शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

GBS: ‘जेजुनी अन् नोरो व्हायरस’मुळे दुर्मीळ ‘जीबीएस’ची बाधा', रुग्णसंख्या आता ७३ वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 11:14 IST

विषाणू दूषित अन्न अथवा पाण्यातून पसरत असला, तरी बाधित रुग्णाने उलटी केल्यास हा विषाणू हवेत पसरून त्याचा संसर्ग होऊ शकतो

पुणे: गुइलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस)ची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असून, आतापर्यंत ७३ रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये ४७ पुरुष आणि २६ महिलांचा समावेश आहे. यातील काही रुग्णांचे लघवी आणि रक्ताचे नमुने (सॅम्पल) राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही) तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल ‘एनआयव्ही’ने आरोग्य विभागाला पाठविला असून, यामध्ये ‘कॅम्पायलो बॅक्टर जेजुनी’ या जीवाणू आणि ‘नोरो व्हायरस’ या विषाणूमुळे दुर्मीळ ‘जीबीएस’ची बाधा झाल्याचे आता उघड झाले आहे.

जीबीएस रुग्णांचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठवण्यात आले होते. या अहवालात मूळ कारण निष्पन्न झाले असून, दूषित अन्न व पाण्यातून हे जीवाणू आणि विषाणू पसरल्याने रुग्णांना बाधा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही रुग्णांना ‘कॅम्पायलो बॅक्टर जेजुनी’ हा जीवाणू आणि काही रुग्णांमध्ये ‘नोरो व्हायरस’ हा विषाणू संसर्ग आढळून आला आहे. या दोन्हींचा संसर्ग दूषित अन्न अथवा पाण्यातून होतो. याचबरोबर या दोन्हींची लक्षणेही पोटदुखी, उलट्या आणि जुलाब ही आहेत. ‘जीबीएस’चा सर्व्हे आरोग्य प्रशासनाकडून करण्यात येत असून, आतापर्यंत पुणे शहरातील १९४३, पिंपरी-चिंचवड मनपा १७५० आणि ग्रामीण भागातील ३५२२ घरांना भेटी देऊन सर्वेक्षण करण्यात आले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता उघड्यावरील कोणतेही अन्न खाऊ नये. तसेच पाणी उकळून प्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले.

जगभरात दरवर्षी १० पैकी एका व्यक्तीला हा संसर्ग होतो. यामध्ये लहान मुलांचे प्रमाण जास्त आहे. या संसगार्मुळे मृत्यू होण्याचे प्रमाण कमी असून, हा विषाणू दूषित अन्न अथवा पाण्यातून पसरत असला, तरी बाधित रुग्णाने उलटी केल्यास हा विषाणू हवेत पसरून त्याचा संसर्ग होऊ शकतो. संसर्ग झाल्यानंतर रुग्ण एक ते तीन दिवसांत बरा होतो. काही रुग्णांमध्ये गुंतागुंत वाढत जाऊन ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’ होत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी म्हटले आहे.

अशी आहे रुग्णांची आकडेवारी

पुणे महापालिका - ११पिंपरी-चिंचवड - १५ग्रामीण - ४४इतर जिल्ह्यातील - ३

गुइलेन-बॅरे सिंड्रोम गंभीर असू शकतो; परंतु योग्य उपचारांनी लोक बरे होऊ शकतात. ही एक दुर्मीळ न्यूरोलॉजिकल स्थिती आहे. ज्यामुळे हातपाय, मान, चेहरा आणि डोळे कमकुवत होतात. त्यामुळे मुंग्या येणे किंवा बधिर होणेदेखील होऊ शकते. गंभीर प्रकरणांमध्ये चालणे, गिळणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणेदेखील होऊ शकते. जर स्नायूंमध्ये अशक्तपणा, मुंग्या येणे किंवा श्वास घेण्यास त्रास जाणवला तर घाबरू नका; परंतु त्वरित वैद्यकीय मदत घ्या. - डॉ. परेश बाबेल, सल्लागार, एबीएमएच येथील न्यूरोलॉजिस्ट

योग्यवेळी उपचार घेतल्याने हा आजार बरा होऊ शकतो. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. अशा रुग्णांवर आयव्हीआयजी किंवा प्लाझ्मा एक्स्चेंजसारख्या उपचारांमुळे बरे होण्याची शक्यता वाढते आहे, हे सिद्ध झाले आहे. यामुळे दूषित अन्न खाणे बंद करावे. पाणी स्वच्छ आणि जंतुविरहित असावे. या संसर्गामुळे जुलाब आणि पोटदुखी यांसारखी लक्षणेदेखील होऊ शकतात.- एकनाथ पवार, अधिष्ठाता, ससून रुग्णालय

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्यhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरSocialसामाजिकfoodअन्नWaterपाणीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका