शहरं
Join us  
Trending Stories
1
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
2
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
3
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
4
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
5
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
6
सिंह राशीसाठी नवीन वर्ष 2026 स्वप्नपूर्तीचे वर्ष; आश्चर्याचे धक्के आणि परदेश प्रवासाचे योग!
7
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
8
अदानी ग्रुपकडून मिळाली ₹3400 कोटींची ऑर्डर, झटक्यात ५% नं वधारला शेअर; आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड
9
गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
10
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
11
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
12
बापरे! हिवाळ्यात 'या' छोट्या चुकांमुळे वेगाने गळू लागतात केस, टक्कल पडण्याची वाटते भीती
13
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
14
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
15
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
16
अबरारची दहशत अन् रहमान डकैतचा स्वॅग! पडद्यावरच्या 'बॅड बॉईज'ने कशी लुटली लाइमलाइट?
17
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
18
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
19
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
20
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

GBS: ‘जेजुनी अन् नोरो व्हायरस’मुळे दुर्मीळ ‘जीबीएस’ची बाधा', रुग्णसंख्या आता ७३ वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 11:14 IST

विषाणू दूषित अन्न अथवा पाण्यातून पसरत असला, तरी बाधित रुग्णाने उलटी केल्यास हा विषाणू हवेत पसरून त्याचा संसर्ग होऊ शकतो

पुणे: गुइलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस)ची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असून, आतापर्यंत ७३ रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये ४७ पुरुष आणि २६ महिलांचा समावेश आहे. यातील काही रुग्णांचे लघवी आणि रक्ताचे नमुने (सॅम्पल) राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही) तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल ‘एनआयव्ही’ने आरोग्य विभागाला पाठविला असून, यामध्ये ‘कॅम्पायलो बॅक्टर जेजुनी’ या जीवाणू आणि ‘नोरो व्हायरस’ या विषाणूमुळे दुर्मीळ ‘जीबीएस’ची बाधा झाल्याचे आता उघड झाले आहे.

जीबीएस रुग्णांचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठवण्यात आले होते. या अहवालात मूळ कारण निष्पन्न झाले असून, दूषित अन्न व पाण्यातून हे जीवाणू आणि विषाणू पसरल्याने रुग्णांना बाधा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही रुग्णांना ‘कॅम्पायलो बॅक्टर जेजुनी’ हा जीवाणू आणि काही रुग्णांमध्ये ‘नोरो व्हायरस’ हा विषाणू संसर्ग आढळून आला आहे. या दोन्हींचा संसर्ग दूषित अन्न अथवा पाण्यातून होतो. याचबरोबर या दोन्हींची लक्षणेही पोटदुखी, उलट्या आणि जुलाब ही आहेत. ‘जीबीएस’चा सर्व्हे आरोग्य प्रशासनाकडून करण्यात येत असून, आतापर्यंत पुणे शहरातील १९४३, पिंपरी-चिंचवड मनपा १७५० आणि ग्रामीण भागातील ३५२२ घरांना भेटी देऊन सर्वेक्षण करण्यात आले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता उघड्यावरील कोणतेही अन्न खाऊ नये. तसेच पाणी उकळून प्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले.

जगभरात दरवर्षी १० पैकी एका व्यक्तीला हा संसर्ग होतो. यामध्ये लहान मुलांचे प्रमाण जास्त आहे. या संसगार्मुळे मृत्यू होण्याचे प्रमाण कमी असून, हा विषाणू दूषित अन्न अथवा पाण्यातून पसरत असला, तरी बाधित रुग्णाने उलटी केल्यास हा विषाणू हवेत पसरून त्याचा संसर्ग होऊ शकतो. संसर्ग झाल्यानंतर रुग्ण एक ते तीन दिवसांत बरा होतो. काही रुग्णांमध्ये गुंतागुंत वाढत जाऊन ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’ होत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी म्हटले आहे.

अशी आहे रुग्णांची आकडेवारी

पुणे महापालिका - ११पिंपरी-चिंचवड - १५ग्रामीण - ४४इतर जिल्ह्यातील - ३

गुइलेन-बॅरे सिंड्रोम गंभीर असू शकतो; परंतु योग्य उपचारांनी लोक बरे होऊ शकतात. ही एक दुर्मीळ न्यूरोलॉजिकल स्थिती आहे. ज्यामुळे हातपाय, मान, चेहरा आणि डोळे कमकुवत होतात. त्यामुळे मुंग्या येणे किंवा बधिर होणेदेखील होऊ शकते. गंभीर प्रकरणांमध्ये चालणे, गिळणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणेदेखील होऊ शकते. जर स्नायूंमध्ये अशक्तपणा, मुंग्या येणे किंवा श्वास घेण्यास त्रास जाणवला तर घाबरू नका; परंतु त्वरित वैद्यकीय मदत घ्या. - डॉ. परेश बाबेल, सल्लागार, एबीएमएच येथील न्यूरोलॉजिस्ट

योग्यवेळी उपचार घेतल्याने हा आजार बरा होऊ शकतो. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. अशा रुग्णांवर आयव्हीआयजी किंवा प्लाझ्मा एक्स्चेंजसारख्या उपचारांमुळे बरे होण्याची शक्यता वाढते आहे, हे सिद्ध झाले आहे. यामुळे दूषित अन्न खाणे बंद करावे. पाणी स्वच्छ आणि जंतुविरहित असावे. या संसर्गामुळे जुलाब आणि पोटदुखी यांसारखी लक्षणेदेखील होऊ शकतात.- एकनाथ पवार, अधिष्ठाता, ससून रुग्णालय

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्यhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरSocialसामाजिकfoodअन्नWaterपाणीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका