शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

एकेक किरण तेजाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:08 IST

निष्ठा, समर्पण असेल तरच होईल यूपीएससीचे शिखर सर अभिजित कोळपे केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) म्हणजे लांब पल्ल्याची, सहनशक्तीची दीर्घकाळ ...

निष्ठा, समर्पण असेल तरच होईल यूपीएससीचे शिखर सर

अभिजित कोळपे

केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) म्हणजे लांब पल्ल्याची, सहनशक्तीची दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. त्यात यशस्वी व्हायचे असेल तर निष्ठा, समर्पण हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे सातत्याने रोज अभ्यास करणे आणि हळूहळू गती वाढवत न्यावी लागते. तरच यूपीएससीचे शिखर सर करता येते, असा मोलाचा सल्ला केवळ दुसऱ्याच प्रयत्नात देशात ५४ वा क्रमांक मिळवलेले आणि सध्या कर्नाटक राज्यातील टुमकुर जिल्ह्यातील टिपचूरचे सहायक आयुक्त म्हणून कार्यभार पाहणारे दिग्विजय बोडके देतात.

दिग्विजय बोडके हे मूळचे नांदेड जिल्ह्यातील देगलूरचे. परंतु, त्यांचे संपूर्ण शिक्षण ठाणे शहरात झाले. तर पुण्यातील एमआयटी महाविद्यालयातून त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदवी मिळवली आहे. त्यांचे वडील हे आयएएस असून ते महाराष्ट्रात कार्यरत आहेत. त्यामुळे दिग्विजय यांना प्रशासकीय सेवेचे बाळकडू आणि पाठिंबा घरातूनच मिळाला आहे. सुरुवातीला त्यांनी दिल्ली येथे यूपीएससीचे सहा महिने प्रशिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी संपूर्ण तयारी घरूनच केली. पहिल्या प्रयत्नात यूपीएससीत यशस्वी होत भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) पद मिळवले. तर महाराष्ट्र वनसेवा परीक्षेत राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला. मात्र, सुरुवातीपासून आयएएस होण्याचा निर्धार केल्याने आयपीएस पद न स्वीकारता आयएएससाठी प्रयत्न सुरू केले. केवळ दुसऱ्याच प्रयत्नात २०१८ साली संपूर्ण देशात ५४ रँक मिळवत आयएएस पद मिळवले.

दिग्विजय बोडके सांगतात की, तुम्ही किती तास अभ्यास करता यापेक्षा किती गुणात्मक करता हे जास्त महत्त्वाचे आहे. योग्य मार्गदर्शन घेत त्याप्रमाणे नियोजन आखून फोकस पद्धतीने, गुणात्मक अभ्यास यूपीएससी परीक्षेसाठी अत्यंत गरजेचा आहे.

National Council Educational Research Training म्हणजे NCERT ची पाचवी ते बारावीपर्यंतची पुस्तके यूपीएससीसाठी महत्त्वाची असून तो पाया आहे. तसेच मी पूर्व आणि मुख्य परीक्षेत कोणताही फरक न करता दोन्ही परीक्षांचा एकत्रित अभ्यास केला. अडचणी आल्यावर संदर्भ साहित्य, पुस्तके, मार्गदर्शक आणि गुगल-यू-ट्यूब वरून तपासून घेतले. (सोशल मीडियाचा वापर गरजेपुरताच केला. इतर वेळेस सोशल मीडियापासून दूर राहिलो.)

---

एका-एका विषयाचे १००-१०० पेपर सोडवले

यूपीएससी परीक्षेत लेखन सराव अत्यंत महत्त्वाचा आहे. बराच वेळा प्रश्नांची उत्तरे माहिती असून देखील लिहिताना वेळ पुरत नाही. त्यामुळे हातातील गुण मिळत नाही. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांने लेखन सरावाकडे गांभीर्याने पाहावे. मी स्वतः वैकल्पिक भूगोल विषयाचे दोन आणि सामान्य अध्ययनचे चार पेपर तसेच निबंध या प्रत्येकाचे १००-१०० पेपर मी सोडवले. अनेकांना हे अशक्य वाटते. पण मी सुरुवातीपासून सातत्याने सराव केला. त्यामुळे मला यश मिळाले.

----

‘प्लॅन-बी’चा प्रत्येकाने विचार करावा

सध्याच्या घडीला विचार केल्यास यूपीएससी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांने ‘प्लॅन-बी’चा विचार करायला हवा. कारण यूपीएससी दर वर्षी केवळ १००० च्या आसपास जागा भरते. मात्र, त्यासाठी संपूर्ण देशभरातून १५-१६ लाख विद्यार्थी अर्ज भरतात. त्यामुळे प्रचंड स्पर्धा वाढली आहे. तसेच यापुढे ती आणखी वाढत जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांने करिअरच्या दृष्टीने ‘प्लॅन-बी’चा विचार करणे आवश्यक आहे.