शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

उपपदार्थ निर्मितीमुळे साखर उद्योगाला उभारी : आमदार संग्राम थोपटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:11 IST

नसरापूर : साखर कारखान्यांनी उपपदार्थ निर्मितीस साखर उद्योगाला नक्कीच चांगले दिवस येतील. त्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून साखर ...

नसरापूर : साखर कारखान्यांनी उपपदार्थ निर्मितीस साखर उद्योगाला नक्कीच चांगले दिवस येतील. त्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून साखर उद्योगात होत नेहमी होत असलेल्या बदलांचा स्वीकार करायला हवा. उसाच्या बाजारभाव स्पर्धेत टिकायचे असेल तंत्रज्ञानाच्या वापराने उपपदार्थांची निर्मिती करायला हवी यासाठी उपपदार्थ निर्मिती महत्त्वाची आहे, असे राजगड' कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाचा शुभारंभप्रसंगी राजगड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आ. संग्राम थोपटे यांनी मत व्यक्त केले.

भोर तालुक्यातील अनंतनगर-निगडे येथील राजगड सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाचे उद्घाटन संस्थापक, संचालक व माजी मंत्री अनंतराव थोपटे व कारखान्याचे अध्यक्ष आ. संग्राम थोपटे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी राजगड कारखान्याचे उपाध्यक्ष विकास कोंडे, मुंबई बाजार समितीचे उपाध्याक्ष धनंजय वाडकर, संचालक किसनराव सोनवणे, कृष्णाजी शिनगारे, पोपटराव सुके, राजेश काळे, शंकरराव धाडवे पाटील, शोभा जाधव, संभाजी मांगडे, विट्ठल कुंडले तसेच उत्तम थोपटे, दत्तात्रय चव्हाण, राजेंद्र कोंडे, संदीप नगीने, सोमनाथ वचकल, ज्ञानेश्वर कोंडे, कार्यकारी संचालक सुनीता महिंद, अंकुश इंगुळकर, राजेंद्र राजेशिर्के आदी मान्यवर व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केंद्र सरकारने इथेनॉल बाबत घेतलेले निर्णय व इथेनॉलला मिळणारा दर लक्षात घेवून राजगड सहकारी साखर कारखान्याने बी हेवी मोलॅसिसपासून अल्कोहोल तयार करण्याचे ठरविले आहे. इथेनॉलचे एक कोटी लिटर उत्पादन करण्यासाठी हेवी मोलॅसिसपासून अल्कोहोल तयार करून इथेनॉल निर्मिती करीत भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम व इंडियन ऑईल या तेल कंपन्यांशी करार केला आहे. कंपन्यांच्या मागणीनुसार इथेनॉलचा पुरवठा केला जाणार आहे. उपपदार्थ प्रकल्पातून आणि साखर उत्पादनातून ऊस उत्पादकांना योग्य दर देऊन सभासद व कामगारांचे जीवनमान उंचावण्यास नक्कीच मदत होईल, असे यावेळी आ. थोपटे यांनी सांगितले.

राजगड सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२०-२१ च्या ३० व्या गळीत हंगामात ४८ दिवसांत ६५ हजार ७७५ मेट्रिक टन ऊस गाळप झाले, साखर उत्पादन ५६ हजार २०० पोती झाले तर साखर उतारा सरासरी ८.७७टक्के आहे. गळीत हंगाम एप्रिल महिना अखेरपर्यंत २ लाख ५० हजार मेट्रिक टन उद्दिष्ट आहे, असे आ. थोपटे यांनी सांगितले.

आज अखेर ४८ दिवसांमध्ये ६५हजार७७५ मे. टन ऊसाचे गाळप करून ५६२०० साखर पोत्यांचे उत्पादन केलेले आहे. सरासरी साखर उतारा ८.७७ टक्के आलेला आहे. कारखान्याने गळीतास आलेल्या ऊसास पहिल्या हप्त्याचे पेमेंट लवकरच दिला जाईल. कारखान्याने गळीत हंगाम २०२०-२१ साठी अडीचलाख मे. टनांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व ऊस उत्पादक व पुरवठारधारक यांनी आपला नोंदलेला सर्व ऊस राजगड साखर कारखान्यास देवून सहकार्य करावे, अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. सुनील महिंद यांनी दिली.

"राजगड कारखाना डिस्टिलरी प्रकल्प यासह १८ मेगावॅट सहवीजनिर्मिती करणार आहे.

आ. संग्राम थोपटे, अध्यक्ष, राजगड सह. साखर कारखाना

राजगड इथेनॉल प्रकल्पाचे उद्घाटन करताना माजी मंत्री अनंतराव थोपटे,आमदार संग्राम थोपटे आदी मान्यवर उपस्थित होते.