शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
5
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
6
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
7
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
8
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
9
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
10
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
11
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
12
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
13
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
14
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
15
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
16
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
17
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
18
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
19
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
20
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
Daily Top 2Weekly Top 5

Pune Rain: वॉशिंग मशीन, फ्रिज, सगळं वाहून गेलं, आता आम्ही काय करायचं; सिंहगड रोडच्या नागरिकांना अश्रू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 13:37 IST

आम्ही सगळया वस्तू घरात ठेवून नातेवाइकांकडे गेलो होतो, त्यांनी पाणी सोडायच्या आधी सांगायला पाहिजे होत

पुणे: किचनमध्ये काहीच राहिलं नाही, आमचा संसार वाहून गेला. त्यांनी पाणी सोडायच्या आधी सांगायला पाहिजे होत, आम्ही सगळ्या वस्तू घरातच ठेवल्या होत्या. फक्त मोबाईल घेऊन नातेवाईकांकडे गेलो होतो. वॉशिंग मशीन, फ्रिज सगळं मुलांची पुस्तक, आमची महत्वाची कागदपत्रे सगळं वाहून गेलं. काही राहिलं नाही. आता आम्ही काय करायचं, आमची कोण नुकसानभरपाई करून देणार..! अशी व्यथा मांडताना सिंहगड रोडच्या विठ्ठलवाडी नदीकाठ परिसरातील नागरिकांचे अश्रू अनावर झाले.  

सिंहगड रोड परिसरातील विठ्ठलवाडीच्या नदीकाठ परिसरातही काल पाणी शिरले होते. पण त्याठिकाणी राहणारे नागरिक नातेवाईकांकडे गेले होते. ते सकाळी घरी आले असता घरातील सर्व संसार वाहून गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी माध्यमांसमोर आपली व्यथा मांडली. पुण्यातील सिंहगड रोड भागात एकता नगरी, निंबजनगरी, विठ्ठलवाडी परिसरात  खडकवासला धरणातील विसर्गामुळे घरांमध्ये पाणी शिरले. पार्किंगमधून गाड्या काढणेही अवघड झाले होते. काल सकाळच्या सुमारास रस्त्यांवर २ ते ३ फूट पाणी साचले होते. त्यामुळे सामान्यांचे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले. प्रशासनाच्या मदतकार्याने नागरिकांची सुटका करून सुरक्षित स्थळी पोहोचवण्यात आले. कोणतीही पूर्वसूचना न देता खडकवासला धरणातून पाणी सोडल्याचा दावा पुणेकरांनी केला. काल या सर्व पुरस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सिंहगड परिसरातील पाणी साचलेल्या भागात पाहणी केली होती. यावेळी विठ्ठलवाडीच्या नदीकाठ परिसरातील नागरीकांचा संसार पाण्यात वाहून गेला. माध्यमांसमोर व्यथा मांडताना त्यांना अश्रू अनावर झाले.

योग्य ती कारवाई होणार - मोहोळ   

आज सकाळी राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सिंहगड रोड परिसरात पाहणी केली. त्यावेळी त्यांनी कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे नागरिकांना आश्वासन दिले आहे. ते म्हणाले, नागरिकांना हा त्रास पुन्हा होणार नाही यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणार आहोत. काही ठिकाणी नदीपात्र अरुंद आहे, पूररेषा निश्चित करायची आहे. हे सर्वही पाहावे लागणार आहे. या भागात पाणी कधीच येणार यासाठी कायमस्वरूपीच नियोजन आपण करणार आहोत. लोकांच्या  प्रतिक्रिया आम्ही ऐकल्या आहेत. आता प्रशासकीय पातळीवर सर्व मदतकार्य सुरु आहे. लोकांना सुविधा देणे, स्वच्छ पाणी पुरवणे यासाठी महापालिकेची यंत्रणा काम करत आहे. ४० हजार क्यूसेसच्या वर पाणी सोडलं गेलं आहे. नागरिकांना त्याअगोदर अलर्ट का दिला नाही याबाबत चौकशी केली जाणार आहे. तसेच महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यात का समन्वय साधला गेला नाही याचीही चौकशी केली जाईल. आणि योग्य ती कारवाई आम्ही करू. आता सद्यस्थितीत या भागातील नागरिकांना मदत करणे यालाच प्राधान्य दिले जाईल. 

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसHomeसुंदर गृहनियोजनDamधरणPoliceपोलिसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाSocialसामाजिक