शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

ऊस दर पाडण्यासाठीच अजित पवार माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष; रघुनाथ पाटील यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 13:15 IST

ऊस आणि दुधाला योग्य बाजारभाव मिळावा यासाठी शेतकरी संघटना लवकरच मोठे आंदोलन उभारणार

भिगवण: “महाराष्ट्रात ऊस कारखाने वाढत असले तरी साखर सम्राट म्हणून ओळखले जाणारे अजित पवार आता माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष म्हणून ऊस दर पाडण्याच्या प्रयत्नात आहेत. याचा थेट परिणाम शेतकऱ्यांना मिळणाऱ्या ऊस दरावर होणार असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी केला.

डिकसळ (ता. इंदापूर) येथे शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित ऊस व दूध परिषद शनिवारी पार पडली. त्यानंतर रघुनाथ पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. रघुनाथ पाटील म्हणाले, ‘‘२००९-१० मध्ये उसाला दुप्पट भाव मिळत होता, पण गेल्या १७ वर्षांत ऊस दर स्थिर आहे. सरकारने उसाला योग्य भाव द्यावा किंवा दोन कारखान्यांमधील अंतर कमी करावे, जेणेकरून शेतकरी दुसऱ्या कारखान्यांकडून चांगला भाव मिळवू शकतील,” अशी मागणी त्यांनी केली. त्याचप्रमाणे, २०१५ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लागू केलेल्या गोवंश हत्या कायद्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचे पाटील यांनी सांगितले. “अनावश्यक जनावरे विकली जाऊ शकत नाहीत, यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. दहा वर्षांपूर्वी शेतीमालाला चांगला भाव मिळत होता. दुधातील भेसळ थांबवली तर दुधाला योग्य दर मिळू शकतो. मात्र, सरकारने भेसळ रोखण्यासाठी बनवलेला कायदा भेसळ करणाऱ्यांना पैसे भरून सुटका करून देणारा आहे,” अशी टीका त्यांनी केली. यासोबतच, त्यांनी एक लीटर गायीच्या दुधाच्या बदल्यात एक लीटर डिझेल आणि एक लीटर म्हशीच्या दुधाच्या बदल्यात एक लीटर पेट्रोल देण्याची मागणी केली.

आंदोलनाचा इशारा

ऊस आणि दुधाला योग्य बाजारभाव मिळावा यासाठी शेतकरी संघटना लवकरच मोठे आंदोलन उभारणार आहे. यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आल्याचे रघुनाथ पाटील यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारSugar factoryसाखर कारखानेNCPराष्ट्रवादी काँग्रेसFarmerशेतकरीsugarcaneऊस