शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
2
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
3
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
4
कंचनजंगा एक्स्प्रेसच्या अपघातात लोको पायलट, गार्डचा मृत्यू? रेल्वे मंत्रालय माहिती देताना म्हणाले...
5
NSE नं इन्स्टाग्राम, टेलिग्रामच्या 'या' हँडल्सबाबत दिला इशारा; फसवणूक करणारे नंबर्सही केले जारी
6
चाळिशीनंतर स्वत:ला जपा! महिलांना 'या' आजारांचा मोठा धोका; दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर
7
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
8
सावधान! पावसाळ्यात समोसा, वडापाव खाणं पडू शकतं महागात; 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
9
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
10
'फादर्स डे' निमित्त जिनिलीयाने लिहिलेली पोस्ट वाचून रितेश देशमुख म्हणाला - 'बायको तुझ्याशिवाय...'
11
Munjya Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'चं राज्य; १० दिवसात मोडला 'मैदान'चा लाइफटाइम कलेक्शनचा रेकॉर्ड
12
नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
13
Sanjay Raut : "रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही, विजयी करणारा फोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न"
14
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
15
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
16
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
17
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
18
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
19
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
20
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?

Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 9:14 AM

Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज पश्चिम बंगालमध्ये धडकण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. याबाबत राज्य प्रशासन पूर्णपणे सतर्क आहे. एनडीआरएफच्या पथकांनाही सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.

Cyclone Remal ( Marathi News ) :  बंगालच्या उपसागरात 'रेमल' चक्रीवादळ आज रविवारी रात्री धडकण्याची शक्यता आहे, याबाबत हवामान विभागाने माहिती दिली आहे. 'चक्रीवादळ ताशी ११०-१२० किलोमीटर वेगाने किनारपट्टीवर धडकू शकते. या काळात समुद्रात १.५ मीटर उंच लाटा येण्याची शक्यता आहे, त्यामुळे किनारपट्टीवरील पश्चिम बंगाल आणि बांगलादेशातील सखल भाग पाण्याखाली जाऊ शकतो. हवामान खात्याने मच्छिमारांना २७ 'मे'च्या सकाळपर्यंत बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडील भागात जाऊ नये अशा सूचना दिल्या आहेत. 'रेमल'च्या प्रभावामुळे पश्चिम बंगाल, ओडिशा, मिझोराम ते बिहारपर्यंत पावसाची शक्यता आहे.

दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी

'रेमल' चक्रीवादळामुळे, कोलकाता विमानतळावरील विमानसेवा रविवारी दुपारी १२ ते सोमवारी सकाळी ९ वाजेपर्यंत २१ तासांसाठी बंद राहणार आहे. भारतीय तटरक्षक दलाने नऊ आपत्ती निवारण पथके समुद्रात तैनात केली आहेत. याशिवाय बंगालमध्ये एनडीआरएफच्या १२ तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत.

बंगाल सरकारने शनिवारी एक बैठक घेतली आणि चक्रीवादळाचा सामना करण्याच्या तयारीचा आढावा घेतला. केंद्रीय कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनीही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्य अधिकाऱ्यांसोबत तयारीचा आढावा घेतला. 

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर ओडिशातील बालासोर, भद्रक आणि केंद्रपारा या किनारी जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या मुसळधार पाऊस पडेल.  त्याचबरोबर मयूरभंजमध्ये २७ मे रोजी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच २६ मे रोजी मिझोराम, त्रिपुरा आणि दक्षिण मणिपूरमध्ये बहुतांश ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आसाम आणि मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मिझोराम, मणिपूर आणि त्रिपुरामध्ये २७ आणि २८ मे रोजी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. बिहारमध्येही काही ठिकाणी पाऊस पडू शकतो. चक्रीवादळ 'रेमल'मुळे, रविवारी संध्याकाळी ६ वाजल्यापासून बंगालमधील श्यामा प्रसाद मुखर्जी बंदरातील सर्व मालवाहू कामे १२ तासांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

'रेमल'चक्रीवादळाचा महाराष्ट्रालाही धोका?

हवामान खात्याने २६-२७ मे रोजी दक्षिण २४ परगणामध्ये १०० ते ११० किमी प्रतितास आणि उत्तर २४ परगणामध्ये ताशी ९० ते १०० किमी प्रतितास ते ११० किमी प्रति तास वाऱ्याचा वेग वाहण्याचा इशारा दिला आहे. विभागाने कोलकाता, हावडा, नादिया आणि पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होणार नाही, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. 

टॅग्स :cycloneचक्रीवादळ