शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

दरवर्षी पाण्याखाली जाणाऱ्या पुण्यातील 'भिडे'पुलाची गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2020 10:59 IST

जोपर्यंत पुण्यातील भिडे पुलावरून पाणी वाहत नाही तोपर्यंत पुणेकर दमदार पाऊस झाला असे मानायला चुकुनही तयार होणार नाही.

ठळक मुद्देगुरुवारी रात्री १६,५०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू

पुणे : मुंबईत पाऊस झाला आहे हे समजतं ते हिंदमाता जवळ पाणी भरल्यावर, नाशिकमध्ये दुतोंडया मारुतीच्या बरोबरीने गोदावरी नदीत पाणी वाहू लागल्यावर आणि पुण्यात भिडे पूल पाण्याखाली गेल्यावर...  जोपर्यंत पुण्यातील भिडे पुलावरून पाणी वाहत नाही तोपर्यंत पुणेकर दमदार पाऊस झाला असे मानायला चुकुनही तयार होणार नाही. दरवर्षी पावसाळ्यात पुणेकर भिडे पूल पाण्याखाली गेला हे वाक्य ऐकण्यासाठी प्रचंड आतुर असतात.ते एकदा का कानावर पडलं की पुणेकरांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतं अफाट समाधान..

गुरुवारी रात्री खडकवासला धरणातून १६,५०० क्युसेकने शहरातून वाहणाऱ्या मुठा नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात आला आणि बघता बघता भिडे पाण्याखाली गेला..

पुण्याच्या या' भिडे पुला'वर तर सोशल मीडियावर असंख्य मिम्स व्हायरल होतात. हास्याचा महापुर घडवून आणणारा अन् पुणेकरांच्या जीवनाचा स्वाभिमान बनलेला भिडे पूल सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. याच 'भिडे'पुलाची ही गोष्ट..

  १९९६ सालची गोष्ट. पुण्यामध्ये आजच्यासारखी गर्दीही नव्हती, वाहनांची दाटीही नव्हती. पेठांमधून डेक्कनकडे जाण्यासाठी छोटासा कॉजवे किंवा पूल होता. पण जसजशी फर्ग्युसन,bmcc ,mmcc या कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची वर्दळ वाढू लागली तसा हा पूल कमी पडू लागला आणि मग तो पाडून बांधण्यात आला हाच बाबा भिडे पूल. बाबा भिडे हे जेष्ठ विधिज्ञ होते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक त्यांचेच नाव या पुलाला देण्यात आले. बाकी वर्षभर या पुलावरून दररोज हजारो वाहनांची ये-जा सुरू असते. चार चाकी वाहनांना परवानगी नसली तरी त्याही सर्रासपणे या पुलाचा वापर करतात.

पुढे झालं असं की पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी सर्वात लहान आणि जेमतेम सव्वा टीएमसी क्षमता असलेलं धरण आहे ते खडकवासला. त्यामुळे खडकवासला धरण अगदी चार-पाच दिवसाच्या मुसळधार पावसाने सुद्धा भरते. शिवाय हे धरण शहरालगत असून बाकीचे पाणलोट क्षेत्रातील सर्व धरणे बऱ्यापैकी उंचीवर आहे. त्यामुळे तिथून येणारे पाणी खडकवासल्यात साठवलं जाते.खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला की तो साधारण पंधरा ते अठरा हजार क्‍युसेक च्या दरम्यान आल्यावर भिडे पूल पाण्याखाली जातो आणि मग दरवर्षी प्रमाणे "यंदाही बाबा भिडे पूल पाण्याखाली" अशा  स्वरूपाच्या बातम्या यायला सुरुवात होते.

आता गंमत अशी आहे की भिडे पूल हा पूल आहे की रस्ता आहे याची शंका यावी अशा पद्धतीने बांधला आहे. इतका कमी उंचीचा आहे आणि रस्ताच्या उंचीला आहे की इतरवेळी तो सर्वसाधारण रस्ता देखील वाटू शकतो. अगदी पाण्याखाली जाण्याच्या एक तास आधीपर्यंत सुद्धा पुलावरून बिनधास्तपणे वाहतूक सुरू असते पण एकदा का पुल पाण्याखाली गेला की मग पुणेकर पुरेसा पाऊस झाल्याचा सुस्कारा सोडतात. पूर्वी लहान मुलांना भिडे पूल पाण्याखाली गेल्यानंतर पूर दाखवायला आणलं जायचं  पण आता  बदलत्या काळाप्रमाणे त्याचे फोटो काढले जातात वायरल केले जातात  मी ठेवले जातात स्टेटस ठेवले जातात पण काहीही असलं तरीही हा पुणेकरांच्या सार्वजनिक जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे हे विसरून चालणार नाही.

टॅग्स :PuneपुणेriverनदीWaterपाणीmula muthaमुळा मुठाRainपाऊसDamधरण