शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

देशाचे भाग्य तेव्हाच बदलते, जेव्हा जनता उभी राहते - सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 09:51 IST

आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आता जगभरातील लोक ऐकतात, कारण भारताची शक्ती जगाला समजली आहे

पुणे: अयोध्येत राम मंदिर उभे राहिले, कळस लागला. आता राष्ट्र मंदिर उभे करायचे आहे. भारत देश मोठा करणे हे केवळ संघाचे काम नाही. देशाचे भाग्य तेव्हाच बदलते, जेव्हा देशातील जनता उभी राहते. संपूर्ण समाज संघटित झाला तरच राष्ट्रवैभव संपन्न होईल आणि विश्वाचे कल्याण होईल, त्यासाठी समाजातील प्रत्येक माणूस उभा राहिला पाहिजे, असे मत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. आपल्या पंतप्रधानांना आता जगभरातील लोक ऐकतात. कारण भारताची शक्ती जगाला समजली आहे. तुम्ही ३० वर्षे उशिरा का आलात?, असे काहीजण विचारतात. आम्ही पूर्वीपासून इथेच आहोत, तुम्हाला आता महत्त्व लक्षात आले, असे त्यांना सांगावे लागते, असेही ते म्हणाले.

कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण सभागृहात आदित्य प्रतिष्ठानतर्फे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती स्वामी तसेच आदित्य प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष शंकर अभ्यंकर आणि अपर्णा अभ्यंकर उपस्थित होते. याप्रसंगी ‘भारतीय उपासना’ या खंडाच्या तृतीय आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. शंकर अभ्यंकर यांनी लिहिलेले कृतज्ञता पत्र, सरस्वती देवीचे मानचिन्ह आणि एक लाख रुपयांची गुरुदक्षिणा डॉ. मोहन भागवत यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. जितेंद्र अभ्यंकर यांनी पत्राचे वाचन केले. आदित्य अभ्यंकर यांनी सूत्रसंचालन केले.

डॉ. भागवत म्हणाले, हिंदू समाजाचे शील आहे, वसुधैव कुटुंबकम्. 'परंपरेने मिळालेले अधिष्ठान हे शाश्वत सत्य आहे. सर्वांना मिळून चालायचे असेल तर धर्म आवश्यक आहे. सनातन धर्माचे उत्थान म्हणजे हिंदू राष्ट्राचे उत्थान आहे. संघ हा संकटातून टिकून इथवर आला ही स्तुती ठीक आहे. पण, त्याला इतकी वर्षे का लागली? असा प्रश्न विचारला जातो. शताब्दी वर्ष हा गौरवाचा तसेच आत्मपरीक्षणाचा विषय आहे, संपूर्ण समाज संघटित झाला तर राष्ट्र संपन्न होईल.शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती म्हणाले, काही काळापूर्वी बहुमताचे आणि स्थिर सरकार मिळेल का?, अशी शंका होती. मात्र, भारतात संघाच्या साहाय्याने बहुमताचे सरकार आले आणि लोकशाही टिकून राहिली. पूर्वी 'यथा राजा, तथा प्रजा' असे म्हटले जायचे. आता 'यथा प्रजा, तथा राजा', असा काळ आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Nation's destiny changes when people rise: RSS Chief Mohan Bhagwat.

Web Summary : RSS chief Mohan Bhagwat stated that India's strength is now globally recognized. He emphasized the need for societal unity for national prosperity and global welfare, highlighting the significance of Sanatan Dharma and the RSS's role in societal organization. A function was held to mark the centenary year of RSS.
टॅग्स :PuneपुणेMohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीMahayutiमहायुतीIndiaभारत