शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

२ महिन्यांच्या कांदा पिकावर नाईलाजाने रोटाव्हेटर फिरवला; अतिवृष्टी आणि खराब हवामानाचा दुहेरी फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 13:05 IST

शेतात उभे असलेले हिरवेगार पीक नष्ट करण्याची ही कृती शेतकऱ्याच्या मनातील वेदना आणि आर्थिक नुकसानीची दाहकता स्पष्टपणे दर्शवत आहे

शेलपिंपळगाव : शेतकऱ्यांना खराब हवामान (वातावरण) आणि अतिवृष्टी अशा नैसर्गिक संकटांचा दुहेरी फटका बसला आहे. या दोन कारणांमुळे शेतीत मोठ्या प्रमाणात रोगराई पसरली असून दोन महिने कष्ट करून वाढवलेले कांदा पीक वाचवता न आल्याने करंदी (ता. शिरूर) येथील बळीराजाने हताश होऊन त्यावर थेट रोटाव्हेटर फिरवल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. शेतात उभे असलेले हिरवेगार पीक नष्ट करण्याची ही कृती शेतकऱ्याच्या मनातील वेदना आणि आर्थिक नुकसानीची दाहकता स्पष्टपणे दर्शवत आहे.

साधारणपणे, कांद्याच्या चांगल्या वाढीसाठी कोरडे आणि मध्यम तापमान आवश्यक असते. मात्र, यंदा वातावरणात मोठा बदल दिसून आला आहे. कधी ढगाळ वातावरण, तर कधी वाढलेला अचानक पाऊस यामुळे कांदा पिकाच्या वाढीच्या टप्प्यावर विपरीत परिणाम झाला. हवामानातील लहरीपणामुळे पिकाची रोगप्रतिकारशक्ती कमी झाली. त्यातच, अतिवृष्टीने शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिले. जमिनीतील पाण्याचा निचरा न झाल्यामुळे कांद्याच्या मुळांना हवा मिळाली नाही आणि जमिनीत अतिरिक्त ओलावा टिकून राहिला. या दोन्ही कारणांमुळे पिकाची वाढ खुंटली. तसेच सातत्याने ओलावा टिकून राहिल्यामुळे आणि हवामान साथ देत नसल्यामुळे कांद्यावर करपा, मावा तसेच बुरशीजन्य रोगांचा मोठा प्रादुर्भाव झाला.

कांद्याच्या पाती पिवळ्या पडणे, मान कुजणे असे प्रकार मोठ्या प्रमाणावर दिसू लागले. दोन महिन्यांचे पीक असल्याने, यात गुंतवणूक केलेला संपूर्ण खर्च वाया गेला. पीक आता वाचवणे शक्य नाही, याची खात्री पटल्यानंतर, शेतकऱ्याने पुढील हंगामासाठी जमीन लवकरात लवकर मोकळी करण्यासाठी आणि रोगट पीक नष्ट करण्यासाठी नाईलाजाने ट्रॅक्टरच्या साहाय्याने त्यावर रोटाव्हेटर फिरवण्याचा कठोर निर्णय घेतला.

शासनाच्या तातडीच्या मदतीची मागणी...

केवळ दोन महिन्यांचे पीक डोळ्यांसमोर नष्ट होताना पाहणे हा शेतकऱ्यांसाठी केवळ आर्थिकच नाही, तर भावनिक आघात आहे. एकीकडे उत्पादन खर्च वाढत असताना, नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नष्ट करण्याची वेळ बळीराजावर आली आहे. या गंभीर नुकसानीची दखल घेऊन, शासनाने लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करून अतिवृष्टी आणि रोगराईने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने आणि भरीव आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीShirurशिरुरMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारfloodपूरRainपाऊसonionकांदा