शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

उजनीच्या पाण्याने सोलापूरची तहान भागणार; भीमा नदीतून पाण्याचा विसर्ग सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2020 12:41 IST

इंदापूर तालुक्यातील भीमा नदी कोरडी पडण्याच्या मार्गावर असल्याने इंदापूर व माढा तालुक्यातील पिके पाण्याविना धोक्यात आली होती.

ठळक मुद्देआवर्तन सोडल्याने इंदापूर तालुका व सोलापूर जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना या फायदा होणार ऐन उन्हाळ्यात तरणार नदीकाठची पीके

पुणे ( बाभूळगाव) : सोलापूर शहर आणि परिसराची पूर्ण तहान भागविणाऱ्या औज बंधारा, तर टाकळी बंधाऱ्यातील पाणी आटल्याने पाण्याचा प्रश्न एैरणीवर आला होता.  यामुळे  सोलापूर जिल्ह्याला वरदायनी ठरलेलेल्या उजनी जलाशयातून हे दोन्ही बंधारे भरण्यासाठी पाणी सोडण्यात आले आहे.   ऐन उन्हाळ्यात भीमा नदीला पाणी आवर्तन सोडल्याने इंदापूर तालुका व सोलापूर जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना या आवर्तनाचा फायदा होणार आहे. इंदापूर तालुक्यातील भीमा नदी कोरडी पडण्याच्या मार्गावर असल्याने इंदापूर व माढा तालुक्यातील पिके पाण्याविना धोक्यात आली होती. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला या शहरांसह नदी काठावरील गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. यामुळे उजनी धरणातून बुधवारी सकाळी भीमानदीत ३२०० क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले. यात टप्प्या- टप्प्याने वाढ करत ६४०० क्युसेक्लने पाणी सोडण्यात येणार आहे.  सोलापूर शहर व परिसराला पाणीपुरवठा करणारा औज बंधारा कोरडा पडला आहे. त्यामुळे सोलापूर शहरावर पाणीटंचाईचे तीव्र संकट ओढविण्याची शक्यता निर्माण झाली होती. औज बंधारा परिसरातील भीमा नदीवरील टाकळी जॅकवेलजवळ  फक्त ९ फूट  इतकीच पाणीपातळी असून, हे पाणी सोलापूरकरांना जेमतेम आठवडाभर पुरण्याची  शक्यता असल्याने उजनी धरणातून सोडलेले पाणी औज बंधाºयात पोहोचण्यासाठी किमान दहा ते बारा दिवस लागणार आहेत.  जिल्हाधिकारी कार्यालयात सोलापूरच्या पाणीपुरवठ्यासाठी झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी व उजनी अधीक्षक अभियंता धिरज साळे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर, पाणी विसर्ग सोडण्याबाबतचा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे पाठवण्यात आला होता.   सध्या उजनी धरण मृत साठ्यात असून ८.५३ टीएमसी पाणी वापरले गेले आहे. धरणात ५५ टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध असून, या वर्षी उजनी पूर्ण क्षमतेने भरले होते.   जिल्हाधिकारी यांच्याकडे उजनीचे नियोजन...     चालू वर्षी २७ नोव्हेंबर २०१९ रोजी उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने त्याची पाणीपातळी ४९७.३३० इतकी होती. तर, ४९१ मीटरवरील पाणीपातळी ही उपयुक्त म्हणून गृहीत धरली जाते.  त्याचे संपूर्ण नियोजन जलसंपदा विभागाकडे असते. तर, ४९१ मीटर पातळीच्या खाली उणे पातळी हा मृतसाठा समजला जातो. याचे नियोजन जिल्हाधिकारी यांच्याकडे असल्याने जिल्हाधिकारी हे जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी  यांच्याकडून नियोजनाबाबत माहिती घेऊन पाणी सोडण्याचे आदेश देत असतात.------------------------ उजनी धरणातील सध्याची पाणीपातळी

उजनी धरणात एकूण पाणीपातळी   ४८९.७३० मीटरधरणाचे एकूण क्षेत्रफळ  १७४.५७ चौ. कि. मी. धरणातील एकूण पाणीसाठा   १५६१.३७  दलघमीउपयुक्त पाणीसाठा  (उणे २४१.४४ दलघमीधरणातील एकूण पाणीसाठा   ५५.१३ टी.एम.सी.उपयुक्त साठा  (उणे) ८.५३ टी.एम.सी.टक्केवारी  (उणे) १५.९१ टक्केसध्या सुरू असलेला पाणी विसर्ग.भीमा नदी - ३००० क्युसेक्स.मुख्य कॅनाल - २४२२  क्युसेक्स.भीमा-सीना बोगदा  - ३८० क्युसेक्स.------------------------

टॅग्स :IndapurइंदापूरSolapurसोलापूरWaterपाणीUjine Damउजनी धरणFarmerशेतकरी