५० हा टोलफ्री दूरध्वनी क्रमांक २४ तास उपलब्ध आहे. निवडणूक शांततेत, निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी, तसेच मतदारांमध्ये जनजागृतीवर भर देण्यात येत आहे. पत्रकार परिषदेपूर्वी सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांची बैठक घेऊन निवडणूक कार्यक्र म व आचारसंहिता अंमलबजावणीसंदर्भात माहिती सूर्यवंशी यांनी दिली.रायगडमध्ये २३ एप्रिल रोजी मतदानरायगड लोकसभा मतदार संघात तिसऱ्या टप्प्यात निवडणूक होणार आहे. त्यानुसार गुरुवार २८ मार्च रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध होणार असून नामनिर्देशन पत्रे सादर करण्याची अंतिम तारीख ४ एप्रिल आहे. नामनिर्देशन पत्राची छाननी ५ एप्रिल रोजी तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ८ एप्रिल आहे. मतदान २३ एप्रिल होणार असून मतमोजणी २३ मे रोजी होणार आहे. निवडणूक प्रक्रि या पूर्ण करण्याचा कालावधी २७ मेपर्यंत असून तोपर्यंत आचारसंहिता लागू राहणार आहे.फ्लाईंग स्क्वॉड सज्जनिवडणूक खर्च व आचारसंहितेच्या अंमलबजावणीकरिता फ्लार्इंग स्कॉड तत्काळ कार्यान्वित करण्यात आले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभाग अवैध औषधे, नशिले पदार्थांच्या वाहतुकीसंदर्भात फ्लार्इंग स्क्वॉड तत्काळ कारवाईकरिता सज्ज आहे. निवडणुकीसंदर्भातील तक्र ारींकरिता यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. राजकीय जाहिरातींच्या प्रसारण पूर्व प्रमाणीकरणासाठी सर्व संबंधित राजकीय पक्ष ‘माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीकडे संपर्क करतील. त्यानुषंगाने आयोगाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे.

टॅग्स :alibaugअलिबाग