शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
2
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
3
धोक्याची घंटा! इंफेक्शनमुळे ४८ तासांत होतो रुग्णाचा मृत्यू; काय आहे Flesh-Eating Bacteria?
4
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
5
जगप्रसिद्ध बीबी का मकबराच्या चारही मिनारचे ‘तीन तेरा’
6
'खटा-खट खटा-खट रिटर्न'! ₹४०० चा शेअर पोहोचला १८०० पार; 'या' Energy शेअरनं केलं मालामाल
7
"बिकिनी घालणं सोपी गोष्ट नाही, त्यासाठी कष्ट लागतात", पर्ण पेठे स्पष्टच बोलली
8
लाईफ इन्शुरन्स धारकांसाठी खूशखबर! पॉलिसी मध्येच सरेंडर केल्यास मिळणार पूर्वीपेक्षा अधिक पैसे
9
बुडणार नाही तास, शाळेतच मिळणार पास; ‘एसटी’चे एक पाऊल पुढे
10
कंचनजंगा एक्स्प्रेसच्या अपघातात लोको पायलट, गार्डचा मृत्यू? रेल्वे मंत्रालय माहिती देताना म्हणाले...
11
NSE नं इन्स्टाग्राम, टेलिग्रामच्या 'या' हँडल्सबाबत दिला इशारा; फसवणूक करणारे नंबर्सही केले जारी
12
चाळिशीनंतर स्वत:ला जपा! महिलांना 'या' आजारांचा मोठा धोका; दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर
13
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
14
सावधान! पावसाळ्यात समोसा, वडापाव खाणं पडू शकतं महागात; 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
15
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
16
Munjya Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'चं राज्य; १० दिवसात मोडला 'मैदान'चा लाइफटाइम कलेक्शनचा रेकॉर्ड
17
नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
18
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
19
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
20
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन

“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 9:36 AM

Congress Rahul Gandhi News: राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर पुन्हा एकदा टीका केली आहे.

Congress Rahul Gandhi News: लोकसभा निवडणुकीत देशभरात झालेल्या सर्वच टप्प्यात ७० टक्क्यांहून अधिक मतदान होण्याची कामगिरी पश्चिम बंगालने सहाव्या टप्प्यातही कायम ठेवली. २५ मे रोजी लोकसभा निवडणुकीचे सहाव्या टप्प्यातील मतदान झाले. दिल्लीतील ७ जागांवरही मतदान झाले. यातच काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीका केली आहे. 

दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, केंद्रीय मंत्र्यांसह अनेक व्हीआयपींनी मतदान केले. दिल्लीत सरासरी ५७.६७ टक्के मतदान झाले. उत्तर पूर्व दिल्लीमध्ये सर्वाधिक ६२.८७ टक्के, तर नवी दिल्लीत सर्वात कमी ५२.९३ टक्के मतदान झाले. यानंतर राहुल गांधी यांनी एक्सवर एक पोस्ट करत पंतप्रधान मोदी आणि भाजपावर निशाणा साधला.

पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालले आहे

पंतप्रधानांच्या भाषेची प्रतिष्ठा आणि भाजपाचा जागा या दोन्ही गोष्टी सातत्याने घसरत चालल्या आहेत, अशी टीका राहुल गांधी यांनी एक्सवरील पोस्टमधून केली आहे. तर दुसऱ्या एका पोस्टमध्ये राहुल गांधी म्हणतात की, देशवासियो, मतदानाच्या पहिल्या पाच टप्प्यात तुम्ही खोटेपणा, द्वेष आणि अपप्रचार यांना नाकारून तुमच्या जीवनाशी संबंधित तळागाळातील समस्यांना प्राधान्य दिले आहे. ३० लाख रिक्त सरकारी पदांवर भरती आणि तरुणांसाठी वर्षाला १ लाख रुपयांची पहिली रोजगार हमी योजना सुरू व्हावी. गरीब कुटुंबातील महिलांच्या खात्यात महिन्याला ८,५०० रुपये येऊ लागतील. शेतकरी कर्जमुक्त झाला होईल आणि त्यांना त्यांच्या पिकांवर योग्य एमएसपी मिळेल. मजुरांना ४०० रुपये रोजंदारी मिळेल. तुमचे जीवन तर सुधारेलच पण लोकशाही आणि संविधानाचे रक्षण करेल, यासाठी मतदार म्हणून योगदान दिले, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार बिहारमधील लोकसभेच्या ८ जागांवर ५३.३० टक्के मतदान झाले. उत्तर प्रदेशमधील १४ जागांवर ५४.०३ टक्के मतदान झाले. जम्मूमधील एका जागेवर ५२.२८ टक्के मतदान झाले. पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या ८ जागांसाठी ७८.१९ टक्के मतदान झाले. हरयाणामधील सर्व १० जागांसाठी ५८.३७ टक्के एवढ्या मतदानाची नोंद झाली. राजधानी दिल्लीतील लोकसभेच्या ७ जागांसाठी ५४.४८ टक्के मतदान झाले. झारखंडमधील लोकसभेच्या ४ जागांसाठी ६२.७४ टक्के मतदान झाले. ओदिशामधील लोकसभेच्या ६ जागांसाठी ६०.०७ टक्के एवढे मतदान झाले.  

 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपा