शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण मुंबईत धनुष्यबाण विरुद्ध मशाल! यामिनी जाधवांना अरविंद सावंतांविरोधात उमेदवारी जाहीर
2
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
3
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
4
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
5
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
6
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
7
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव
8
शरद पवार हेच महाराष्ट्राचा आत्मा, मोदींना ४ जूनला कळेल; जयंत पाटलांचा पलटवार
9
रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने सर्वच हैराण
10
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
11
होय माझा आत्मा भटकतोय! शरद पवारांचा शिरुरमधून नरेंद्र मोदींवर पलटवार, 'मी लाचार होणार नाही'
12
मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला, लोकसभा निवडणुकीदररम्यान आपला मोठा धक्का  
13
रणबीर-आलियाच्या फुटबॉल टीमची Finals मध्ये एन्ट्री, स्टेडियममध्ये केलं सेलिब्रेशन
14
'10 वर्षांपूर्वी देशात रिमोट कंट्रोलचे सरकार होते', लातूरमधून PM मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका
15
IPL 2024 LSG vs MI: बर्थ डे बॉय रोहित शर्माचा 'जबरा फॅन', हिटमॅनच्या कृतीनं जिंकली मनं!
16
Rohit Sharma Record, Mumbai Indians IPL 2024: 'बर्थडे बॉय' रोहितला आजच्या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी, हव्यात फक्त 'इतक्या' धावा
17
“राम मंदिराच्या लोकार्पणात गरीब अन् शेतकरी कुठे दिसले का?”; राहुल गांधींचा थेट सवाल
18
Guru Gochar 2024: बारा वर्षांनी वृषभ राशीत होणार गुरुबदल; वर्षभर अनेक शुभ-अशुभ घटना घडणार ; वाचा!
19
‘एकत्र येऊन मतांचा जिहाद करा’, काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पुतणीचा व्हिडीओ व्हायरल  
20
'युपीत असते, तर उलटं टांगून...', सीएम योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल

“१९९२ साली संपूर्ण शिवतीर्थ भरलं होतं; अन् अचानक बाळासाहेब म्हणाले.."; राज ठाकरेंनी सांगितला 'तो' रंजक किस्सा 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2021 5:19 PM

मी माझ्या शालेय जीवनात कधीही वक्तृत्व स्पर्धेत भाग नाही घेतला. बोलायला भीती वाटायची. लोकांसमोर जायचं कसं, बोलायचं कसं असा प्रश्न मला पडायचा.

पुणे : १९९२ साली संपूर्ण शिवतीर्थ भरलं होतं. बाळासाहेबांच्या शेजारीच मी बसलो होतो. याप्रसंगी व्यासपीठावर अनेक नेतेमंडळी सुद्धा हजर होते. अचानक बाळासाहेब मला म्हणाले, तू बोलणार आहेस ना. मी म्हटलं, तू काहीतरी बोलू नकोस हा…. नाही तर मी येथून निघून जाईल. त्यावर बाळासाहेब म्हणाले, नाही नाही, तू आज बोललंच पाहिजे. हे सर्व आम्हा दोघांचं सुरू होतं.. आणि एकदम बाळासाहेब म्हणाले, तू बोलतोयस की मी जाऊन जाहीर करू.. अशाप्रकारे  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर केलेल्या आयुष्यातील पहिल्या भाषणाचा रंजक किस्सा सांगितला. 

मनसे प्रमुख राज ठाकरे हे शनिवारी (दि. ४) पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मनसेच्या वतीने आयोजित ''शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या १०० व्या वाढदिवसानिमित्त शिवशाहीर करंडक स्पर्धेच्या अंतिम सोहळ्याला उपस्थिती लावली. या कार्यक्रमाला मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे, माजी नगरसेविका रुपाली पाटील यांच्यासह मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. 

राज ठाकरे म्हणाले, इतक्या लोकांसमोर माझ्या आयुष्यातील पहिले भाषण मी शिवतीर्थावर दिले. तोपर्यंत माझी पुढे जाऊन बोलायची हिंमत होत नव्हती. मी कधी बोलू शकेल आणि भाषण करू शकेल. यावर देखील माझा कधीच विश्वास नव्हता. 

आजपर्यंत मी अनेक वक्ते ऐकले आहेत. आमच्या घरात तर माननीय बाळासाहेब होतेच. शिवाय श्रीपाद अमृत डांगे, जॉर्ज फर्नाडिस, अटलबिहारी वाजपेयीजी यांसारख्या अनेक वक्त्यांना मी अगदी जवळून पाहिले व ऐकले सुद्धा आहेत.,मात्र  हे लहानपणापासून जरी अनेक दिग्ग्ज वक्त्यांना मी पाहत आलो असलो तरी आयुष्यात कधी बोलेल, असं कधीच वाटलं नव्हतं असेही ठाकरे यांनी यावेळी सांगितले. 

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे म्हटल्यानंतर शिवराय ही गोष्ट आलीच. त्याच अनुषंगाने शिवराय यांच्यावर दोन विषय घेऊन ही वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. वक्तृत्व स्पर्धेतून वक्ते तयार होणे ही महत्वाची गोष्ट आहे. आता मी चार-पाच जणांची भाषणं ऐकली. त्या सर्वांचा मला हेवाच वाटतो. मी माझ्या शालेय जीवनात कधी वक्तृत्व स्पर्धेत कधी भागच नाही घेतला. बोलायला भीती वाटायची. लोकांसमोर जायचं कसं, बोलायचं कसं असा प्रश्न पडायचा. तसेच जे बोलतात. त्यांच्याबद्दल मला नेहमी कुतहूल वाटायचं, असेही ते म्हणाले. 

याचवेळी.दुपारचे दोन वाजले आहेत. सकाळपासून ही वक्तृत्व स्पर्धा सुरू आहे.त्यामुळे अनेकांच्या पोटात बहुदा वक्तृत्व वक्तृत्व असे आवाज येत असतील अशा शब्दात ठाकरे यांनी मिश्किल टिपण्णी करताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. 

टॅग्स :PuneपुणेRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेBabasaheb Purandareबाबासाहेब पुरंदरेBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे