शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

स्मार्ट पुण्याची अंधारमय पिढी; झटपट पैसे मिळवण्याच्या नादात अल्पवयीन वळतायेत गुन्हेगारीकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2022 15:14 IST

झटपट पैसा मिळविण्याच्या आमिषाने अल्पवयीन गुन्हेगारीकडे वळत आहेत

नम्रता फडणीस

पुणे: रस्त्यावर बिनधास्तपणे ट्रिपल सीट जाणारी... गाडीला चुकून धक्का लागला तर अंगावर धावून जात हाणामाऱ्यांवर उतरणारी... हातात तलवारी घेऊन दहशत पसरविणाऱ्या सराईत गुंडांबरोबर लीलया वावरणारी... पादचाऱ्यांच्या हातून मोबाइल हिसकावून पळून जाणारी ही अल्पवयीन मुलेच हळूहळू गुन्हेगारी विश्वाचा चेहरा बनू लागली आहेत. झटपट पैसा मिळविण्याच्या आमिषाने ते गुन्हेगारीकडे वळत आहेत.

गुन्हेगारी मार्गाकडे वळणाऱ्या अल्पवयीनांमध्ये झोपडपट्टी भागातील मुलांचे प्रमाण अधिक आहे. बाल न्याय अधिनियम कायद्यांतर्गत गेल्या दहा महिन्यांत जवळपास ३५३ गुन्हे अल्पवयीनांवर दाखल झाल्याचे दिसून येत आहे. अवघ्या दिवसांवरच बालदिन येऊन ठेपला आहे. हा बालदिन साजरा करीत असतानाच अल्पवयीन मुलांचे गुन्हेगारीमधील हे वाढते प्रमाण पालक, समाज आणि पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरले आहे.

ही आहेत कारणे

- अल्पवयीन मुलांना फारशी गंभीर शिक्षा होत नसल्याने टोळ्यांकडून अल्पवयीन मुलांना लक्ष्य करणे सहज सोपे झाले आहे. हाणामाऱ्या असाे किंवा वाहन चोरी. या गुन्ह्यांमध्ये मुलांचा वापर मोठ्या प्रमाणावर हाेत आहे.- आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने कोरोना काळात ऑनलाइन शिक्षण घेऊ न शकणारी अनेक मुले शिक्षणापासून कायमची दुरावली आहेत. यातच आई-वडील विभक्त राहत असल्याचा फटकाही मुलांना बसत आहे.- पालक कामानिमित्त घराबाहेर जात असल्याने घरात मुलाकडे लक्ष द्यायला वेळ नाही, अशी स्थिती आहे. मुलगा नक्की कुणाच्या संगतीत आहे?, तो कुणाबरोबर जातो, याचा बहुतांश पालकांना पत्ताच नाही, ही वस्तुस्थिती आहे.

पाेलीस म्हणतात...

- मुलगा एखादा गुन्ह्यात सापडतो तेव्हाच पालकांना कळते. त्यामुळे मुलांना गुन्ह्यांपासून प्रवृत्त करण्यासाठी पोलीस दलानेच कंबर कसली आहे.- ‘होप फॉर चिल्ड्रन’सारख्या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून शहरातील सर्व पोलीस ठाण्यात कृती कार्यक्रम राबविला जात आहे.- शहरातील ३२ पोलीस ठाण्यात बाल कल्याण पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. यात पालकांशी संवाद साधून गुन्हेगारीमागची कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातोय.- जी मुले शिक्षणापासून दुरावली आहेत. त्यांना शिक्षण पूर्ण करायचे असल्यास स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून संधी दिली जात आहे. चोऱ्या-माऱ्या सोडायला लावण्याच्या दृष्टीने मुलांना व्होकेशनल कोर्सेस दिले जात आहेत.

''परिमंडळ १ च्या सर्व पोलीस ठाण्यात दि. २ नोव्हेंबरपासून हा उपक्रम राबविण्यात आला आहे. टप्प्याटप्प्याने उर्वरित चारही परिमंडळात हा कृती कार्यक्रम घेण्यात येणार आहे. - अर्चना कटके, सहायक पोलीस निरीक्षक, भरोसा सेल''

''महाराष्ट्रात जास्त पैसे मिळत असल्याने इतर राज्यांतील मुले पळून महाराष्ट्रात येत आहेत. स्थानिक अल्पवयीन मुलेदेखील झटपट पैसे मिळविण्याच्या आमिषाने गुन्हेगारीकडे वळत आहेत. अल्पवयीन मुलांना तीन महिन्यांच्या आत सोडून देतात, हे टोळीप्रमुख आणि सराईत गुन्हेगारांना माहीत असल्याने त्यांनाच गुन्ह्यात वापरून घेतले जात आहे. तलवारीने केक कापल्याचा फोटो स्टेटसवर ठेवणे, फाेटाे व्हायरल करून गुन्हेगारीकडे ही पिढी आकर्षित केली जात आहे. - ॲड. यशपाल पुरोहित, सदस्य, बाल न्याय मंडळ''

कायदा काय सांगतो?

- बाल न्याय अधिनियम (काळजी व संरक्षण) २०१५ नुसार सात ते अठरा वर्षांखालील ज्याने गुन्हा केल्याची शक्यता आहे, अशा बालकांविषयी निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार बाल न्याय मंडळास आहेत.- पोलिसांनी बालकाला ताब्यात घेतल्यास २४ तासांच्या आत बाल न्याय मंडळासमोर हजर करणे आवश्यक आहे.- बालक पोलिसांच्या ताब्यात असताना त्याला हातकडी लावणे, मारहाण करणे, पोलीस कोठडी अथवा कारागृहात ठेवण्यास मनाई आहे. तसेच पालकांसह परिवीक्षा अधिकारी यांना कळविणे बंधनकारक आहे.- बालकांची जमानत नाकारल्यास निरीक्षणगृहात त्याची तात्पुरती व्यवस्था करणे आवश्यक आहे.- बेकायदेशीर कृत्यासाठी बालकांचा वापर करणारी व्यक्ती कठोर कारावास व शिक्षेस पात्र समजली जाईल.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSocialसामाजिक