शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
2
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
3
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
4
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
5
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
6
विधान परिषदेच्या निवडणुकीची नवी तारीख जाहीर; शिक्षक, पदवीधर मतदारसंघांसाठी या दिवशी मतदान
7
"सांगली जिल्हाप्रमुखाचं विधान उबाठाला मार्ग दाखवणारं, जर..."; संजय शिरसाटांचा निशाणा
8
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
10
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
11
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग
12
कडक उन्हातून घरी आल्यावर किती वेळानंतर पाणी प्यावं?; जाणून घ्या हेल्थ एक्सपर्टचा सल्ला
13
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
14
IPL 2024: दिनेश कार्तिक पाठोपाठ टीम इंडियाच्या आणखी एका स्टार खेळाडूचे निवृत्तीचे संकेत
15
Rituals: मंदिरात घंटा का बांधतात? नवस फेडण्यासाठीही घंटेचा वापर का केला जातो ते जाणून घ्या!
16
प्रिटी वुमन! प्रिती झिंटानेही Cannes मध्ये लावली हजेरी, व्हाईट आऊटफिटमध्ये दिसली परी!
17
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
18
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
19
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
20
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर

शिवसेनेची भूमिका याेग्यच ; सत्तासंघर्षावर तरुणांची मते

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2019 3:33 PM

सध्याच्या सत्तास्थापनेच्या पेचाबद्दल तरुणांनी स्पष्ट मत व्यक्त केले असून शिवसेनेची भूमिका याेग्य असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

पुणे : विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून 14 दिवस झाले असले तरी अद्याप राज्यात सरकार स्थापन हाेऊ शकले नाही. सत्तास्थापनावरुन राज्यात पेच निर्माण झाल्याचे चित्र आहे. भाजप आणि शिवसेना युतीला बहुमत मिळाले असले तरी मुख्यमंत्री पद आणि इतर मंत्रीपदांवरुन सध्या दाेन्ही पक्षांमध्ये वाद निर्माण हाेत आहेत. त्यामुळे राज्याला अद्याप सरकार मिळू शकलेले नाही. या सर्व सत्तासंघर्षाबद्दल स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांशी संवाद साधल्यानंतर शिवसेनेची भूमिका याेग्य असल्याचे मत बहुतांश तरुणांनी व्यक्त केले. 

प्रशांत इंगळे म्हणाला, जनतेने भाजप शिवसेनेला बहुमताचा काैल दिला आहे तर काॅंग्रेस, राष्ट्रवादीला विराेधात बसण्याचा काैल दिला आहे. राज्यात सध्या लवकरात लवकर सरकार स्थापन हाेने गरजेचे आहे. राज्यात दुष्काळ, बेराेजगारांचे प्रश्न आहेत. शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे. शिवसेनेने घेतलेली भूमिका याेग्य आहे. मतदारांनी युतीला बहुमताचा काैल दिला आहे, एकट्या भाजपाला नाही. त्यामुळे शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्री पद मिळणे आवश्यक आहे. पवारांची भूमिका स्पष्ट हाेणे आवश्यक आहे. 

निलेश निंबाळकर म्हणाला, स्वतःचे मीपण सिद्ध करण्यासाठी राज्यात सत्तेचा पेच निर्माण करण्यात आला आहे. लाेकांना वेड्यात काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. जागा वाटपाच्या वेळी पन्नास टक्के सत्तेत वाटा देण्याचे असे शिवसेनेला सांगण्यात आले हाेते. जर असा फाॅर्म्युला ठरला असेल तर शिवसेनेला सत्तेत अर्धा वाटा मिळायला हवा. शरद पवारांची भूमिका ही सध्या जाे राज्यात पेच निर्माण झाला आहे, त्यात भर घालत आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे शरद पवार हे न उलगडणारे काेडं आहेत. काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठींबा दिला तर ही शिवसेना आणि काॅंग्रेसची राजकीय आत्महत्या ठरेल. काॅंग्रेस आणि शिवसेनेच्या वैचारीक भूमिका या दाेन टाेकाच्या आहेत. त्यामुळे हे दाेन पक्ष सत्तेसाठी एकत्र येणे महाराष्ट्रासाठी याेग्य ठरणार नाही. 

राेहित पाटील म्हणाला, जनतेने भाजपा आणि शिवसेनेला जनादेश दिला आहे. त्यामुळे त्यांनी सरकार स्थापन करायला हवे. शिवसेनेला भाजपाने सत्तेत अर्धा वाटा द्यायला हवा. अडीच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री हाेणे गरजेचे आहे. काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीने सध्या विराेधात बसणेच याेग्य आहे. 

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाShiv SenaशिवसेनाGovernmentसरकार