शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: 'काम नसेल तर घरीच थांबा!' मुंबईत पावसाचा धुमाकूळ, लोकल रेल्वे सेवेला फटका
2
बिहारनंतर आता संपूर्ण देशात मतदार याद्यांची तपासणी होणार; SIR बाबत आदेश निघाले...
3
Raju Shetti :'५०० एकराची कागदपत्रे त्यांनी द्यावीत, २५ तारखेपर्यंत आरोप सिद्ध करावा'; राजू शेट्टींचे एकनाथ शिंदेंच्या आमदाराला ओपन चॅलेंज
4
मुस्लीम धर्मगुरुंसोबत RSS प्रमुख मोहन भागवतांनी केली चर्चा; ३ तासांच्या बैठकीत काय ठरले?
5
ऑगस्टमध्ये बँका 'इतके' दिवस बंद राहणार! महत्त्वाचे काम असेल तर लगेच करा, अन्यथा अडचण होईल!
6
महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा करेक्ट कार्यक्रम; लाडकी बहीण योजनेतील पडताळणीला स्थगिती?
7
मनसेशी युती करण्याचा शिंदेसेनेचा आग्रह; राज ठाकरेंच्या टाळीसाठी एवढा आटापिटा कशासाठी? चर्चांना उधाण
8
मोठी दुर्घटना! राजस्थानमध्ये शाळेचे छत कोसळले, ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू, मदतकार्य सुरू
9
दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षनेतेपद राहणार ४ महिने रिक्त;  विधानसभेतील पदाचा निर्णयही प्रलंबित
10
झारखंडमधील ACB पथकाने अटक केलेला अमित साळुंखे कोण?; संजय राऊतांचा शिंदे पिता-पुत्रावर खळबळजनक आरोप
11
घटनेच्या उद्देशिकेतून समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष शब्द हटवणार का?; केंद्र सरकारने संसदेत दिले उत्तर
12
इलेक्ट्रिक टुव्हीलरनंतर आता थ्री-व्हीलर! 'या' कंपनीने बाजारात उतरवले रिक्षाचे २ मॉडेल्स; किंमत आणि फीचर्स काय?
13
श्रावण शुक्रवार: नैवेद्याला करा 'कोकोनट मलई खीर'; तांदळाच्या खिरीला खोबऱ्याचा ट्विस्ट!
14
अमेरिकेतील मराठी शाळांना महाराष्ट्र सरकारतर्फे अभ्यासक्रम पुरवणार; आशिष शेलारांचे आश्वासन
15
थायलंड-कंबोडिया संघर्ष दुसऱ्या दिवशीही सुरूच; आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू; UN'ने बोलावली आपत्कालीन बैठक
16
NSDL IPO: बहुप्रतीक्षित एनएसडीएल आयपीओचा प्राईज बँड निश्चित; GMP किती, कधीपासून गुंतवणूक करू शकता? जाणून घ्या
17
पहिला श्रावणी शनिवार: अश्वत्थ मारुती व्रताचरण; कसे करावे पूजन? पाहा, व्रतकथा अन् महात्म्य
18
आता नाशिकची वाईन अन् केरळची ताडी थेट ब्रिटनमध्ये मिळणार! यूकेमध्ये विक्रीचा मार्ग मोकळा
19
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
20
ना स्टॅाक ना SIP.., रिटर्नसाठी PPF सर्वांचा बॅास; केवळ १ लाखातून बनेल १ कोटींचा फंड

SSC Exam 2025: पहिलाच पेपर एकदम सोपा; विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य, आता वेध इंग्रजीचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 11:23 IST

विद्यार्थी वर्गात प्रश्नपत्रिका सोडवतात. मात्र, परीक्षा केंद्रावर बसलेल्या पालकांच्या चेहऱ्यावर परीक्षेचा ताण स्पष्टपणे जाणवत असल्याचे दिसून येतो

पुणे: दहावीच्या विद्यार्थ्यांचा पहिलाच पेपर मराठीचा होता आणि तो एकदम छान गेल्याच्या भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. वर्षभर केलेला अभ्यास, सराव, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि कृतीपत्रिकेची काठिण्य पातळी कमी झाल्याने परीक्षेचा पहिलाच पेपर सोपा गेला. त्यामुळे पेपर संपल्यानंतर सर्वांच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली. आता सर्वांना इंग्रजी विषयाच्या पेपरचे वेध लागल्याचे दिसून आले. सुरुवात तर छान झाली, त्यामुळे सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला शुक्रवार (दि. २१)पासून सुरुवात झाली. परीक्षेसाठी १६ लाख ११ हजार ६१० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत विद्यार्थी संख्येत वाढ झाली आहे. परीक्षेदरम्यान कॉपी आणि तत्सम गैरप्रकार रोखण्यासाठीच्या परीक्षा केंद्रात उपाययोजना केल्या होत्या. विद्यार्थ्यांना साडेदहा वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याच्या सूचना असल्याने विद्यार्थी १० वाजताच केंद्रावर पोहोचले. दहावी बोर्डाच्या परीक्षेला मुले सामोरे जात असल्यामुळे शहरातील विविध केद्रांवर पालकांनी गर्दी केली होती.

पहिला पेपर असल्याने मुलाला सोडायला अनेकजण कुटुंबासह आले होते. यावेळी परीक्षा केंद्रात कडक बंदोबस्त होता. परीक्षा केंद्रात प्रवेश करताना विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. त्यांनी सोबत आणलेली बॅग तपासली, तसेच कोणी चप्पल, बुटामध्ये कॉपी लपवली नाही ना, याचीही खात्री करण्यात येत होती. इतर काही साहित्य सापडले, तर ते प्रवेशद्वारावर जमा करण्यात येत होते.

सकाळच्या सत्रात प्रथम भाषा मराठीसह हिंदी, उर्दू, भाषेचा पेपर होता. पहिला पेपर मराठीचा असल्याने अनेकांच्या चेहऱ्यावर काहीसे दडपण असल्याचे चित्र होते. प्रश्नपत्रिका हाती पडल्यानंतर सोप्या कृतीमुळे पेपर सोडविणे अधिक सहज झाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. प्रश्नांची काठिण्य पातळी अधिक नसल्याचेही विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले. पहिला पेपर सोपा गेल्याने विद्यार्थी, विद्यार्थिनी आनंदी चेहऱ्याने परीक्षा केंद्रातून बाहेर पडताना दिसले.

विद्यार्थ्यांऐवजी पालकच चिंतेत

बारावीच्या मुलांना बोर्डाच्या परीक्षेचा सराव झालेला असतो. त्यामुळे पालकही बिनधास्त असतात. मात्र, दहावीच्या परीक्षेला पालक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर सोडण्यास येतात. पेपर होईपर्यंत परीक्षा केंद्रावरच बसून राहतात. विद्यार्थी वर्गात प्रश्नपत्रिका सोडवतात. मात्र, परीक्षा केंद्रावर बसलेल्या पालकांच्या चेहऱ्यावर परीक्षेचा ताण स्पष्टपणे जाणवत असल्याचे दिसून येते.

 

टॅग्स :Puneपुणेssc examदहावीEducationशिक्षणStudentविद्यार्थीTeacherशिक्षकSchoolशाळा