शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुरंदर तालुक्यावर भीषण दुष्काळाचे संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 13:49 IST

तालुक्यातील साठवण तलाव कोरडे पडू लागले असून पिण्याच्या पाण्याचे साठे कमी-कमी होत चालले आहेत.

ठळक मुद्देतालुक्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय चारा आणि पाणी यांचे प्रमाण अतिशय अत्यल्प असून पशुधनाच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्कसासवड : पुरंदर तालुक्यात सध्या भीषण दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील पाणीटंचाई उन्हाळ्यात धोक्याची पातळी ओलांडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. तालुक्यातील साठवण तलाव कोरडे पडू लागले असून पिण्याच्या पाण्याचे साठे कमी-कमी होत चालले आहेत. पुरंदर तालुक्यात वीर हे एकच मोठे धरण पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी बारमाही सक्षम असते. गराडे, पिलाणवाडी, माहूर ही छोटी धरणे आहेत; मात्र ऐन उन्हाळ्यात या धरणातील पाणीसाठा कमी होतो. तालुक्याचा वाढत्या  विस्तार आणि लोकसंख्येच्या तुलनेने धरणातील पाणीसाठा मात्र कमी होत चालला आहे.तालुक्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय बनली आहे. पाणीटंचाईमुळे शेतीव्यवसाय धोक्यात आला आहे. शेतकऱ्यांना जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे तिथे जनावरांच्या अन्नपाण्याचा तर विचार करतानादेखील शेतकऱ्यांचे मन कासावीस होत आहे. तालुक्यातील पशुधनाचा विचार करता, उपलब्ध चारा आणि पाणी यांचे प्रमाण अतिशय अत्यल्प असून तालुक्यातील पशुधनाच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करू शकतो.पुरंदर तालुक्याच्या या दुष्काळी परिस्थितीस निसर्गासोबतच प्रशासकीय हलगर्जीपणा आणि लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष हेदेखील तितकेच जबाबदार आहे. तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीत सुधारणा करण्यात प्रशासनव्यवस्था सपशेल अपयशी ठरली आहे. तालुक्यात प्रत्येक उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होते. या टंचाईचा सामना करून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे. मात्र, शासकीय स्तरावर पुरंदर तालुक्याच्या दुष्काळी परिस्थितीबाबत कोणत्याही प्रकारचे सक्षम निर्णय घेतले गेले नाहीत.तालुक्यातील जलसंधारणाची कामे आणि योजना या फक्त कागदावरच राहिल्या असून प्रत्यक्षात मात्र सगळी बोलाची कढी आणि बोलाचाच भात अशी स्थिती आहे. हजारो कोटी रुपयांचा निधी केवळ कागदावरच खर्च झाला आणि तालुक्यातील शेतकरी आणि जनावरे तहानलेलीच राहिली आहे. तालुक्यातील काही गावांना पाण्यासाठी बाराही महिने टँकरवरच अवलंबून राहावे लागत असूनही या गावात जलसंधारणाची कामे का केली गेली नाहीत? याचे उत्तर कोणाकडेच नाही. पाणी आणि चारा टंचाई भीषण स्वरूप धारण करीत असूनही पुरंदर तालुक्यात दुष्काळ निवारण कक्षाची आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना केली गेली नाही. पुरंदची एकंदर नैसर्गिक परिस्थिती पाहता, तालुक्यातील पावसाचे प्रमाण जरी कमी असले, तरी जो काही पाऊस पडतो त्याचे पाणी साठवून भूगर्भातील जलसाठा वाढविण्यासाठी झाडे लावणे, धरणे, तलाव, नद्यांमधील गाळ काढणे या उपायांद्वारे पाणीसाठा वाढविण्याची गरज आहे.पाणी फाउंडेशनच्या पुरंदर तालुक्यातील कामांचा मोठ्या प्रमाणात गाजावाजा केला जात असला, तरी त्यांनी ज्या गावांमध्ये जलसंधारणाची कामे केली, तेथे म्हणावे तितक्या प्रमाणात पाणीटंचाई कमी झाल्याचे दिसत नाही.  शासकीय कर्मचारी-अधिकारी मोठ्या हिरिरीने पाणी फाउंडेशनच्या कामात सहभागीही होतात. या सर्व उपक्रमाची जाहिरातबाजीही मोठ्या प्रमाणात केली जाते; मात्र वॉटर कप स्पर्धेत ज्या गावांना पुरस्कार मिळाले तीच गावे पाणीटंचाईचा सामना करतात आणि जेव्हा पाण्यासाठी तालुक्यातील पोखर, घेरापानवडी यासारख्या पुरस्कारविजेत्या गावांतील महिलांना मैलोन् मैल पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागते, त्या वेळी हा प्रश्न पडतो, की या गावांना नेमका पुरस्कार कशाबद्दल दिला गेला आणि पुरंदर तालुक्यात खरंच पाणी फाउंडेशनने काम केले का?...........टँकर लॉबीचे साटेलोटेतालुक्यातील राजकीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या स्वत:च्या मालकीचे टँकर आहेत; त्यामुळे दर वर्षी उन्हाळ्यात तालुक्यातील गावे ही पदाधिकारी वाटून घेतात व त्या गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी याच पदाधिकाºयांचे टँकर असावेत, असा आग्रहदेखील धरला जातो. उन्हाळ्यात टँकरची मागणी कायमच राहावी, याकरिता टँकरमालक व प्रशासकीय अधिकारी आणि शासन यांच्यामध्ये साटेलोटे असल्याचेही नागरिकांकडून आरोप केले जातात. ............आरो प्लांटमालकांचे अंतर्गत सेटिंग तालुक्यात सध्या आरो प्लांटचे पेव फुटलेले असून पावसाळ्यात भूछत्रे उगवावीत त्याप्रमाणे आरो प्लांट तालुक्यात मोठ्या प्रमाणात उभारले जात आहेत. या आरो प्लांटमधून मिळणारे पाणी कितपत शुद्ध असते, याबाबत मोठी शंका उपस्थित केली जाते. कारण बहुतांश आरो प्लांट हे विनापरवाना चालविले जात आहेत. या आरो प्लांटवर कोणतेही बंधन राहिलेले नाही. मात्र, हे पाणी फक्त थंड असते की शुद्धही असते, हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहतो.

टॅग्स :purandarपुरंदरdroughtदुष्काळWaterपाणीFarmerशेतकरी