शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
2
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
3
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
4
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
5
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
6
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
8
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
9
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
10
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
11
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
12
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
13
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
14
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
15
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
16
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
17
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
18
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
19
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
20
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

SSC Exam 2025: पहिलाच पेपर एकदम सोपा; विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य, आता वेध इंग्रजीचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 11:23 IST

विद्यार्थी वर्गात प्रश्नपत्रिका सोडवतात. मात्र, परीक्षा केंद्रावर बसलेल्या पालकांच्या चेहऱ्यावर परीक्षेचा ताण स्पष्टपणे जाणवत असल्याचे दिसून येतो

पुणे: दहावीच्या विद्यार्थ्यांचा पहिलाच पेपर मराठीचा होता आणि तो एकदम छान गेल्याच्या भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. वर्षभर केलेला अभ्यास, सराव, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि कृतीपत्रिकेची काठिण्य पातळी कमी झाल्याने परीक्षेचा पहिलाच पेपर सोपा गेला. त्यामुळे पेपर संपल्यानंतर सर्वांच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली. आता सर्वांना इंग्रजी विषयाच्या पेपरचे वेध लागल्याचे दिसून आले. सुरुवात तर छान झाली, त्यामुळे सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला शुक्रवार (दि. २१)पासून सुरुवात झाली. परीक्षेसाठी १६ लाख ११ हजार ६१० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत विद्यार्थी संख्येत वाढ झाली आहे. परीक्षेदरम्यान कॉपी आणि तत्सम गैरप्रकार रोखण्यासाठीच्या परीक्षा केंद्रात उपाययोजना केल्या होत्या. विद्यार्थ्यांना साडेदहा वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याच्या सूचना असल्याने विद्यार्थी १० वाजताच केंद्रावर पोहोचले. दहावी बोर्डाच्या परीक्षेला मुले सामोरे जात असल्यामुळे शहरातील विविध केद्रांवर पालकांनी गर्दी केली होती.

पहिला पेपर असल्याने मुलाला सोडायला अनेकजण कुटुंबासह आले होते. यावेळी परीक्षा केंद्रात कडक बंदोबस्त होता. परीक्षा केंद्रात प्रवेश करताना विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. त्यांनी सोबत आणलेली बॅग तपासली, तसेच कोणी चप्पल, बुटामध्ये कॉपी लपवली नाही ना, याचीही खात्री करण्यात येत होती. इतर काही साहित्य सापडले, तर ते प्रवेशद्वारावर जमा करण्यात येत होते.

सकाळच्या सत्रात प्रथम भाषा मराठीसह हिंदी, उर्दू, भाषेचा पेपर होता. पहिला पेपर मराठीचा असल्याने अनेकांच्या चेहऱ्यावर काहीसे दडपण असल्याचे चित्र होते. प्रश्नपत्रिका हाती पडल्यानंतर सोप्या कृतीमुळे पेपर सोडविणे अधिक सहज झाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. प्रश्नांची काठिण्य पातळी अधिक नसल्याचेही विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले. पहिला पेपर सोपा गेल्याने विद्यार्थी, विद्यार्थिनी आनंदी चेहऱ्याने परीक्षा केंद्रातून बाहेर पडताना दिसले.

विद्यार्थ्यांऐवजी पालकच चिंतेत

बारावीच्या मुलांना बोर्डाच्या परीक्षेचा सराव झालेला असतो. त्यामुळे पालकही बिनधास्त असतात. मात्र, दहावीच्या परीक्षेला पालक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर सोडण्यास येतात. पेपर होईपर्यंत परीक्षा केंद्रावरच बसून राहतात. विद्यार्थी वर्गात प्रश्नपत्रिका सोडवतात. मात्र, परीक्षा केंद्रावर बसलेल्या पालकांच्या चेहऱ्यावर परीक्षेचा ताण स्पष्टपणे जाणवत असल्याचे दिसून येते.

 

टॅग्स :Puneपुणेssc examदहावीEducationशिक्षणStudentविद्यार्थीTeacherशिक्षकSchoolशाळा