शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
5
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
6
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
7
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
8
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
9
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
10
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
11
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
12
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
13
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
14
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
15
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
16
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
17
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
18
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
20
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी

उरुळी कांचन येथे भीषण अपघात; भरधाव टेम्पोने नागरिकांच्या अंगावर घातली गाडी, दोघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 15:42 IST

अपघातानंतर आरोपी चालक घटनास्थळावरून पळून गेला, मात्र पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत त्याला ताब्यात घेतले

उरुळी कांचन: उरुळी कांचन परिसरातील तळवडे चौकामध्ये पुणे-सोलापूर महामार्गावर दिनांक २ जुलै २०२५ रोजी रात्री सुमारास एक भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे टेम्पो चालविल्यामुळे दोन नागरिकांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त वाहन टेम्पो चालक शशिकांत रोहिदास पवार (वय २४, रा. अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याने सदर वाहन भरधाव वेगाने चालवून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नागरिकांवर गाडी घातली. यामध्ये महबूब रहमान मियाडे (वय ६३, रा. सहजपूर, माकरवस्ती, ता. दौंड) आणि अशोक भीमराव (वय २५, रा. सावली, बिदर) यांचा जागीच मृत्यू झाला.

याव्यतिरिक्त लक्ष्मण बापूराव भारती (वय ६१), मैनुदिन लालमिया तांबोळी (वय ६७), वैशाली भागवत बनसोडे (वय ४०) आणि भागवत पेरू बनसोडे (वय ४०) हे जखमी झाले असून त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी काही जखमींच्या हातपायांना फ्रॅक्चर झाल्याचेही समजते. अपघातानंतर आरोपी चालक घटनास्थळावरून पळून गेला. मात्र पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत त्याला ताब्यात घेतले असून अटकेची तजवीज ठेवण्यात आली आहे. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा क्रमांक १९२/२०२५ अन्वये बीएनएस कलम २८१, १२५, १२५(अ), १२५(ब), १०५ तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४/१७७ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मीरा मटाले करीत आहेत. घटनास्थळी दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी  बापूराव दडस यांनी भेट दिली असून पोलीस निरीक्षक  शंकर पाटील यांनी देखील घटनास्थळाची पाहणी केली.

टॅग्स :Puneपुणेuruli kanchanउरुळी कांचनAccidentअपघातDeathमृत्यूPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी