शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

वेध विलिनीकरणाचे : भिलारेवाडी १

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:11 IST

.................................... गावकऱ्यांना नागरिकरणाबरोबरच विकासाचे वेध _________________________ दीपक मुनोत लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : भिलारेवाडीला चहूबाजूंनी महापालिका क्षेत्र असतानाही अद्याप ...

....................................

गावकऱ्यांना नागरिकरणाबरोबरच विकासाचे वेध

_________________________

दीपक मुनोत

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : भिलारेवाडीला चहूबाजूंनी महापालिका क्षेत्र असतानाही अद्याप ग्रामपंचायत आहे. पिण्याचे पाणी आणि स्वच्छता या मुलभूत समस्या असून विलिनीकरणानंतर तरी या परिस्थितीत फरक पडेल का, या विवंचनेत गावकरी आहेत.

गावाचे क्षेत्र सुमारे अडीच हजार एकर असून चार हजार लोकसंख्येच्या भिलारेवाडीत ड्रेनेजची अपूरी व्यवस्था आहे. दलित वस्तीत ड्रेनेजची सुविधाच नाही. अन्य भागात सांडपाणी उघड्यावरच सोडले जात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. गेल्या वर्षी महापूरात गावातील ड्रेनेज लाइनचे पाईप वाहून गेल्यापासुन सांडपाणी व्यवस्थापनाची समस्या आणखीनच तीव्र झाली आहे.

गावात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नाही. त्यामुळे गावातील कचरा हा उपसरपंचांच्या मालकीच्या खासगी जागेवर एकत्रित करून जाळला जातो. त्यामुळे कचरा उचलण्यासाठी यंत्रणा असूनही आमचा प्रश्न सुटलेला नाही, असं काही महिलांनी नमूद केले. त्याचबरोबर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी महापालिकेने आम्हाला जागा देऊन प्रकल्प मंजूर करावा, अशी मागणीही त्यांनी केली.

गावात पिण्याच्या पाण्याच्या अडचणी कमी झालेल्या नाहीत. जिल्हा परिषदेच्या पाझर तलावातून फक्त वापरण्यासाठी नागरिकांना तलावावर जाऊन पाणी आणावे लागते. पिण्यासाठी पाणी नाही. जेथून पाणी आणतो तिथे जलशुद्धीकरण प्रकल्प नाही. महापालिकेने याकडे लक्ष देऊन स्वच्छ पाणी द्यावे अशी गावकऱ्यांची मागणी आहे.

*कोट*

पायाभूत सुविधांची पूर्तता ग्रामपंचायतीने केली आहे. पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला महापालिकेने प्राधान्य द्यावे.

-ताराचंद उघडे, सरपंच.

कोट

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर असून आम्हाला कात्रजहून पाणी आणावे लागते. त्याचबरोबर गावातील युवकांना व्यायामशाळा आणि रोजगाराच्या संधी महापालिकेने उपलब्ध करून द्याव्यात.

-राहुल धस, व्यावसायिक

फोटो ओळ

गावातील अगदी मध्यभागी भर लोकवस्तीत उघड्यावरच कचरा टाकला जातो. त्यामुळे दुर्गंधी निर्माण होऊन मोकाट जनावरांचा उपद्रव वाढला आहे.