शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

इंदापूर तालुक्यात नीरा-भीमा जलस्थिरीकरण प्रकल्पाची वाहने शेतकऱ्यांनी अडविली; मराठवाडा पाणी प्रश्न पेटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2020 11:59 IST

इंदापूर तालुक्यातील नीरा नदीवरून बोगद्याद्वारे उजनी धरण व तेथून पुढे पाणी मराठवाड्यासाठी वळविण्यात येणार आहे.

इंदापूर (सणसर) : मराठवाड्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी इंदापूर तालुक्यातील नीरा नदीवरून बोगद्याद्वारे उजनी धरण व तेथून पुढे पाणी मराठवाड्यासाठी वळविण्यात येणार आहे. त्या प्रकल्पाचे बोगद्याचे काम सध्या सणसर येथील ३६ फाटा येथे सुरू आहे. त्यामुळे या प्रकल्पामुळे बाधित शेतकऱ्यांनी नीरा-भीमा जलस्थिरीकरण प्रकल्पाची वाहने सोमवारी ( दि. २१) अडविली.

काल रविवारी सपकळवाडी येथील शेतकऱ्यांनी नीरा-भीमा जल स्थिरीकरण योजनेचे बोगद्याचे काम सणसर हद्दीमध्ये ज्या ठिकाणी चालू होते तेथे जाऊन शेतकऱ्यांनी हे काम बंद पाडले. तेथील अधिकार्‍यांनीही हे काम बंद करत असल्याचे शेतकऱ्यांना सांगितले. मात्र सोमवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास मुरुमाने भरलेले टिपर हे प्रकल्पाचे ठिकाणावरून मुरूम यार्डाकडे भरून जाताना काही ग्रामस्थांनी पाहिले व तात्काळ त्या ठिकाणी ग्रामस्थ एकत्र येत वाहनाला आडवे येऊन उभे राहिले व शेतकऱ्यांनी वाहन पुढे न्यायचे नाही असे सांगून रस्त्यावर आडवे झोपण्याचा प्रयत्न केला. प्रकल्पाच्या ठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलन करूनही संबंधित ठेकेदार शेतकऱ्यांना न जुमानता काम करत आहे. त्यावरून शेतकरी आक्रमक झाले होते. यावेळी उमेश सपकळ,जगदीश सपकळ, आप्पा सपकळ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

नीरा-भीमा जल स्थिरीकरण प्रकल्पाच्या कामासाठी भूसुरुंगाचा वापर केला जात आहे. त्याच्या धक्क्यामुळे परिसरातील घरांना तडे जात असून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच या बोगद्यामुळे आमच्या विहिरींचे व बोअरवेलचे पाणी गेले आहे. हिवाळ्यातही विहिरींना पाणी कमी झाले आहे. त्यावरून येथील शेतकरी आंदोलन करत आहे. या विषयीकाल सर्व अधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले होते. मात्र तरीही शेतकर्‍यांचा विरोध डावलून काम सुरू करण्याचा प्रयत्न ठेकेदाराकडून सुरू आहे. 

शेतकऱ्यांनी सामंजस्यांची भूमिका घेत आंदोलन केले याचा अर्थ ठेकेदाराने वेगळा घेऊ नये. काम बंद करतो असे सांगूनही आज वाहनातून मुरूम भरून यार्ड कडे टाकण्याची गरजच नव्हती. आमचा संयम तुटू देऊ नये अन्यथा आंदोलनाला वेगळे वळण लागेल याची नोंद ठेकेदारांनी घ्यावी- सचिन सपकळ, सरपंच, सपकळवाडी.

टॅग्स :IndapurइंदापूरWaterपाणीMarathwadaमराठवाडाdroughtदुष्काळUjine Damउजनी धरण