शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

उजनीच्या पाण्याने सोलापूरची तहान भागणार; भीमा नदीतून पाण्याचा विसर्ग सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2020 12:41 IST

इंदापूर तालुक्यातील भीमा नदी कोरडी पडण्याच्या मार्गावर असल्याने इंदापूर व माढा तालुक्यातील पिके पाण्याविना धोक्यात आली होती.

ठळक मुद्देआवर्तन सोडल्याने इंदापूर तालुका व सोलापूर जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना या फायदा होणार ऐन उन्हाळ्यात तरणार नदीकाठची पीके

पुणे ( बाभूळगाव) : सोलापूर शहर आणि परिसराची पूर्ण तहान भागविणाऱ्या औज बंधारा, तर टाकळी बंधाऱ्यातील पाणी आटल्याने पाण्याचा प्रश्न एैरणीवर आला होता.  यामुळे  सोलापूर जिल्ह्याला वरदायनी ठरलेलेल्या उजनी जलाशयातून हे दोन्ही बंधारे भरण्यासाठी पाणी सोडण्यात आले आहे.   ऐन उन्हाळ्यात भीमा नदीला पाणी आवर्तन सोडल्याने इंदापूर तालुका व सोलापूर जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना या आवर्तनाचा फायदा होणार आहे. इंदापूर तालुक्यातील भीमा नदी कोरडी पडण्याच्या मार्गावर असल्याने इंदापूर व माढा तालुक्यातील पिके पाण्याविना धोक्यात आली होती. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला या शहरांसह नदी काठावरील गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. यामुळे उजनी धरणातून बुधवारी सकाळी भीमानदीत ३२०० क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले. यात टप्प्या- टप्प्याने वाढ करत ६४०० क्युसेक्लने पाणी सोडण्यात येणार आहे.  सोलापूर शहर व परिसराला पाणीपुरवठा करणारा औज बंधारा कोरडा पडला आहे. त्यामुळे सोलापूर शहरावर पाणीटंचाईचे तीव्र संकट ओढविण्याची शक्यता निर्माण झाली होती. औज बंधारा परिसरातील भीमा नदीवरील टाकळी जॅकवेलजवळ  फक्त ९ फूट  इतकीच पाणीपातळी असून, हे पाणी सोलापूरकरांना जेमतेम आठवडाभर पुरण्याची  शक्यता असल्याने उजनी धरणातून सोडलेले पाणी औज बंधाºयात पोहोचण्यासाठी किमान दहा ते बारा दिवस लागणार आहेत.  जिल्हाधिकारी कार्यालयात सोलापूरच्या पाणीपुरवठ्यासाठी झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी व उजनी अधीक्षक अभियंता धिरज साळे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर, पाणी विसर्ग सोडण्याबाबतचा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे पाठवण्यात आला होता.   सध्या उजनी धरण मृत साठ्यात असून ८.५३ टीएमसी पाणी वापरले गेले आहे. धरणात ५५ टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध असून, या वर्षी उजनी पूर्ण क्षमतेने भरले होते.   जिल्हाधिकारी यांच्याकडे उजनीचे नियोजन...     चालू वर्षी २७ नोव्हेंबर २०१९ रोजी उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने त्याची पाणीपातळी ४९७.३३० इतकी होती. तर, ४९१ मीटरवरील पाणीपातळी ही उपयुक्त म्हणून गृहीत धरली जाते.  त्याचे संपूर्ण नियोजन जलसंपदा विभागाकडे असते. तर, ४९१ मीटर पातळीच्या खाली उणे पातळी हा मृतसाठा समजला जातो. याचे नियोजन जिल्हाधिकारी यांच्याकडे असल्याने जिल्हाधिकारी हे जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी  यांच्याकडून नियोजनाबाबत माहिती घेऊन पाणी सोडण्याचे आदेश देत असतात.------------------------ उजनी धरणातील सध्याची पाणीपातळी

उजनी धरणात एकूण पाणीपातळी   ४८९.७३० मीटरधरणाचे एकूण क्षेत्रफळ  १७४.५७ चौ. कि. मी. धरणातील एकूण पाणीसाठा   १५६१.३७  दलघमीउपयुक्त पाणीसाठा  (उणे २४१.४४ दलघमीधरणातील एकूण पाणीसाठा   ५५.१३ टी.एम.सी.उपयुक्त साठा  (उणे) ८.५३ टी.एम.सी.टक्केवारी  (उणे) १५.९१ टक्केसध्या सुरू असलेला पाणी विसर्ग.भीमा नदी - ३००० क्युसेक्स.मुख्य कॅनाल - २४२२  क्युसेक्स.भीमा-सीना बोगदा  - ३८० क्युसेक्स.------------------------

टॅग्स :IndapurइंदापूरSolapurसोलापूरWaterपाणीUjine Damउजनी धरणFarmerशेतकरी