शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

प्रांतोप्रांतीचे क्रांतिकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:11 IST

१८१८ मध्ये इंग्रजांनी मराठी राज्यही गिळंकृत केले. त्यानंतरही उमाजी नाईक यांनी लढा चालू ठेवला होता. १८५७ चा लढा अयशस्वी ...

१८१८ मध्ये इंग्रजांनी मराठी राज्यही गिळंकृत केले. त्यानंतरही उमाजी नाईक यांनी लढा चालू ठेवला होता. १८५७ चा लढा अयशस्वी झाल्यानंतरही इंग्रजांशी उघड लढा देण्यासाठी सर्वसामान्य जनतेप्रमाणे काही धनिक लोकही काम करू लागले. पुण्यातले नारो बल्लाळ डावरे यांचे पेशवाईतील वतन इंग्रजांनी बंद केले. त्यांचा थोरला मुलगा गोविंद यांचा जन्म १७ डिसेंबर १८३६ मध्ये तर, माधव यांचा जन्म १८४१ मध्ये झाला. धाकट्या बळवंतचा जन्म १८४७ मध्ये झाला. प्राथमिक शिक्षण घरीच झाले. भवानी पेठेत या तिघा भावांनी स्वतः ची व्यायामशाळा बांधली. अनेक तरुणांना व्यायामाची गोडी लावली. थोरला मुलगा गोविंदरावांची आठ घरे, एक बाग, तसेच अनेक ठिकाणी जमिनी होत्या. स्वतःची व्हिक्टोरिया गाडी, घोडे-गाई-म्हशी आदी जनावरेही होती. व्यापारासाठी स्वतःची पेढीही होती. त्यातून ते अनेकांना गुप्तपणे क्रांतिकार्यासाठी मदत करत होते. इंग्रजांचा त्यांच्यावर संशय होता. १८६७ मध्ये त्यांच्यावर खटलाही भरला. पण त्या खटल्यातही ते निर्दोष सुटले. मग सरकारने बळवंतराव व माधवराव यांच्यावर खटला भरून त्यांना १८७४ मध्ये अंदमानच्या तुरुंगात पाठवले. तरीही गोविंदरावांनी गुप्तपणे क्रांतिकार्याला मदत करणे चालूच ठेवले. वासुदेव बळवंत फडके यांनाही त्यांनी मदत केल्याचा इंग्रजांना संशय होता. बडोद्याच्या मल्हारराव गायकवाड या राजावर इंग्रजांनी खटला भरला होता. त्यांची संपत्ती जप्त केली होती. यावेळीही उघडपणे सार्वजनिक काका व गुप्तपणे गोविंदराव डावरे यांनी पुढाकार घेऊन मोठा निधी उभा केला होता. उघडपणे गोविंदरावांवर कोणतेच आरोप ठेवता येत नसल्यामुळे चौकशीसाठी १८७९ मध्ये पुण्यातील सध्याच्या मामलेदार कचेरीच्या तुरुंगात कच्च्या कैदेत ठेवले. त्यावेळी कोठडीतील रॉकेलच्या चिमणीतील तेलाच्या साहाय्याने त्यांनी स्वत:ला जाळून घेतले, असे इंग्रजांनी दाखवले. परंतु कोठडीत अशा काही दिव्याची परवानगी नसल्याने इंग्रजांनीच त्यांना १३ डिसेंबर१८७९ या दिवशी अमानुषपणे जाळून मारले होते.

१८९७-९८ या काळात एकाच कुटुंबातील दामोदर-बाळकृष्ण आणि वासुदेव चापेकर हे तिघे बंधू फासावर गेल्याचे आपल्याला माहिती आहेच. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, त्यांचे थोरले बंधू गणेश ऊर्फ बाबाराव हे दोघे अंदमान येथे तर, डॉ. नारायणराव या सावरकरांच्या धाकट्या भावाने तुरुंगवास भोगला. त्यांच्या २० वर्षे आधी हुतात्मा गोविंदराव व अंदमानात शिक्षा भोगणारे माधवराव, बळवंतराव अशा तीन सख्ख्या भावांचेही स्वातंत्र्यलढ्यातील कार्य आपण लक्षात ठेवले पाहिजे.

--

फोटो : क्रांतिकारक हुतात्मा डावरे