शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

उजनीच्या पाण्याने सोलापूरची तहान भागणार; भीमा नदीतून पाण्याचा विसर्ग सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2020 12:41 IST

इंदापूर तालुक्यातील भीमा नदी कोरडी पडण्याच्या मार्गावर असल्याने इंदापूर व माढा तालुक्यातील पिके पाण्याविना धोक्यात आली होती.

ठळक मुद्देआवर्तन सोडल्याने इंदापूर तालुका व सोलापूर जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना या फायदा होणार ऐन उन्हाळ्यात तरणार नदीकाठची पीके

पुणे ( बाभूळगाव) : सोलापूर शहर आणि परिसराची पूर्ण तहान भागविणाऱ्या औज बंधारा, तर टाकळी बंधाऱ्यातील पाणी आटल्याने पाण्याचा प्रश्न एैरणीवर आला होता.  यामुळे  सोलापूर जिल्ह्याला वरदायनी ठरलेलेल्या उजनी जलाशयातून हे दोन्ही बंधारे भरण्यासाठी पाणी सोडण्यात आले आहे.   ऐन उन्हाळ्यात भीमा नदीला पाणी आवर्तन सोडल्याने इंदापूर तालुका व सोलापूर जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना या आवर्तनाचा फायदा होणार आहे. इंदापूर तालुक्यातील भीमा नदी कोरडी पडण्याच्या मार्गावर असल्याने इंदापूर व माढा तालुक्यातील पिके पाण्याविना धोक्यात आली होती. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला या शहरांसह नदी काठावरील गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. यामुळे उजनी धरणातून बुधवारी सकाळी भीमानदीत ३२०० क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले. यात टप्प्या- टप्प्याने वाढ करत ६४०० क्युसेक्लने पाणी सोडण्यात येणार आहे.  सोलापूर शहर व परिसराला पाणीपुरवठा करणारा औज बंधारा कोरडा पडला आहे. त्यामुळे सोलापूर शहरावर पाणीटंचाईचे तीव्र संकट ओढविण्याची शक्यता निर्माण झाली होती. औज बंधारा परिसरातील भीमा नदीवरील टाकळी जॅकवेलजवळ  फक्त ९ फूट  इतकीच पाणीपातळी असून, हे पाणी सोलापूरकरांना जेमतेम आठवडाभर पुरण्याची  शक्यता असल्याने उजनी धरणातून सोडलेले पाणी औज बंधाºयात पोहोचण्यासाठी किमान दहा ते बारा दिवस लागणार आहेत.  जिल्हाधिकारी कार्यालयात सोलापूरच्या पाणीपुरवठ्यासाठी झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी व उजनी अधीक्षक अभियंता धिरज साळे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर, पाणी विसर्ग सोडण्याबाबतचा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे पाठवण्यात आला होता.   सध्या उजनी धरण मृत साठ्यात असून ८.५३ टीएमसी पाणी वापरले गेले आहे. धरणात ५५ टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध असून, या वर्षी उजनी पूर्ण क्षमतेने भरले होते.   जिल्हाधिकारी यांच्याकडे उजनीचे नियोजन...     चालू वर्षी २७ नोव्हेंबर २०१९ रोजी उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने त्याची पाणीपातळी ४९७.३३० इतकी होती. तर, ४९१ मीटरवरील पाणीपातळी ही उपयुक्त म्हणून गृहीत धरली जाते.  त्याचे संपूर्ण नियोजन जलसंपदा विभागाकडे असते. तर, ४९१ मीटर पातळीच्या खाली उणे पातळी हा मृतसाठा समजला जातो. याचे नियोजन जिल्हाधिकारी यांच्याकडे असल्याने जिल्हाधिकारी हे जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी  यांच्याकडून नियोजनाबाबत माहिती घेऊन पाणी सोडण्याचे आदेश देत असतात.------------------------ उजनी धरणातील सध्याची पाणीपातळी

उजनी धरणात एकूण पाणीपातळी   ४८९.७३० मीटरधरणाचे एकूण क्षेत्रफळ  १७४.५७ चौ. कि. मी. धरणातील एकूण पाणीसाठा   १५६१.३७  दलघमीउपयुक्त पाणीसाठा  (उणे २४१.४४ दलघमीधरणातील एकूण पाणीसाठा   ५५.१३ टी.एम.सी.उपयुक्त साठा  (उणे) ८.५३ टी.एम.सी.टक्केवारी  (उणे) १५.९१ टक्केसध्या सुरू असलेला पाणी विसर्ग.भीमा नदी - ३००० क्युसेक्स.मुख्य कॅनाल - २४२२  क्युसेक्स.भीमा-सीना बोगदा  - ३८० क्युसेक्स.------------------------

टॅग्स :IndapurइंदापूरSolapurसोलापूरWaterपाणीUjine Damउजनी धरणFarmerशेतकरी