शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
2
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान
3
PAK vs ENG 2nd T20 : इंग्लंडच्या धरतीवर यजमानच 'बॉस', पाकिस्तानचं रडगाणं सुरूच
4
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
5
“२०१९ला संजय राऊतांनी CM होण्यासाठी प्रयत्न केले होते, हिंमत असेल तर...”: चंद्रशेखर बावनकुळे
6
डिजिटल इंडियाचा जगभरात डंका; मॉरिशस आणि UAE नंतर आता 'या' देशातही चालणार रुपे कार्ड!
7
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
8
PHOTOS : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया रवाना; पहिल्या बॅचमध्ये हार्दिक पांड्या दिसला नाही
9
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
10
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
11
"कुणाच्या तरी चुकीमुळे कोणीतरी जीव गमावतं...", अपघाताबाबत अभिजीत खांडकेकर स्पष्टच बोलला
12
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
13
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
14
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
15
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
16
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
17
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
18
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
19
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
20
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी

बालगुन्हेगारी रोखण्यास मुख्याध्यापकांची भूमिका महत्वाची : डॉ. के. व्यंकटेशम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2020 6:37 PM

व्यसन, गुड टच बॅड टच, शिस्त आणि स्वांतत्र्य अशा विषयांवर त्यांनी मुलांना समुपदेश कसे करावे, याची माहिती

ठळक मुद्देविद्यार्थी सुरक्षितता कार्यक्रमात पोलीस आयुक्तांचे आवाहन

पुणे : घरानंतर लहान मुले सर्वाधिक काळ शाळेत आपल्यासमोर असतात. समाजातील बºया वाईट गोष्टींचा परिणाम त्यांच्यावर होत असतो. आजच्या काळात मुलांना चांगले संस्कार देऊन त्यांना गुन्हेगारीपासून दूर ठेवण्यामध्ये मुख्याध्यापक, शिक्षकांची भूमिका अतिशय महत्वाची आहे. मुलांचे समुपदेन करण्यासाठी शाळांना पुणेपोलिसांच्या कम्युनिटी पोलिसिंगकडून आवश्यक ती मदत केली जाईल, असे पोलीस आयुक्त डॉ़. के. व्यंकटेशम यांनी सांगितले. महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत आयोजित विद्यार्थी सुरक्षितते संदर्भात मुख्याध्यापकांची कार्यशाळा पोलीस आयुक्तालयात गुरुवारी आयोजित करण्यात आली होती. यावेळी डॉ.व्यंकटेशम बोलत होते. पोलीस आयुक्तालयात गुरुवारी औंध व बिबवेवाडी परिसरातील सर्व खासगी प्राथमिक शाळांमधील मुख्याध्यापकांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमात मुख्याध्यापकांना प्रामुख्याने सायबर क्राईम व सोशल मीडियाचा गैरवापर करुन गुन्हे कसे होतात, वाहतूक नियमन, अंमली पदार्थांचे मुलांमधील वाढत असलेले व्यसन, गुड टच बॅड टच, शिस्त आणि स्वांतत्र्य अशा विषयांवर त्यांनी मुलांना समुपदेश कसे करावे, याची माहिती देण्यात आली. पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक, विशेष बाल सुरक्षा प्रतिबंधक पथकाच्या शिल्पा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे यांनी मार्गदर्शन केले. तसेच सह पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाला महापालिकेचे शिक्षणाधिकारी दीपक माळी, शशिकला रंधवे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन सत्रात २५० मुख्याध्यापक उपस्थित होते़ यावेळी काही मुख्याध्यापकांनीही आपले अनुभव व्यक्त केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळत नाही़ मुले बिघडल्यास पालक जबाबादार आहे.याकरीता मुलांपेक्षा त्यांच्या पालकांचे समुपदेशन करणे गरजेचे असल्याचे ज्योती भिलारे यांनी सांगितले. पुढील दोन दिवस शहरातील अन्य शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील मुख्याध्यापिकांसाठी ही कार्यशाळा घेण्यात येणार आहे.़़़़़योग्य संस्कार, मार्गदर्शनाने मुले नक्कीच सुधारतातमुलांना योग्य संस्कार आणि वेळेवर मार्गदर्शन मिळाल्यास मुले नक्कीच कतृत्ववान बनू शकतात, असा स्वत:चा अनुभव दिग्वीजय प्राथमिक इंग्लिश स्कुलच्या मुख्याध्यापिका जयश्री घाटगे यांनी सांगितला. त्या म्हणाल्या, धनकवडी येथील एक मुलगा तेथील मंडळात होता. तलवारीने मारामारीपर्यंत त्याची मजल गेली होती. त्याच्या आईवडिलांनी ६ वीत असताना त्याला आमच्या शाळेत आणले, तो हाताबाहेर गेला असल्याचे आईने सांगितले. त्या मुलाला विश्वासात घेऊन मार्गदर्शन केले. त्याने हळुहॅळु सर्व नाद सोडून दिला. आता तो इतका शांत झाला असून आईवडिलांचा आदर करु लागला असून आता स्वत:चा व्यवसाय करत आहे़ पालकांचे समुपदेशन यात महत्वाचे असते. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीStudentविद्यार्थी