शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

दोन हजार कोटींचे पॅकेज शेतकऱ्यांसाठी अद्याप दिवास्वप्नच

By admin | Updated: May 13, 2015 02:41 IST

राज्यातील साखर हंगाम संपला तरीही राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाची किंमत मिळाली नाही. केंद्र आणि राज्य सरकार गेल्या ६ महिन्यांपासून

सोमेश्वरनगर : राज्यातील साखर हंगाम संपला तरीही राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाची किंमत मिळाली नाही. केंद्र आणि राज्य सरकार गेल्या ६ महिन्यांपासून एफआरपीबाबत फक्त चर्चाच करत असल्याचे दिसत आहे. मात्र, यावर अजून ठोस उपाययोजना होत नाहीत. गेल्या आठवड्यात सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना २ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहिर केले असल्याची घोषणा केली. मात्र, ही घोषणा ऊस उत्पादकांसाठी दिवास्वप्न ठरल्याची चर्चा ऊस उत्पादकांमध्ये आहे. शासनाने २ हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली़ पण, त्याबाबतची कोणतीही सूचना अथवा कोणतीही माहिती जिल्हा बँका अथवा साखर कारखान्यांपर्यंत अद्याप पोहचलेली नाही़ या वर्षभरात तब्बल ९०० रुपयांनी साखरेचे दर उतरले. त्यामुळे कारखान्यांची एफआरपी व राज्य बँक देत असलेली पोत्यावरील उचलीत तब्बल एक हजार रुपयांचा फरक भरून काढणे, साखर कारखान्यांच्या आवाक्याबाहेरचे होते. त्यामुळे गेल्या वर्षी प्रमाणे याही वर्षी केंद्र सरकारने साखर उद्योगाला मदत करावी, अशी साखर कारखानदारांचीअपेक्षा होती. मात्र, ही मदत कर्ज स्वरूपात नसावी. तर ती अनुदान स्वरूपात असावी, अशी अपेक्षा कारखानदारांनी व्यक्त केली होती. मात्र, कारखाने सुरू झाल्यापासून साखरेच्या वारंवार पडणाऱ्या दरामुळे राज्य बँकेने ४ वेळा साखरेच्या मुल्यांकनात घट केली. त्यामुळे एफआरपी मिळण्याच्या शेतकऱ्यांच्या आशा धुसर झाल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शिष्टमंडळाने जानेवारीत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली. या वेळी साखर निर्यातीसाठी टनाला ५ हजार रुपये अनुदान, २० लाख टन साखरेच्या निर्यातीला परवानगी आणि ऊस उत्पादाकांना उचित भाव देण्यासाठी दि.२१ जानेवारी रोजी ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. माजी कृषिमंत्री शरद पवार, राज्य संघाचे अध्यक्ष विजयसिंह मोहिते पाटील, राष्ट्रीय संघाचे अध्यक्ष कल्लाप्पा आवाडे यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावर ऊस प्रश्नांबाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आश्वासन मोदींनी दिले. आता, या आश्वासनांची पूर्तता होणार कधी, याकडे साखर कारखान्यांसह ऊस उत्पादकांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)