शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

Weather Alert: देशभरात यंदाचा मान्सून सुसाट! जूनपर्यंत सरासरीपेक्षा ४१ टक्के अधिक पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2021 19:13 IST

मध्य भारतात जोरदार तर सौराष्ट्र, ईशान्य, जम्मू काश्मीर, आंध्र प्रदेशात कमी

ठळक मुद्देमहाराष्ट्रामध्ये कोकणात सरासरीच्या दुप्पटीहून अधिक १११ टक्के पाऊस झाला आहे

पुणे: यंदा मॉन्सूनने नेहमीपेक्षा अधिक वेगाने देशभराच्या विविध भागात आगमन केल्याने देशात सर्वत्र चांगला पाऊस झाल्याचे दिसून येत आहे. सौराष्ट्र, कच्छ, ईशान्यकडील राज्ये, जम्मू काश्मीर आणि आंध्र प्रदेशातील किनारपट्टी या भागात आतापर्यंत पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. २० जूनपर्यंत देशात सरासरीपेक्षा ४१ टक्के अधिक पाऊस झाला आहे.

मध्य भारतात सर्वाधिक पाऊस झाला आहे. देशभरातील ३६ हवामान विभागापैकी ८ विभागात सरासरीपेक्षा - २० ते ६० टक्के कमी पाऊस झाला आहे. तर १९ विभागात सरासरीच्या तुलनेत १६० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे. ५ विभागात सरासरीपेक्षा १२० टक्के पाऊस झाला आहे. ४ विभागात सर्वसाधारण पाऊस झाला आहे.

मॉन्सूनचे यंदा आगमन हे पश्चिमेकडून लक्ष्यद्वीपकडून झाले. तरीही त्यानंतर लक्ष्यद्वीप समुहावर मॉन्सूनच्या पावसाचा जोर राहिला नाही. त्यामुळे लक्ष्यद्वीपला सरासरीपेक्षा ४७ टक्के कमी पाऊस झाला आहे. मॉन्सूनचे केरळमध्ये नेहमीपेक्षा ३ दिवस उशीरा आगमन झाले. आगमनानंतर पावसात खंड पडल्याने केरळमध्ये आतापर्यंत सरासरीपेक्षा -१५ कमी पाऊस झाला आहे. त्याचप्रमाणे सौराष्ट्र, कच्छ परिसरात शनिवारी मॉन्सूनचे नेहमीपेक्षा अगोदर आगमन झाले आहे. या भागातही -३३ टक्के कमी पाऊस झाला आहे. जम्मू काश्मीर - २६ टक्के, अरुणाचल प्रदेश - २३, आसाम, मेघालय - २१ टक्के कमी पाऊस झाला आहे. देशभरात सर्वाधिक पाऊस पूर्व उत्तर प्रदेशात सरासरीपेक्षा तब्बल २२५ टक्के अधिक झाला आहे. पूर्व मध्य प्रदेश १६० टक्के, बिहार १४९ टक्के, उत्तराखंड १२८ टक्के पाऊस झाला आहे. पश्चिम राजस्थानात अजून मॉन्सून पोहचला नाही. तरीही तेथे सरासरीपेक्षा ११० टक्के पाऊस झाला आहे.

महाराष्ट्रात कोकणात सरासरीच्या दुप्पटीहून अधिक १११ टक्के पाऊस झाला आहे. राज्याच्या चारही हवामान विभागात आतापर्यंत चांगला पाऊस झाला आहे.

१ जून ते २० जूनपर्यंत राज्यात पडलेला पाऊस (मिमी)

विभाग                  प्रत्यक्ष पडलेला पाऊस  सरासरी पाऊस  टक्केवारी

कोकण                                      ७३५.९             ३४९.२             १११

मध्य महाराष्ट्र                          १५२.४             ८६.२७             ७६

मराठवाडा                                     १३१             ७९.७             ६५

विदर्भ                                          १४५              ७९.४             ८३

चार जिल्ह्यात कमी पाऊस

धुळे -२९ टक्के, नंदुरबार -४६ टक्के, सोलापूर - ५ टक्के, अकोला - ४० टक्के पाऊस कमी झाला आहे. कोकणातील सर्व जिल्ह्यात सरासरीपेक्षा खुप अधिक पाऊस झाला आहे. मुंबई उपनगर भागात सरासरीपेक्षा २१३ टक्के, कोल्हापूर २०० टक्के, सांगली १८०, सातारा १७६ टक्के, पुणे १२७ टक्के अधिक पाऊस झाला आहे. विदर्भातील चंद्रपूर १२४ टक्के, यवतमाळ ११३ टक्के आणि परभणी १३९ टक्के अधिक पाऊस झाला आहे.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्रWaterपाणीweatherहवामान