शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

संशोधन करून विद्यार्थ्यांनी देशासाठी योगदान द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:15 IST

पुणे : देशाने मला काय दिले याचा विचार न करता मी समाजाला काय दिले, या दृष्टिकोनातून सर्व विद्यार्थ्यांनी विचार ...

पुणे : देशाने मला काय दिले याचा विचार न करता मी समाजाला काय दिले, या दृष्टिकोनातून सर्व विद्यार्थ्यांनी विचार करात नवनवीन संशोधनाच्या माध्यमातून देशासाठी योगदान देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलपती आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंगळवारी व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ११८ व्या पदवीप्रदान समारंभात कोश्यारी बोलत होते. या कार्यक्रमास लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत ऑनलाइन पद्धतीने तर विद्यापीठाच्या ज्ञानेश्वर सभागृहात पार पडलेल्या या समारंभात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र. कुलगुरू एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर, वाणिज्य व व्यवस्थापन शाखेचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर, आंतर-विद्याशाखीय अभ्यास शाखेचे अधिष्ठाता डॉ. संजीव सोनवणे, मानवविज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. अंजली कुरणे आदी उपस्थित होते. यावेळी १ लाख ६१ हजार ५९१ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र पोस्टाद्वारे देणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

कोरोनादरम्यान ऑनलाईन परीक्षा हे खूप मोठे आव्हान होते. मात्र, हे आव्हान ज्याप्रमाणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने स्वीकारले व यशस्वी करून दाखवले त्याप्रमाणे तुम्हीदेखील बदलता काळ स्वीकारत पुढे चलावे, असा संदेश यावेळी कोश्यारी यांनी विद्यार्थ्यांना दिला. कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी विद्यापीठामार्फत राबविण्यात आलेले उपक्रम व योजनांचा आढावा सर्वांपुढे मांडला. तसेच पुढील १० वर्षांच्या वाटचालीची पायाभरणी चार वर्षांत केली असल्याचे त्यांनी सांगितले.

--------

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या समारंभात वेदांत मुंदडा या विद्यार्थ्याला ‘द प्रेसिडेंट ऑफ इंडिया, डॉ. शंकर दयाळ शर्मा सुवर्णपदक’ प्रदान करण्यात आले. सन २०१९-२० चा ‘बेस्ट स्टुडंट’चा मानही वेदांतने पटकावला.

(फोटो- वेदांत मुंदडा)

----------

सुमित्रा महाजन म्हणाल्या, शिक्षण पूर्ण झाल्यावर आपण नोकरीत पॅकेजचा विचार करतो. परंतु, त्याबरोबर आपण समाजाचे देणे लागतो, याचाही विचार असावा. प्रत्येकाने समाजाप्रतीची संवेदनशीलता कायम जपली पाहिजे.

----------------

उदय सामंत म्हणाले, विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षा घेण्याची कामगिरी उल्लेखनीय आहे. तसेच नवे शैक्षणिक धोरण आत्मसात करण्यातही विद्यापीठ पुढे आहे. कोरोना काळात ‘एनएसएस’ च्या विद्यार्थ्यांनी खूप मोठे समाजकार्य केले याचे मला कौतुक आहे.

---------