शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

कुटुंबाचा विचार करुन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2020 4:05 AM

\Sपुण्याचे उद्योजक पाषाणकरांनी उलगडला ''''त्या'''' ३३ दिवसांचा प्रवास लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ज्या लोकांची तोंड वर करून बोलायची ...

\Sपुण्याचे उद्योजक पाषाणकरांनी उलगडला ''''त्या'''' ३३ दिवसांचा प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : ज्या लोकांची तोंड वर करून बोलायची हिंमत नव्हती़, ते वाट्टेल ते बोलू लागले, ते सहन होत नव्हते़ व्यवसायात काही चुकीचे निर्णय झाल्याने आर्थिक नुकसान झाले होते़ त्याच्या तणावातून आत्महत्येचा विचार आल्याने घरातून निघून गेलो होतो़ पण बाहेर पडल्यावर कुटुंबाचा विचार मनात आल्याने आत्महत्येचा विचार दूर सारला़ पण पुण्यात परत न येण्याचा विचार होता, असे प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकर यांनी सांगितले़

पुणे पोलिसांच्या पथकाने गौतम पाषाणकर यांना जयपूर येथील चंद्रगुप्त फोर्ट या हॉटेलमधून मंगळवारी ताब्यात घेतले़ त्यांना बुधवारी सायंकाळी पुण्यात आणण्यात आले़ यावेळी पाषाणकर हे पत्रकारांशी बोलत होते़

पाषाणकर यांनी सांगितले की, गेल्या २ -३ महिन्यांपासून ताणतणावात होतो़ त्यातून माझ्यावर मानसिक भडीमार झाला़ कुठलीही परिस्थिती साथ देत नव्हती़ किरकोळ रक्कमेसाठी लोक बोलू लागल्याने त्याचा मानसिक त्रास झाला़ ते सहनशीलतेच्या बाहेर होते़ त्यातूनच आत्महत्येचा विचार करुन पुण्यातून कोल्हापूरला गेलो़ तेथून बसने बंगलोर व तेथून तिरुपती बालाजी करीत कन्याकुमारीपर्यंत गेलो होतो़ या प्रवासादरम्यान शांतपणे विचार करत गेलो़ तेव्हा कुटुंबाचा विचार मनात आला़ हे आपले काम नाही, असे मनाने घेतले़ पण पुण्यात परत येण्याचा विचार नव्हता़ त्यामुळे मी बसने फिरत राहिलो़ पोलीस आले नसते तर दुसºया दिवशी आपण उदयपूरला निघून जाणार होतो़

पुण्यातून निघताना ९० हजार रुपये बरोबर घेतले होते़ छोट्या हॉटेलमध्ये मुक्काम करायचा़ साधे जेवण घ्यायचे़ बसने फिरायचे़ खूप विचार करायचा असा दिनक्रम सुरु होता, असे त्यांनी सांगितले़

गौतम पाषाणकर यांचे चिरंजीव कपिल पाषाणकर यांनी सांगितले की, आम्ही स्वतंत्रपणे व्यवसाय करतो़ मी महत्वाच्या निर्णयाच्या वेळी वडिलांचा सल्ला घेतो़ आमची ८०० कोटींची उलाढाल होती़ आम्ही मोटारीची डिलरशीप बंद झाली़ त्या कठीण काळामधून बाहेर पडलो होतो़ पण वडिलांनी त्यांच्या आर्थिक अडचणी, मानसिक स्थितीची कधी माहिती दिली नाही़ त्यांना आता व्यवसायातून तुम्ही रिटायर व्हा़ पुढील ६ महिन्यात सर्व स्थिरस्थावर करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे त्यांनी सांगितले.

-------------

''''पोलीस इतका शोध घेतील असे वाटले नव्हते''''

आपण घरातून निघून गेल्यानंतर पोलिसांमध्ये तक्रार होईल़ पोलीस शोध घेतील, याची कल्पना होती़ परंतु, पोलीस इतका शोध घेतील, असे वाटले नव्हते, असे गौतम पाषाणकर यांनी सांगितले़. आपण महाराष्ट्राबाहेर होतो़ तसेच बरोबर मोबाईल अथवा कोणाशी संपर्क नसल्याने आपला इतका ठिकाणी शोध घेतला जात असल्याचे समजले नसल्याचे त्यांनी सांगितले़.