शहरं
Join us  
Trending Stories
1
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
2
"ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
3
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
4
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
5
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
6
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
7
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
8
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
9
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
10
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
11
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
12
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
13
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
14
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
15
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

वारकऱ्यांच्या दिंडीला भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, 20 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2021 10:18 AM

पायी जाणाऱ्या दिंडीत पिकअप घुसल्याने दोन वारकऱ्यांना गंभीर जखम झाली होती. उपचारादरम्यान, त्यांचा मृत्यू झाला.

पुणे - कार्तिकी एकादशीला आळंदीकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत पिक अप गाडी शिरल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून 20 वारकरी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. कान्हे फाटा येथे हा अपघात झाला आहे. अपघातातील जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांनीही यासंदर्भात ट्विट करुन माहिती दिली. 

पायी जाणाऱ्या दिंडीत पिकअप घुसल्याने दोन वारकऱ्यांना गंभीर जखम झाली होती. उपचारादरम्यान, त्यांचा मृत्यू झाला. सविता वाळकू येरभ (वय 58), रा. उंबरे, खालापूर, रायगड आणि जयश्री आत्माराम पवार (वय 54), रा.भूतवली, ता. कर्जत, जि रायगड, अशी मृत्युमुखी पडलेल्या वारकऱ्यांची नावे आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वडगाव-मावळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पिक अप चालकाला ताब्यात घेतले आहे. खालापूर येथून ही दिंडी आळंदीकडे जात असताना सकाळी हा अपघात झाला. सध्या कामशेतच्या महावीर हॉस्पिटलमध्ये जखमींवर उपचार सुरू आहेत.  पार्थ पवार यांनीही ट्विट करुन आमच्याकडून मतदकार्य सुरू असल्याचं सांगितलंय. तसेच, जखमी वारकरी लवकर बरे होवोत, अशी प्रार्थनाही त्यांनी केली आहे.  

टॅग्स :AccidentअपघातPuneपुणेAlandiआळंदी