शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
3
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
4
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
5
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
6
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
8
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
9
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
10
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
12
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
13
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
14
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
15
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
16
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
17
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

'10 वर्षांपूर्वी देशात रिमोट कंट्रोलचे सरकार होते', लातूरमधून PM मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 4:24 PM

'2014 मध्ये सुमारे 100 सिंचन प्रकल्प अनेक दशकांपासून प्रलंबित होते, त्यापैकी 26 प्रकल्प एकट्या महाराष्ट्रातील होते. काँग्रेसने महाराष्ट्राचा किती मोठा विश्वासघात केला, याची कल्पना करा.'

PM Modi in Maharashtra: लोकसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यातील मतदान झाले असून, आता तिसऱ्या मतासाठी निवडणूक प्रचार सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्या टप्प्यातील प्रचारासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर असून, आज त्यांनी माढा, लातूर, धारिशिव येथे जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर जोरादर हल्लाबोल केला. गेल्या 10 वर्षात मी माझ्या शरीराचा प्रत्येक कण आणि माझा प्रत्येक क्षण तुमच्या सेवेत वापरला, असे पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात म्हणाले.

काँग्रेसवर टीका करताना मोदी म्हणतात, देशात 10 वर्षांपूर्वी रिमोट कंट्रोलचे सरकार असताना महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ नेते कृषीमंत्री होते. ते बलाढ्य नेते दिल्लीवर राज्य करायचे, तेव्हा उसाची एफआरपी 200 रुपयांच्या आसपास होती. आज भाजप सरकारच्या काळात उसाची एफआरपी 350 रुपयांच्या आसपास आहे. आज देशातील आणि महाराष्ट्रातील जनता मोदी सरकारची 10 वर्षे आणि काँग्रेस सरकारची 60 वर्षे, यातील फरक पाहत आहे. जे काँग्रेस 60 वर्षात करू शकले नाही, ते आम्ही 10 वर्षात करुन दाखवले. 

महाराष्ट्रातील लोक जेव्हा प्रेम आणि आशीर्वाद देतात, तेव्हा ते कोणतीही कसर सोडत नाहीत. पण जेव्हा कोणी दिलेले आश्वासन पूर्ण करत नाही, तेव्हा महाराष्ट्रातील जनता ते लक्षात ठेवते आणि वेळ आल्यावर हिशोबही करते. 15 वर्षांपूर्वी एक मोठा नेता येथे निवडणूक लढवण्यासाठी आला होता. त्यांनी मावळत्या उन्हात दुष्काळग्रस्त भागात पाणी पोहोचवण्याची शपथ घेतली होती, पण त्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही. 

2014 मध्ये सरकार स्थापन केल्यानंतर मी माझी संपूर्ण शक्ती या सिंचन प्रकल्पांवर केंद्रित केली. काँग्रेसचे प्रलंबित असलेले 100 पैकी 63 प्रकल्प आम्ही पूर्ण केले. प्रत्येक शेतात आणि प्रत्येक घरात पाणी पोहोचवणे हे माझ्या आयुष्यातील एक मोठे ध्येय आहे. विदर्भ असो किंवा मराठवाडा...पाण्याच्या थेंबासाठी लोक वर्षानुवर्षे त्रासले होते. देशाने काँग्रेसला 60 वर्षे देशावर राज्य करण्याची संधी दिली. या 60 वर्षांत जगातील अनेक देश पूर्णपणे बदलले, पण काँग्रेसला शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवता आले नाही. 2014 मध्ये सुमारे 100 सिंचन प्रकल्प अनेक दशकांपासून प्रलंबित होते, त्यापैकी 26 प्रकल्प एकट्या महाराष्ट्रातील होते. काँग्रेसने महाराष्ट्राचा किती मोठा विश्वासघात केला, याची कल्पना करा.

काँग्रेसच्या राजवटीत रोज सकाळी वर्तमानपत्रात नवीन घोटाळा उघड व्हायचा. कोलगेट घोटाळा, कोळसा घोटाळा, चारा घोटाळा, 2-जी घोटाळा...पण आज बातम्या येतात, इथे इतके करोडो रुपये पकडले गेले... तिकडे इतके करोडो रुपये पकडले गेले, नोटांचे बंडले सापडले. काँग्रेसने आपल्या राजवटीत भारतीय अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली. पण, आज भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था बनला आहे. काँग्रेसच्या राजघराण्याने आपल्या मुलांसाठी कोणता वारसा सोडला? पैसा...देशातील प्रमुख ठिकाणी जमिनी...सत्ता आणि विशेषाधिकार... आणि 6 दशकात देशाला कोणता वारसा दिला? तर फक्त गरिबी...अशी टीकाही मोदींनी केली.

टॅग्स :Lok Sabha Election Major Fightsलोकसभा निवडणूक टफ फाइट्सmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीlaturलातूरUsmanabad S Pपोलीस अधीक्षक, उस्मानाबाद