शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

GBS: ‘जेजुनी अन् नोरो व्हायरस’मुळे दुर्मीळ ‘जीबीएस’ची बाधा', रुग्णसंख्या आता ७३ वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 11:14 IST

विषाणू दूषित अन्न अथवा पाण्यातून पसरत असला, तरी बाधित रुग्णाने उलटी केल्यास हा विषाणू हवेत पसरून त्याचा संसर्ग होऊ शकतो

पुणे: गुइलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस)ची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असून, आतापर्यंत ७३ रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये ४७ पुरुष आणि २६ महिलांचा समावेश आहे. यातील काही रुग्णांचे लघवी आणि रक्ताचे नमुने (सॅम्पल) राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही) तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल ‘एनआयव्ही’ने आरोग्य विभागाला पाठविला असून, यामध्ये ‘कॅम्पायलो बॅक्टर जेजुनी’ या जीवाणू आणि ‘नोरो व्हायरस’ या विषाणूमुळे दुर्मीळ ‘जीबीएस’ची बाधा झाल्याचे आता उघड झाले आहे.

जीबीएस रुग्णांचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठवण्यात आले होते. या अहवालात मूळ कारण निष्पन्न झाले असून, दूषित अन्न व पाण्यातून हे जीवाणू आणि विषाणू पसरल्याने रुग्णांना बाधा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही रुग्णांना ‘कॅम्पायलो बॅक्टर जेजुनी’ हा जीवाणू आणि काही रुग्णांमध्ये ‘नोरो व्हायरस’ हा विषाणू संसर्ग आढळून आला आहे. या दोन्हींचा संसर्ग दूषित अन्न अथवा पाण्यातून होतो. याचबरोबर या दोन्हींची लक्षणेही पोटदुखी, उलट्या आणि जुलाब ही आहेत. ‘जीबीएस’चा सर्व्हे आरोग्य प्रशासनाकडून करण्यात येत असून, आतापर्यंत पुणे शहरातील १९४३, पिंपरी-चिंचवड मनपा १७५० आणि ग्रामीण भागातील ३५२२ घरांना भेटी देऊन सर्वेक्षण करण्यात आले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता उघड्यावरील कोणतेही अन्न खाऊ नये. तसेच पाणी उकळून प्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले.

जगभरात दरवर्षी १० पैकी एका व्यक्तीला हा संसर्ग होतो. यामध्ये लहान मुलांचे प्रमाण जास्त आहे. या संसगार्मुळे मृत्यू होण्याचे प्रमाण कमी असून, हा विषाणू दूषित अन्न अथवा पाण्यातून पसरत असला, तरी बाधित रुग्णाने उलटी केल्यास हा विषाणू हवेत पसरून त्याचा संसर्ग होऊ शकतो. संसर्ग झाल्यानंतर रुग्ण एक ते तीन दिवसांत बरा होतो. काही रुग्णांमध्ये गुंतागुंत वाढत जाऊन ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’ होत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी म्हटले आहे.

अशी आहे रुग्णांची आकडेवारी

पुणे महापालिका - ११पिंपरी-चिंचवड - १५ग्रामीण - ४४इतर जिल्ह्यातील - ३

गुइलेन-बॅरे सिंड्रोम गंभीर असू शकतो; परंतु योग्य उपचारांनी लोक बरे होऊ शकतात. ही एक दुर्मीळ न्यूरोलॉजिकल स्थिती आहे. ज्यामुळे हातपाय, मान, चेहरा आणि डोळे कमकुवत होतात. त्यामुळे मुंग्या येणे किंवा बधिर होणेदेखील होऊ शकते. गंभीर प्रकरणांमध्ये चालणे, गिळणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणेदेखील होऊ शकते. जर स्नायूंमध्ये अशक्तपणा, मुंग्या येणे किंवा श्वास घेण्यास त्रास जाणवला तर घाबरू नका; परंतु त्वरित वैद्यकीय मदत घ्या. - डॉ. परेश बाबेल, सल्लागार, एबीएमएच येथील न्यूरोलॉजिस्ट

योग्यवेळी उपचार घेतल्याने हा आजार बरा होऊ शकतो. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. अशा रुग्णांवर आयव्हीआयजी किंवा प्लाझ्मा एक्स्चेंजसारख्या उपचारांमुळे बरे होण्याची शक्यता वाढते आहे, हे सिद्ध झाले आहे. यामुळे दूषित अन्न खाणे बंद करावे. पाणी स्वच्छ आणि जंतुविरहित असावे. या संसर्गामुळे जुलाब आणि पोटदुखी यांसारखी लक्षणेदेखील होऊ शकतात.- एकनाथ पवार, अधिष्ठाता, ससून रुग्णालय

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्यhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरSocialसामाजिकfoodअन्नWaterपाणीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका