शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Pune Rain: आताच पाणी सोडा, रात्री उशिरा खडकवासल्यातून विसर्ग करू नये; अजित पवारांच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 16:00 IST

पूरपरिस्थिती निर्माण झालेल्या भागात बचावकार्यासाठी एनडीआरएफ, लष्करी जवान तैनात असल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये

पुणे : पुण्यात काल रात्रीपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. पावसाचा जोर वाढत चालला आहे. खडकवासला धरण प्रकल्पात मजबूत पाणीसाठा निर्मण झाला आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत धरणातून विसर्ग मोठ्या प्रमाणावर सुरु होता. त्यानंतर पावसाचा जोर कमी झाल्यावर विसर्गही कमी करण्यात आला आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यातील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी व्यवस्थापन विभागात दाखल झाले आहेत. त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे महानगरपालिका येथे अधिकाऱ्यांकडून मदत व बचत कार्याचा आढावा घेतला.

-नैसर्गिक संकटात सर्व यंत्रणा, स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे मदत कार्यात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.

-पुरामुळे प्रभावित भागातील नागरिकांना अन्न व पाणी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

- ४८ तास धोकादायक पर्यटन स्थळांवर बंदी घालण्यात आली असून पर्यटकांनी अशा ठिकाणी जाऊ नये असे आवाहन अजित पवारांनी केले आहे.

- पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून धरणातील पाणी साठ्याची माहिती घेतली व पावसाची स्थिती लक्षात घेऊन विसर्ग करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या आहेत.

- दुर्घटनेत जखमी झालेल्याचा खर्च महानगरपालिका व शासनातर्फे करण्याच्या सूचना अजित पवारांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

- वेगवेगळ्या भागात एनडीआर एफच्या तुकड्या तैनात असून आंबील ओढा भागातही खबरदारी घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. लवासा येथे दरड कोसळल्याने मदत कार्य सुरू आहे.  प्रशासन सतर्क राहून काम करीत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्ह्यातील काही भागातील वाहतूक बंद करण्यात आली आहे. नागरिकांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.

पुरस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू

अजित पवारांनी अधिकाऱ्यांना महत्वाची सूचना केली आहे. त्यांना आताच पाणी सोडण्यास सांगितलं आहे. रात्री उशिरा खडकवासला धरणातून विसर्ग करू नये अशी सूचना करण्यात आली आहे. तसेच नदीत सोडणारे पाणी कॅनॉलमध्ये  सोडण्यात येईल. खडकवासला धरणातील विसर्ग कमी केला जाणार आहे. ज्या धरणात आणखी पाणी साठवण्याची क्षमता आहे त्या धरणात, कालव्यात पाणी सोडावं अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या आहेत. पुरस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत.

लष्कराचे १०० जवान तैनात

पुण्यातील सिंहगड परिसरातील एकतानगर परिसरात बचावकार्य करण्यात आले आहे. लष्कराचे जवान आणि एनडीआरएफचे पथक त्या ठिकाणी पोहोचले आहेत. पुर परिस्थिती निर्माण होईल त्या ठिकाणी तातडीने बचावकार्य केले जाईल त्यासाठी पथक तैनात करण्यात आले आहे.  लष्कराचे १०० जवान तैनात करण्यात आलेले आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन अजित पवारांनी केलं आहे.

नैसर्गिक संकटावेळी राजकारण नको

भाजपने पुणे बुडविले, असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. याबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले, "नैसर्गिक संकट आल्यानंतर विरोधक काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्यापेक्षा जे नागरिक अडचणीत आहेत, त्यांना बाहेर काढून. पुन्हा पाऊस पडला, तर काय करता येईल याकडे आम्ही लक्ष देत आहोत. विरोधक काय बोलतात, याच्याशी काही देणेघेणे त्यामध्ये वेळ घालवायचा नाही. दोन्हा महापालिका आयुक्त, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, पीएमआरडीए आयुक्त यांना खबरदारी घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येकजण काम करत आहेत, गैरसमज करण्याचे काहीही कारण नाही. घटना काही काळाकरीता घडलेली आहे, हे मी नाकारत नाही. मात्र त्यातुन लोकांना बाहेर कसे काढता येईल, याचा विचार केला जात आहे.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसAjit Pawarअजित पवारenvironmentपर्यावरणSocialसामाजिकWaterपाणीDamधरण