शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
5
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
6
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
7
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
8
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
9
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
11
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
12
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
13
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
14
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
15
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
16
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
17
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
18
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
19
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
20
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही

Pune Rain: वॉशिंग मशीन, फ्रिज, सगळं वाहून गेलं, आता आम्ही काय करायचं; सिंहगड रोडच्या नागरिकांना अश्रू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 13:37 IST

आम्ही सगळया वस्तू घरात ठेवून नातेवाइकांकडे गेलो होतो, त्यांनी पाणी सोडायच्या आधी सांगायला पाहिजे होत

पुणे: किचनमध्ये काहीच राहिलं नाही, आमचा संसार वाहून गेला. त्यांनी पाणी सोडायच्या आधी सांगायला पाहिजे होत, आम्ही सगळ्या वस्तू घरातच ठेवल्या होत्या. फक्त मोबाईल घेऊन नातेवाईकांकडे गेलो होतो. वॉशिंग मशीन, फ्रिज सगळं मुलांची पुस्तक, आमची महत्वाची कागदपत्रे सगळं वाहून गेलं. काही राहिलं नाही. आता आम्ही काय करायचं, आमची कोण नुकसानभरपाई करून देणार..! अशी व्यथा मांडताना सिंहगड रोडच्या विठ्ठलवाडी नदीकाठ परिसरातील नागरिकांचे अश्रू अनावर झाले.  

सिंहगड रोड परिसरातील विठ्ठलवाडीच्या नदीकाठ परिसरातही काल पाणी शिरले होते. पण त्याठिकाणी राहणारे नागरिक नातेवाईकांकडे गेले होते. ते सकाळी घरी आले असता घरातील सर्व संसार वाहून गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी माध्यमांसमोर आपली व्यथा मांडली. पुण्यातील सिंहगड रोड भागात एकता नगरी, निंबजनगरी, विठ्ठलवाडी परिसरात  खडकवासला धरणातील विसर्गामुळे घरांमध्ये पाणी शिरले. पार्किंगमधून गाड्या काढणेही अवघड झाले होते. काल सकाळच्या सुमारास रस्त्यांवर २ ते ३ फूट पाणी साचले होते. त्यामुळे सामान्यांचे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले. प्रशासनाच्या मदतकार्याने नागरिकांची सुटका करून सुरक्षित स्थळी पोहोचवण्यात आले. कोणतीही पूर्वसूचना न देता खडकवासला धरणातून पाणी सोडल्याचा दावा पुणेकरांनी केला. काल या सर्व पुरस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सिंहगड परिसरातील पाणी साचलेल्या भागात पाहणी केली होती. यावेळी विठ्ठलवाडीच्या नदीकाठ परिसरातील नागरीकांचा संसार पाण्यात वाहून गेला. माध्यमांसमोर व्यथा मांडताना त्यांना अश्रू अनावर झाले.

योग्य ती कारवाई होणार - मोहोळ   

आज सकाळी राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सिंहगड रोड परिसरात पाहणी केली. त्यावेळी त्यांनी कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे नागरिकांना आश्वासन दिले आहे. ते म्हणाले, नागरिकांना हा त्रास पुन्हा होणार नाही यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणार आहोत. काही ठिकाणी नदीपात्र अरुंद आहे, पूररेषा निश्चित करायची आहे. हे सर्वही पाहावे लागणार आहे. या भागात पाणी कधीच येणार यासाठी कायमस्वरूपीच नियोजन आपण करणार आहोत. लोकांच्या  प्रतिक्रिया आम्ही ऐकल्या आहेत. आता प्रशासकीय पातळीवर सर्व मदतकार्य सुरु आहे. लोकांना सुविधा देणे, स्वच्छ पाणी पुरवणे यासाठी महापालिकेची यंत्रणा काम करत आहे. ४० हजार क्यूसेसच्या वर पाणी सोडलं गेलं आहे. नागरिकांना त्याअगोदर अलर्ट का दिला नाही याबाबत चौकशी केली जाणार आहे. तसेच महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यात का समन्वय साधला गेला नाही याचीही चौकशी केली जाईल. आणि योग्य ती कारवाई आम्ही करू. आता सद्यस्थितीत या भागातील नागरिकांना मदत करणे यालाच प्राधान्य दिले जाईल. 

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसHomeसुंदर गृहनियोजनDamधरणPoliceपोलिसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाSocialसामाजिक