शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

इंदापूर तालुक्यात नीरा-भीमा जलस्थिरीकरण प्रकल्पाची वाहने शेतकऱ्यांनी अडविली; मराठवाडा पाणी प्रश्न पेटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2020 11:59 IST

इंदापूर तालुक्यातील नीरा नदीवरून बोगद्याद्वारे उजनी धरण व तेथून पुढे पाणी मराठवाड्यासाठी वळविण्यात येणार आहे.

इंदापूर (सणसर) : मराठवाड्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी इंदापूर तालुक्यातील नीरा नदीवरून बोगद्याद्वारे उजनी धरण व तेथून पुढे पाणी मराठवाड्यासाठी वळविण्यात येणार आहे. त्या प्रकल्पाचे बोगद्याचे काम सध्या सणसर येथील ३६ फाटा येथे सुरू आहे. त्यामुळे या प्रकल्पामुळे बाधित शेतकऱ्यांनी नीरा-भीमा जलस्थिरीकरण प्रकल्पाची वाहने सोमवारी ( दि. २१) अडविली.

काल रविवारी सपकळवाडी येथील शेतकऱ्यांनी नीरा-भीमा जल स्थिरीकरण योजनेचे बोगद्याचे काम सणसर हद्दीमध्ये ज्या ठिकाणी चालू होते तेथे जाऊन शेतकऱ्यांनी हे काम बंद पाडले. तेथील अधिकार्‍यांनीही हे काम बंद करत असल्याचे शेतकऱ्यांना सांगितले. मात्र सोमवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास मुरुमाने भरलेले टिपर हे प्रकल्पाचे ठिकाणावरून मुरूम यार्डाकडे भरून जाताना काही ग्रामस्थांनी पाहिले व तात्काळ त्या ठिकाणी ग्रामस्थ एकत्र येत वाहनाला आडवे येऊन उभे राहिले व शेतकऱ्यांनी वाहन पुढे न्यायचे नाही असे सांगून रस्त्यावर आडवे झोपण्याचा प्रयत्न केला. प्रकल्पाच्या ठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलन करूनही संबंधित ठेकेदार शेतकऱ्यांना न जुमानता काम करत आहे. त्यावरून शेतकरी आक्रमक झाले होते. यावेळी उमेश सपकळ,जगदीश सपकळ, आप्पा सपकळ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

नीरा-भीमा जल स्थिरीकरण प्रकल्पाच्या कामासाठी भूसुरुंगाचा वापर केला जात आहे. त्याच्या धक्क्यामुळे परिसरातील घरांना तडे जात असून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच या बोगद्यामुळे आमच्या विहिरींचे व बोअरवेलचे पाणी गेले आहे. हिवाळ्यातही विहिरींना पाणी कमी झाले आहे. त्यावरून येथील शेतकरी आंदोलन करत आहे. या विषयीकाल सर्व अधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले होते. मात्र तरीही शेतकर्‍यांचा विरोध डावलून काम सुरू करण्याचा प्रयत्न ठेकेदाराकडून सुरू आहे. 

शेतकऱ्यांनी सामंजस्यांची भूमिका घेत आंदोलन केले याचा अर्थ ठेकेदाराने वेगळा घेऊ नये. काम बंद करतो असे सांगूनही आज वाहनातून मुरूम भरून यार्ड कडे टाकण्याची गरजच नव्हती. आमचा संयम तुटू देऊ नये अन्यथा आंदोलनाला वेगळे वळण लागेल याची नोंद ठेकेदारांनी घ्यावी- सचिन सपकळ, सरपंच, सपकळवाडी.

टॅग्स :IndapurइंदापूरWaterपाणीMarathwadaमराठवाडाdroughtदुष्काळUjine Damउजनी धरण