शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
2
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
3
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
4
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
5
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
6
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
7
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
8
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
9
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
10
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
11
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
12
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
13
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
14
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
15
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
16
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन
17
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
18
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
19
Energy Mission Machineries IPO: ₹१३८ वर आलेला IPO, लिस्टिंगच्या दिवशीच १६५%ची वाढ; ₹३६६ वर गेला 'हा' शेअर
20
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा

विजेचा खोळंबा होऊनही येईना जाग!, बाणेरमधील तीन सोसायट्यांमधील परिस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 3:12 AM

बाणेर गावठाणातील प्रीमरोझ सोसायटी, दत्त पॅलेस, सनफ्लॉवर मॉल व सोसायटी या इमारतींमधील वीज तांत्रिक बिघाडामुळे रात्री १२ ते सकाळी १० गायब होत होती. नागरिकांनी दिलेल्या तक्रारींच्या निवेदनाबाबत महावितरणच्या अधिका-यांनी तक्रारीच खोट्या असल्याची प्रतिक्रिया दिल्याने

पुणे : बाणेर गावठाणातील प्रीमरोझ सोसायटी, दत्त पॅलेस, सनफ्लॉवर मॉल व सोसायटी या इमारतींमधील वीज तांत्रिक बिघाडामुळे रात्री १२ ते सकाळी १० गायब होत होती. नागरिकांनी दिलेल्या तक्रारींच्या निवेदनाबाबत महावितरणच्या अधिका-यांनी तक्रारीच खोट्या असल्याची प्रतिक्रिया दिल्याने नागरिक हतबल झाले. तब्बल वर्षभर डीपीवरील वेलींचे जाळी काढण्याची विनंती दुर्लक्षित केली गेल्याने आणि डीपीमध्ये बिघाड झाल्याने सतत पंधरवडाभर नागरिकांचे हाल झाले.महावितरणच्या डीपीच्या खांबावर वेलींनी जाळे केल्याने व तांत्रिक कारणांमुळे वीज जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पावसामुळे वेली भिजल्यावर शॉर्ट सर्किट होऊन अनेक तास वीजपुरवठा गायब होत असे. ऐन परीक्षेच्या दिवसांमध्ये हा त्रास झाल्याने येथील नागरिकांमध्ये संताप होता. वीज गायब झाल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढून रात्री झोप येणेही अवघड बनल्याचे एका रहिवाशाने नमूद केले.महावितरणच्या औंध कार्यालयाकडे ५ ते ६ हजार मीटर आणि १५ ते २० कर्मचारी आहेत. वीजबिल एखाद्याने भरलेले नसल्यास महावितरणला तत्काळ माहिती मिळण्याची व्यवस्था केली गेली आहे. वीजपुरवठा गायब झालेला असल्यास ते समजण्याची यंत्रणा मात्र नाही, याबद्दल नागरिकांनी खेद व्यक्त केला. बिल न भरल्यास तत्काळ वीजपुरवठा खंडित करण्याची तत्परता दाखविणाºया महावितरणकडे रात्रीच्या वेळी कर्मचारीच नसल्याने नागरिकांना नाहक अंधारात बसावे लागले. वेली काढण्याबाबत वारंवार निवेदने, तक्रारी देऊनही त्याची दखल घेतली जात नव्हती. गेल्या पंधरवड्यात रोज रात्री वीजपुरवठा गायब होत असे. विद्यार्थ्यांचे, कामावर लवकर जाणाºयांचे विजेअभावी पाणीपुरवठा नसल्याने हाल होत होते. महावितरणचा कर्मचारी बिघाड दुरुस्त करण्यासाठी कधी सकाळी सात, तर कधी दहा वाजता उगवत होता. त्यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले होते.तीन सोसायट्यांच्या तक्रारीचे निवेदन औंध येथील महावितरणच्या अधिकाºयांना देण्यात आले. स्थानिक नगरसेवकांकडेही त्याची प्रत देण्यात आली. तथापि, महावितरणच्या अधिकाºयांनी या तक्रारीच खोट्या असल्याचा आरोप केला. सत्य जाणून घेण्याऐवजी, दोषनिवारण करण्याऐवजी खोटेपणाचे आरोप केले गेल्याने निवेदन घेऊन गेलेल्या नागरिकांना वाईट वाटले. तक्रारींचे लेखी अर्ज अधिकाºयांनी तपासून पाहिले पाहिजेत, अशी त्यांची मागणी आहे.महावितरणच्या अधिकाºयांनी नागरिकांच्या प्रश्नांबाबत किमान संवेदनशीलता तरी दाखवावी, अशी या रहिवाशांची अपेक्षा आहे. वीज गायब झाल्याने होणारे हाल अधिकाºयांनी जाणून घेतल्यास तक्रार करण्याची वेळच येणार नाही, असे नागरिकांनी सांगितले.बूरे दिनचा प्रत्ययडीपीवरील वेली काढल्या गेल्याने आठ दिवसांपासून या सोसायट्यांचा वीजपुरवठासुरळीत झाल्याने नागरिकांना किमान दिवाळी तरी साजरी करता आली. औंध महावितरण कार्यालयात रात्रपाळीसाठी कर्मचारी नसल्याने तब्बल १५ दिवस या नागरिकांना वैताग येऊन अच्छे दिनऐवजी बूरे दिनचा प्रत्यय आला. शासनात बदल होऊनही काहीही बदलले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Puneपुणे