शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
2
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
3
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
4
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
5
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
6
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
7
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
8
"मला नाही वाटत आपण एकत्र काम करू शकतो..", भन्साळींनी फरदीन खानला केलं होतं रिजेक्ट, हे होतं कारण
9
विक्री वाढली, Maruti Suzukiची तिजोरी भरली; आता कंपनी देणार इतिहासातील सर्वात मोठा डिविडंड
10
'महाराष्ट्रातला शेतकरी मेला पाहिजे, पण गुजरातचा...'; कांदा निर्यातीवरुन राऊतांची पंतप्रधानांवर टीका
11
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
12
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
13
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
14
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला
15
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
16
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
17
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
18
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
19
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?

हम दोनो एकदम जुडवाँ.....पं. हरिप्रसाद चौरसिया यांनी ‘सवाई’त उलगडले शिवहरीचे मैत्रीपर्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 5:43 PM

ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांनी गेल्या सहा दशकांहून अधिक काळ पं. शिवकुमार शर्मा यांच्याशी ‘शिवहरी’च्या माध्यमातून जुळलेल्या मैत्रीबंधाचे अद्वितीय स्वरपर्व ‘सवाई’त उलगडले.

ठळक मुद्देलगता है हम दोनो एकही पेटसे बाहर आए है : हरिप्रसाद चौरसिया'धरती, आकाश, चंद्रमा, पहाडी यांच्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाला काही महत्त्व नाही'

पुणे : आम्हाला स्वत: लाच कळत नाही ही कशाप्रकारची मैत्री आहे.. मात्र अशी मैत्री कधी पाहिली नाही ना कधी ऐकली...१९५४ पासून सुरू झालेली ही मैत्री कधी संपेल माहीत नाही.. जेव्हा कधी भेटतो तेव्हा भांडणालाच सुरूवात होते.. लगता है हम दोनो एकही पेटसे बाहर आए है, एकदम 'जुडवाँ'....अशा शब्दातं ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांनी गेल्या सहा दशकांहून अधिक काळ पं. शिवकुमार शर्मा यांच्याशी ‘शिवहरी’च्या माध्यमातून जुळलेल्या मैत्रीबंधाचे अद्वितीय स्वरपर्व उलगडले. पण...आता संगीत देणे बंद केले आहे. अनारकली, मुघले आझम चा काळ संपला. आता तसे विषय बनत नाहीत. त्यामुळे विश्रांती घेतली आहे..लोकांना जे करायच ते करून देत. चांगले विषय मिळाले तर परत सुरूवात करू, असे चौरसिया यांनी सांगितले. आमच्या मैत्रीचा प्रत्येक क्षण हा अविस्मरणीय असाच आहे. ज्यावेळी मुंबईमध्ये आलो तेव्हा चित्रपटाशी आमचा दूरान्वये संबंध नव्हता. शास्त्रीय संगीताचा रियाज करणे आणि गुरू अन्नपूर्णा यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेणे इतकेच आम्ही करीत होतो. चित्रपटांचा विचार केला तर आम्हाला धक्के मारून बाहेर काढले जात होते..पण नंतर आमचे संगीत लोकांना आवडायला लागले. आम्ही ज्या पद्धतीने संगीताचा विचार करायचो उदा: ये कहा आ गये हम’ हे गाणे ऐकल्यानंतर यांना संगीत का करायला देऊ नये.जर्मन, फ्रेंच या व्यक्ती देखील माणसेच असतात, संगीत पण तसेच आहे. शास्त्रीय संगीताव्यतिरिक्त जे आधुनिक, व्यावसायिक आणि बॉलिवूड संगीत आहे ते लोकांच्या आत्म्यामध्ये  आहे. नेहमी लोक ही गाणी गुणगुणत असतात. मग का नाही  त्यांच्या हदयापर्यंत पोहोचून त्यांचा आशिर्वाद घेऊ, भगवानची कृपा झाली. नशीबानेही साथ दिली आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यासमवेत काम केले. एक छान ट्यूनिंग आमच्यात जुळले असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.शिवहरी यांचे संगीत पुन्हा ऐकायला मिळणार का? तर पंडितजींनी तत्काळ होकार दिला. थोडासा ब्रेक झाला आहे, झटपट पैसे मिळावे अशी लालच अनेकांना असते. आम्हाला पण आहे. पण काम करीत आहोत नव्या पिढीला काय देत आहोत, काय संदेश देत आहोत हे महत्वाचे आहे. आत्ताच्या चित्रपटात पिढीला साधे डायलॉग व्यवस्थित म्हणता येत नाहीत. इंग्रजीचा वापर वाढला आहे. फक्त त्यांना पैसे मिळवायचे आहेत्, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

संगीतात रिमिक्सचे ‘प्रदूषण’ रिमिक्सच्या जमान्यात झटपट प्रसिध्दीच्या मागे तरूण पिढी लागली आहे, एक काळ होता की संगीतासाठी साधना केली जायची मात्र आज ती साधनाच हरवली आहे, या प्रश्नाला पंडितजींनी दुजोरा दिला. आपण खूप आधुनिक आहोत, असे दाखविले जात आहे. संगीतात जशी घाणेरडी हवा आल्याने वातावरण प्रदूषित होते तसे आज काहीसे झाले आहे. मुलांचा मेंदू आणि विचार करण्याची क्षमता लुप्त तर होणार नाही ना? अशी भीती वाटते. मुलांना एकदा सांगितले की लक्षात यायचे पण आता त्यांच्या मेंदूत काहीच शिरत नाही. धरती, आकाश, चंद्रमा, पहाडी यांच्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाला काही महत्त्व नाही. 

टॅग्स :Puneपुणे