शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठे EVM मशिन बंद, कुठे बोगस मतदार, तर कुठे लांबच लांब रांग; नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू
2
"धनूभाऊ, तुमचा इंदौरमध्ये मर्डर झाला असता, पण भय्यूजी महाराजांनी वाचवलेलं"; रत्नाकर गुट्टेंचा मोठा गौप्यस्फोट
3
LOC वर ६९ लॉन्चिंग पॅड, १५० दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत; भारत पुन्हा 'ऑपरेशन सिंदूर' राबवणार?
4
देशातील सर्वात महागडी नंबर प्लेट पुन्हा विक्रीसाठी! १.१७ कोटींची बोली लावणाऱ्याचं पुढे काय झालं?
5
ठाण्यातील बेकायदा बांधकामे आतापर्यंत का पाडली नाहीत? बाळकुम, येऊरबाबत हायकोर्टाची विचारणा
6
Karad Bus Accident: कराड जवळ नाशिकमधील विद्यार्थ्यांच्या बसचा अपघात; २० फूट खड्ड्यात सहलीची बस कोसळली, ४५ जण जखमी
7
आता आणखी एका सरकारी बँकेतील हिस्सा विकणार सरकार; कोणती आहे बँक, किती कमाई होणार?
8
RSS मुख्यालयाच्या पार्किंगसाठी प्राचीन मंदिरावर बुलडोझर?; स्थानिकांचा आक्रोश, लोक संतापले
9
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजार; ८७ अंकांनी घसरुन २६,०८८ वर उघडला निफ्टी
10
इंजिनीअर तरुणीही रील्स स्टारच्या जाळ्यात; लग्नाच्या आमिषाने २२ लाखांची फसवणूक
11
अचानक बोगद्यात बंद पडली मेट्रो, लाईटही गेली; प्रवाशांनी मोबाईलचा टॉर्च लावून गाठलं पुढचं स्टेशन!
12
ट्रॉम्बे बनाना म्युटंट-९! 'टेरेस'वरच पिकवा केळी; दीड महिन्यात तयार!
13
धक्कादायक! प्रियकराने प्रेयसीची हत्या केली, पोलिसांसमोर त्याचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
14
मजा! सोहम-पूजा आज सप्तपदी घेणार, हळद-संगीत फंक्शनमध्ये नवरीच्या डान्सवर खिळल्या नजरा
15
Raj Nidimoru Net Worth: 'द फॅमिली मॅन'चे दिग्दर्शक राज निदिमोरु किती आहेत श्रीमंत? चुपचाप केलं असं काम की होतेय चर्चा?
16
Video: मालवणात मध्यरात्री हायव्हॉल्टेज ड्रामा; भाजपा पदाधिकाऱ्याच्या कारमध्ये सापडली लाखोंची रोकड?
17
पाकिस्तानी विमाने भारतीय हवाई हद्दीत उड्डाण करतील, पाकिस्तानचा अजेंडा ४ तासांत उद्ध्वस्त
18
प्रभादेवी पूल पाडकामासाठी १५ तास ब्लॉक कसा घ्यावा? 'मध्य'ला प्रश्नः ४० एक्सप्रेस १२५० लोकलवर प्रभाव
19
Sanchar Saathi: 'संचार साथी'वर संशयाचे ढग! ॲपच्या अनिवार्यतेवरून विरोधकांनी उठवले रान!
20
Local Body Elections Voting: राज्यातील २६४ नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी आज मतदान
Daily Top 2Weekly Top 5

देशाचे भाग्य तेव्हाच बदलते, जेव्हा जनता उभी राहते - सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 09:51 IST

आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आता जगभरातील लोक ऐकतात, कारण भारताची शक्ती जगाला समजली आहे

पुणे: अयोध्येत राम मंदिर उभे राहिले, कळस लागला. आता राष्ट्र मंदिर उभे करायचे आहे. भारत देश मोठा करणे हे केवळ संघाचे काम नाही. देशाचे भाग्य तेव्हाच बदलते, जेव्हा देशातील जनता उभी राहते. संपूर्ण समाज संघटित झाला तरच राष्ट्रवैभव संपन्न होईल आणि विश्वाचे कल्याण होईल, त्यासाठी समाजातील प्रत्येक माणूस उभा राहिला पाहिजे, असे मत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. आपल्या पंतप्रधानांना आता जगभरातील लोक ऐकतात. कारण भारताची शक्ती जगाला समजली आहे. तुम्ही ३० वर्षे उशिरा का आलात?, असे काहीजण विचारतात. आम्ही पूर्वीपासून इथेच आहोत, तुम्हाला आता महत्त्व लक्षात आले, असे त्यांना सांगावे लागते, असेही ते म्हणाले.

कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण सभागृहात आदित्य प्रतिष्ठानतर्फे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती स्वामी तसेच आदित्य प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष शंकर अभ्यंकर आणि अपर्णा अभ्यंकर उपस्थित होते. याप्रसंगी ‘भारतीय उपासना’ या खंडाच्या तृतीय आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. शंकर अभ्यंकर यांनी लिहिलेले कृतज्ञता पत्र, सरस्वती देवीचे मानचिन्ह आणि एक लाख रुपयांची गुरुदक्षिणा डॉ. मोहन भागवत यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. जितेंद्र अभ्यंकर यांनी पत्राचे वाचन केले. आदित्य अभ्यंकर यांनी सूत्रसंचालन केले.

डॉ. भागवत म्हणाले, हिंदू समाजाचे शील आहे, वसुधैव कुटुंबकम्. 'परंपरेने मिळालेले अधिष्ठान हे शाश्वत सत्य आहे. सर्वांना मिळून चालायचे असेल तर धर्म आवश्यक आहे. सनातन धर्माचे उत्थान म्हणजे हिंदू राष्ट्राचे उत्थान आहे. संघ हा संकटातून टिकून इथवर आला ही स्तुती ठीक आहे. पण, त्याला इतकी वर्षे का लागली? असा प्रश्न विचारला जातो. शताब्दी वर्ष हा गौरवाचा तसेच आत्मपरीक्षणाचा विषय आहे, संपूर्ण समाज संघटित झाला तर राष्ट्र संपन्न होईल.शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती म्हणाले, काही काळापूर्वी बहुमताचे आणि स्थिर सरकार मिळेल का?, अशी शंका होती. मात्र, भारतात संघाच्या साहाय्याने बहुमताचे सरकार आले आणि लोकशाही टिकून राहिली. पूर्वी 'यथा राजा, तथा प्रजा' असे म्हटले जायचे. आता 'यथा प्रजा, तथा राजा', असा काळ आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Nation's destiny changes when people rise: RSS Chief Mohan Bhagwat.

Web Summary : RSS chief Mohan Bhagwat stated that India's strength is now globally recognized. He emphasized the need for societal unity for national prosperity and global welfare, highlighting the significance of Sanatan Dharma and the RSS's role in societal organization. A function was held to mark the centenary year of RSS.
टॅग्स :PuneपुणेMohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीMahayutiमहायुतीIndiaभारत