शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
4
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
5
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
6
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
8
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
9
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
10
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
11
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
12
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
13
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
14
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
15
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
16
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
17
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
18
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
19
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
20
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात

अहो आश्चर्यम् ! कोंबड्यांनी अंडी देणे केले बंद म्हणून थेट पोलिस स्टेशनच गाठले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 3:50 PM

भेसळयुक्त खाद्य दिले म्हणून कोंबड्यांनी अंडी देणे बंद केल्याचा आरोप...

लोणी काळभोर : आपल्या कानावर सतत आश्चर्यकारक घटना येत असतात.पण चक्क कोंबड्यांनी अंडी देणे बंद केल्याने २७ जणांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्याची अजब घटना पुण्यात घडली आहे. या घटनेने सुरुवातीला पोलीस देखील चक्रावून गेले.

लोणी काळभोर पोलीस ठाण्यात  कंपनीने दिलेले भेसळयुक्त खाद्य कोंबड्यांना दिल्याने त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाला असून त्यामुळे त्यांनी अंडी देण्याचे बंद केले आहे. परिणामी शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. याचा सखोल तपास करून न्याय मिळवून द्यावा असा तक्रार अर्ज २७ जणांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिला आहे. 

 याप्रकरणी लक्ष्मण मुकुंद भोंडवे ( रा. आळंदी म्हातोबाची, ता. हवेली ) यांनी तक्रार अर्ज दिला आहे. त्यांचेसमवेत या अर्जावर गिरीष दिगंबर चंद, अनिल जवळकर, गोरख विचारे, विनोद दत्तात्रय भोंडवे व धनंजय नारायण डांगे यांचेसह २७ स्वाक्षरी केली आहे. वरिल सर्वांनी ११ एप्रिल रोजी जाफा कॅमफिड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. ( प्लॉट नंबर ए - ११, एमआयडीसी, सुपा पारनेर ग्रोथ सेंटर, अहमदनगर ) या कंपनी कडून खाद्य घेतले होते. ते कोंबड्यांना दिले असता त्यांचे शरीरावर विपरीत परिणाम झाला. परिणामी त्यांनी अंडी देणे बंद केले आहे. यामुळे सर्वाचे मोठे नुकसान झाले आहे. ही बाब लक्षात आलेनंतर याबाबत कंपनीस कळवले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. म्हणून तक्रार अर्ज देण्यात आला आहे.  यासंदर्भात सविस्तर माहिती देताना लक्ष्मण भोंडवे म्हणाले की, अंडी देणाऱ्या कोंबड्यांना १०५ दिवसांनंतर सदर खाद्य दिले जाते. त्यानंतर २१ दिवसांनी कोंबड्या अंडी देण्यास सुरुवात करतात. यापूर्वी याच कंपनीचे खाद्य दिले होते. त्यावेळी कोंबड्या अंडी देत होत्या. परंतू ११ एप्रिल रोजी खरेदी केलेल्या कोंबड्यांना खाद्य दिल्यानंतर ३ दिवसांनी सुमारे १ लाखांपेक्षा जास्त कोंबड्यांनी अंडी देणे बंद केले आहे. इतर वेळी उन्हाळ्यात अंडी कमी दरात खपतात. परंतू, सध्या कोरोनाच्या महामारीमुळे होलसेल भावात ५ रूपये २० पैसे प्रतिअंड्याला भाव मिळत आहे. सद्य दराचा विचार केला तर आमचे जवळपास कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. 

हवेली तालुक्यात शेतीला जोडधंदा म्हणून पोल्ट्री व्यवसाय केला जातो. तालुक्यातील सर्व पोल्ट्रीचा विचार केला तर हा नुकसानीचा आकडा अब्जावधीवर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी याप्रकरणी तक्रार अर्ज घेण्यात आला आहे. कंपनीकडून खरेदी करण्यात आलेल्या खाद्याचे नमुने तालुका पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येणार आहेत. त्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. याचबरोबर नुकसान भरपाईसाठी कंपनी प्रशासनाशी बोलणार असून त्यांनी योग्य प्रतिसाद दिला नाही तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरPoliceपोलिसbusinessव्यवसाय