शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
3
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट
4
पाकिस्तानातील सोने-चांदीचे दर वाचून विश्वास नाही बसणार! काय आहे एका तोळ्याची किंमत?
5
भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
6
Palmistry: तळ हाताच्या शुक्र पर्वतावर 'या' चिन्हाचे असणे म्हणजे राजयोगच; तुम्हीपण तपासून बघा!
7
सुपर बॉय! २ वर्षांच्या आदित्यने कॉम्पुटरला टाकलं मागे, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद
8
IAS Misha Singh : लय भारी! वडील शेतकरी, लेक IAS अधिकारी; LLB नंतर UPSC ची तयारी, केली दमदार कामगिरी
9
मराठा समाज अन् राज्य सरकारला मोठा दिलासा; 'त्या' GR ला अंतरिम स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार
10
काही महिने थांबा, पेट्रोल कारच्या किंमतीत EV कार मिळतील; नितीन गडकरींचा मोठा दावा...
11
Thane Crime: ठाण्यात व्हॉट्सअपद्वारे 'सेक्स रॅकेट'; थेट हॉटेलमध्ये पोहोचले पोलीस, दलाल महिलेस अटक
12
"मला सोडून देण्यामागे काहीतरी रहस्य..."; सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाचे सूचक विधान
13
घनदाट जंगलात शूट झालाय 'कांतारा: चाप्टर १', कुठे आहेत हे नयनरम्य लोकेशन्स?
14
VIDEO: मोदींना विचारलं "आंबा कसा खाता?" झाला ट्रोल, आता अक्षयचा फडणवीसांना प्रश्न, "तुम्ही संत्री कशी खाता?"
15
IND vs AUS : फिटनेसच ठिकये पण फॉर्मच काय? रोहित-विराटच्या सिलेक्शनवर प्रश्नचिन्ह
16
२ तप सत्तेत, २४ वर्षांत काय-काय झाले? नरेंद्र मोदींनी सांगितली CM ते PM प्रवासाची Inside Story...
17
कफ सिरप मृत्यू प्रकरण : मृत मुलाच्या कबरीतून डॉक्टरचे 'ते' प्रिस्क्रिप्शन काढले बाहेर; आणखी एका बालकाची प्रकृती चिंताजनक
18
शिंदेंच्या हातून 'धनुष्यबाण' निसटणार?; अंतिम निकाल ठाकरेंच्या बाजूने लागणार, असीम सरोदेंचा दावा
19
छोटे व्हिडीओ पाहण्याची सवय जीवघेणी; मेंदूचं मोठं नुकसान, दारुच्या व्यसनापेक्षाही ५ पट धोका
20
"रात्री ३ वाजता उठवलं तरी मी उर्दू बोलतो...", सचिन पिळगावकरांचं नवं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?

२ महिन्यांच्या कांदा पिकावर नाईलाजाने रोटाव्हेटर फिरवला; अतिवृष्टी आणि खराब हवामानाचा दुहेरी फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 13:05 IST

शेतात उभे असलेले हिरवेगार पीक नष्ट करण्याची ही कृती शेतकऱ्याच्या मनातील वेदना आणि आर्थिक नुकसानीची दाहकता स्पष्टपणे दर्शवत आहे

शेलपिंपळगाव : शेतकऱ्यांना खराब हवामान (वातावरण) आणि अतिवृष्टी अशा नैसर्गिक संकटांचा दुहेरी फटका बसला आहे. या दोन कारणांमुळे शेतीत मोठ्या प्रमाणात रोगराई पसरली असून दोन महिने कष्ट करून वाढवलेले कांदा पीक वाचवता न आल्याने करंदी (ता. शिरूर) येथील बळीराजाने हताश होऊन त्यावर थेट रोटाव्हेटर फिरवल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. शेतात उभे असलेले हिरवेगार पीक नष्ट करण्याची ही कृती शेतकऱ्याच्या मनातील वेदना आणि आर्थिक नुकसानीची दाहकता स्पष्टपणे दर्शवत आहे.

साधारणपणे, कांद्याच्या चांगल्या वाढीसाठी कोरडे आणि मध्यम तापमान आवश्यक असते. मात्र, यंदा वातावरणात मोठा बदल दिसून आला आहे. कधी ढगाळ वातावरण, तर कधी वाढलेला अचानक पाऊस यामुळे कांदा पिकाच्या वाढीच्या टप्प्यावर विपरीत परिणाम झाला. हवामानातील लहरीपणामुळे पिकाची रोगप्रतिकारशक्ती कमी झाली. त्यातच, अतिवृष्टीने शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिले. जमिनीतील पाण्याचा निचरा न झाल्यामुळे कांद्याच्या मुळांना हवा मिळाली नाही आणि जमिनीत अतिरिक्त ओलावा टिकून राहिला. या दोन्ही कारणांमुळे पिकाची वाढ खुंटली. तसेच सातत्याने ओलावा टिकून राहिल्यामुळे आणि हवामान साथ देत नसल्यामुळे कांद्यावर करपा, मावा तसेच बुरशीजन्य रोगांचा मोठा प्रादुर्भाव झाला.

कांद्याच्या पाती पिवळ्या पडणे, मान कुजणे असे प्रकार मोठ्या प्रमाणावर दिसू लागले. दोन महिन्यांचे पीक असल्याने, यात गुंतवणूक केलेला संपूर्ण खर्च वाया गेला. पीक आता वाचवणे शक्य नाही, याची खात्री पटल्यानंतर, शेतकऱ्याने पुढील हंगामासाठी जमीन लवकरात लवकर मोकळी करण्यासाठी आणि रोगट पीक नष्ट करण्यासाठी नाईलाजाने ट्रॅक्टरच्या साहाय्याने त्यावर रोटाव्हेटर फिरवण्याचा कठोर निर्णय घेतला.

शासनाच्या तातडीच्या मदतीची मागणी...

केवळ दोन महिन्यांचे पीक डोळ्यांसमोर नष्ट होताना पाहणे हा शेतकऱ्यांसाठी केवळ आर्थिकच नाही, तर भावनिक आघात आहे. एकीकडे उत्पादन खर्च वाढत असताना, नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नष्ट करण्याची वेळ बळीराजावर आली आहे. या गंभीर नुकसानीची दखल घेऊन, शासनाने लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करून अतिवृष्टी आणि रोगराईने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने आणि भरीव आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीShirurशिरुरMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारfloodपूरRainपाऊसonionकांदा