शहरं
Join us  
Trending Stories
1
'तर मराठी माणसाची ही शेवटची निवडणूक ठरेल'; आज चुकलात तर म्हणत राज ठाकरेंचा इशारा
2
आजचे राशीभविष्य : सोमवार १२ जानेवारी २०२६; या राशीचे लोक आज दृढ विचार आणि आत्मविश्वासाने कामे पूर्ण करू शकतील
3
लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? आयोगाची विचारणा, आज खुलासा करण्याचे आदेश
4
भ्रष्टाचार करुन पैसे खाल्ले, हेही फलकावर लिहा; कामचोर म्हणत एकनाथ शिंदे यांची टीका
5
अंबरनाथ, बदलापूर तो झाँकी हैं, कल्याण-डोंबिवली बाकी हैं! शिंदेसेनेला खिंडीत पकडण्याची खेळी
6
सांबा, राजौरी आणि पूंछमध्ये संशयास्पद पाकिस्तानी ड्रोन दिसले, नियंत्रण रेषेवर घुसखोरीची भीती, सुरक्षा दल हाय अलर्टवर
7
शिवतीर्थावर राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुरुवातीलाच अदानीवर घाव, म्हणाले...  
8
बाळासाहेब असते तर.. त्यांना आनंद झाला असता; पहिल्यांदाच राज यांनी बोलून दाखविली मनातील भावना
9
"मुंबईचे पुन्हा बॉम्बे करण्याचा डाव"; शिवाजी पार्कवरील सभेत उद्धव ठाकरेंचा आरोप
10
पुण्यातून निवडणूक लढवणार का?, देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
11
"...नाही तर अजितदादांची जाहीर माफी मागा, तुमचे हेच चाळे"; उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावले
12
IND vs NZ : ना अनुष्का ना वामिका! जिंकलेली प्रत्येक ट्रॉफी थेट ‘या’ व्यक्तीकडे पाठवतो विराट, म्हणाला…
13
BMC Elections 2026 : "साडे तीनशे वर्षापूर्वी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात..."; जयंत पाटलांची भाजपावर टीका
14
WPL 2026 : अनुष्का शर्मानं 'फ्लाइंग शो'सह जेमीचा षटकार रोखला! अखेरच्या षटकात सोफीनं सामना फिरवला
15
कोणी अभिनेता, कोणी लावणी डान्सर तर कोणी राजकारणी; एका क्लिकवर वाचा 'बिग बॉस मराठी ६'मधील स्पर्धकांची संपूर्ण यादी
16
IND vs NZ : कोहली-गिलची फिफ्टी; वॉशिंग्टन लंगडत खेळला! KL राहुलनं सिक्सर मारत जिंकून दिला रंगतदार सामना
17
'अकबराच्या बापाचा बाप...', नाशिक कुंभमेळ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य
18
Virat Kohli Nervous Nineties Record : किंग कोहलीनं धमाका केला; पण शतक अवघ्या ७ धावांनी हुकलं अन्...
19
BMC Elections 2026 : 'ठाकरे ब्रँड नाही, ठाकरे हा विचार आहे, विचार संपत नसतो'; संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
20
'सोनावणे वहिनी' फेम सोशल मीडिया स्टार करण सोनावणेची 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात धमाकेदार एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

२ महिन्यांच्या कांदा पिकावर नाईलाजाने रोटाव्हेटर फिरवला; अतिवृष्टी आणि खराब हवामानाचा दुहेरी फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 13:05 IST

शेतात उभे असलेले हिरवेगार पीक नष्ट करण्याची ही कृती शेतकऱ्याच्या मनातील वेदना आणि आर्थिक नुकसानीची दाहकता स्पष्टपणे दर्शवत आहे

शेलपिंपळगाव : शेतकऱ्यांना खराब हवामान (वातावरण) आणि अतिवृष्टी अशा नैसर्गिक संकटांचा दुहेरी फटका बसला आहे. या दोन कारणांमुळे शेतीत मोठ्या प्रमाणात रोगराई पसरली असून दोन महिने कष्ट करून वाढवलेले कांदा पीक वाचवता न आल्याने करंदी (ता. शिरूर) येथील बळीराजाने हताश होऊन त्यावर थेट रोटाव्हेटर फिरवल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. शेतात उभे असलेले हिरवेगार पीक नष्ट करण्याची ही कृती शेतकऱ्याच्या मनातील वेदना आणि आर्थिक नुकसानीची दाहकता स्पष्टपणे दर्शवत आहे.

साधारणपणे, कांद्याच्या चांगल्या वाढीसाठी कोरडे आणि मध्यम तापमान आवश्यक असते. मात्र, यंदा वातावरणात मोठा बदल दिसून आला आहे. कधी ढगाळ वातावरण, तर कधी वाढलेला अचानक पाऊस यामुळे कांदा पिकाच्या वाढीच्या टप्प्यावर विपरीत परिणाम झाला. हवामानातील लहरीपणामुळे पिकाची रोगप्रतिकारशक्ती कमी झाली. त्यातच, अतिवृष्टीने शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिले. जमिनीतील पाण्याचा निचरा न झाल्यामुळे कांद्याच्या मुळांना हवा मिळाली नाही आणि जमिनीत अतिरिक्त ओलावा टिकून राहिला. या दोन्ही कारणांमुळे पिकाची वाढ खुंटली. तसेच सातत्याने ओलावा टिकून राहिल्यामुळे आणि हवामान साथ देत नसल्यामुळे कांद्यावर करपा, मावा तसेच बुरशीजन्य रोगांचा मोठा प्रादुर्भाव झाला.

कांद्याच्या पाती पिवळ्या पडणे, मान कुजणे असे प्रकार मोठ्या प्रमाणावर दिसू लागले. दोन महिन्यांचे पीक असल्याने, यात गुंतवणूक केलेला संपूर्ण खर्च वाया गेला. पीक आता वाचवणे शक्य नाही, याची खात्री पटल्यानंतर, शेतकऱ्याने पुढील हंगामासाठी जमीन लवकरात लवकर मोकळी करण्यासाठी आणि रोगट पीक नष्ट करण्यासाठी नाईलाजाने ट्रॅक्टरच्या साहाय्याने त्यावर रोटाव्हेटर फिरवण्याचा कठोर निर्णय घेतला.

शासनाच्या तातडीच्या मदतीची मागणी...

केवळ दोन महिन्यांचे पीक डोळ्यांसमोर नष्ट होताना पाहणे हा शेतकऱ्यांसाठी केवळ आर्थिकच नाही, तर भावनिक आघात आहे. एकीकडे उत्पादन खर्च वाढत असताना, नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नष्ट करण्याची वेळ बळीराजावर आली आहे. या गंभीर नुकसानीची दखल घेऊन, शासनाने लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करून अतिवृष्टी आणि रोगराईने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने आणि भरीव आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीShirurशिरुरMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारfloodपूरRainपाऊसonionकांदा