शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

मोठी दुर्घटना! महाडमधील तळीये गावात दरड कोसळली, ३५ जणांचा मृत्यू, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 13:37 IST

landslides in Talai village in Mahad: एकीकडे चिपळून महाडसारखी शहरे पुराच्या विळख्यात सापडली असताना कोकणातील डोंगर कपारीत वसलेल्या अनेक गावांमध्ये दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.

रायगड - गेल्या दोन तीन दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकणावर मोठे संकट आले आहे. एकीकडे चिपळून महाडसारखी शहरे पुराच्या विळख्यात सापडली असताना कोकणातील डोंगर कपारीत वसलेल्या अनेक गावांमध्ये दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. (landslides in Talai village in Mahad) महाडमधील तळीये गावातही अशीच मोठी दुर्घटना झाली असून, या दुर्घटनेत ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अद्याप अनेकजण जमिनीखाली दबले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.  (32 killed, many feared trapped under pile in Talai village in Mahad)

मिळत असलेल्या माहितीनुसार काल संध्याकाळी चारच्या रायगडमधील तळीये गावात दरड कोसळली. या दरडीच्या ढिगाऱ्याखाली गावातील सुमारे ३५ घरे गाडली जाऊन मोठी दुर्घटना घडली. मुसळधार पावसामुळे या दुर्घटनास्थळावर मदत पोहोचवणे शक्य झाले नाही. दरम्यान, स्थानिक ग्रामस्थांनीच मदतकार्य सुरू करून येथील गाडल्या गेलेल्या घरांमधून तब्बल ३२ मृतदेह बाहेर काढले आहेत. तर अद्यापही ८० ते ९० मृतदेह ढिगाऱ्याखाली दबले गेले असल्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.  

घटनास्थळी एनडीआरएफ, पाेलिस, स्थानिक प्रशासन आणि काही संस्थांची बचाव पथके युध्द पातळीवर मदत करत आहे, अशी माहिती रायगडचे जिल्हा पाेलिस अधिक्षक अशाेक दुधे यांनी लाेकमतशी बाेलताना दिली. जखमींनी हेलीकाॅप्टरच्या सहायाने बाहेर काढण्यात येत आहे.महाड सावित्री पुरातील नागरिकांना एका हेलीकाॅप्टरच्या सहायाने बाहेर काढण्यात येते आहे. प्रशासनाला आणखी तीन हेलीकाॅप्टरची आवश्यकता आहे. ती मिळण्यासाठी वरीष्ठ स्तरावर बाेलणी सुरु आहेत. त्याचप्रमाणे जिल्ह्यात चार एनडीआरएफच्या चार तुकड्या महाड येथील मदत कार्यात गुंतल्या आहेत.तळीये येथे गुरुवारी सायंकाळी दरड काेसळली हाेती, परंतू पुराचे पाणी आणि मार्गावर दरडी पडल्याने रात्री येथे बचाव कार्यात अडथळे येत हाेते. अडथळे दुर करुन आज दुपारी 12 वाजल्यापासून बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने बचावासाठी लागणारे साहित्य, अन्न पाकीटे, पाणी यांची व्यवस्था ठेवली आहे.-

खेडमध्ये दरड कोसळून १७ जणांचा मृत्यूरत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या धामणंदनजीकच्या पोसरे बौद्धवाडीत शुक्रवारी दरड कोसळून १७ जण त्याखाली गाडले गेले आहेत. गेला आठवडाभर संततधार पाऊस पडत आहे. त्यात बुधवारी रात्रीपासून पावसाचा जोर अधिक झाला आहे. या मुसळधार पावसामुळे पोसरे येथील बौद्धवाडीवर दरड कोसळली. १२ घरांना त्याचा फटका बसला. त्यातील ६ घरे पूर्णपणे गाडली गेली आहेत. त्यात १७ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. २५ झानावरेही दरडीखाली गाडली गेली आहेत. प्रशासनाकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. तेथे संपर्क होत नसल्याने यंत्रणाही हतबल झाली आहे.

टॅग्स :landslidesभूस्खलनmahad-acमहाडRaigadरायगडRainपाऊसAccidentअपघात