शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

रब्बी हंगाम जाणार खडतर; नऊ वर्षांतील दुसरे दुष्काळी वर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 02:07 IST

राज्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून पुणे शहर व परिसराला पाणीपुरवठा आणि जिल्ह्यातील शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणप्रकल्पात २०१५ वगळता गेल्या नऊ वर्षांतील सर्वांत कमी धरणसाठा उपलब्ध आहे.

पुणे : राज्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून पुणे शहर व परिसराला पाणीपुरवठा आणि जिल्ह्यातील शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणप्रकल्पात २०१५ वगळता गेल्या नऊ वर्षांतील सर्वांत कमी धरणसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे यंदा रब्बी हंगाम चांगलाच खडतर जाणार आहे. जलसंपदा विभागातर्फे इंदापूर, दौंड, बारामतीला शेतीसाठी आवर्तन सोडण्यात आले असून कालव्यातून सुमारे ८५ कि.मी.पर्यंत पाणी पोहोचले आहे.जिल्ह्यातील अनेक भागात दुष्काळी स्थिती असून राज्य शासनानेही १० तालुक्यांत दुष्काळसदृश्य स्थिती असल्याचे जाहीर केले आहे. यंदा जिल्ह्यातील धरण क्षेत्रात आॅगस्ट महिन्यापर्यंत संततधार पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश धरणे शंभर टक्के भरली. परिणामी खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडल्याने उजनी धरण १०० टक्के भरले. परंतु, जिल्ह्यातील काही तालुक्यात ४० ते ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला.त्यामुळे जिल्ह्यातील भात पिकांसह,बाजरी, ज्वारी, सोयाबीन आदी पिके जळून गेली आहेत. त्यातच दांडेकर पुलाजवळ कालवा फुटल्यामुळे तब्बल एक महिना कालव्यातून सोडण्यात आलेला विसर्ग बंद करावा लागला.दोन दिवसांपूर्वीच (रविवारी ) रब्बी हंगामासाठी विसर्ग सोडण्यात आला आहे. कालवा समितीच्या बैठकीत शेतीसाठी व पिण्यासाठी किती पाणी राखून ठेवावे.तसेच खरीप व रब्बी हंगामासाठी केव्हा पाणी सोडले जावे याबाबतचा निर्णय घेतला जातो. त्यानुसार यंदा १५ आॅक्टोबरपासून रब्बी हंगामासाठी पाणी सोडले जाणार होते. परंतु, सुमारे १५ दिवस कालव्यातून शेतीसाठी विसर्ग सोडण्यास उशीर झाला. त्यातच सध्या खडकवासला धरण प्रकल्पात २०१५ नंतर सर्वात कमी पाणीसाठा आहे. २०१५ मध्ये भीषण दुष्काळ पडला होता. त्यावेळी खडकवासला प्रकल्पात १५ आॅक्टोबर रोजी केवळ १६.१७ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. यंदा १५ आॅक्टोबर रोजी प्रकल्पात २५.३८ टीएमसी एवढा साठा शिल्लक होता.२०१०पासून २०१८ पर्यंतचा खडकवासला प्रकल्पातील हा सर्वात कमी साठा आहे. २०१० ते २०१४ पर्यंत १५ आॅक्टोबर रोजी २६ ते २८ टीएमसी पर्यंत धरणसाठा उपलब्ध होता.मागील वर्षी रब्बीसाठी 35 दिवस पाणीगेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने खडकवासला धरण प्रकल्पातून रब्बी तब्बल 35 दिवस पाणी सोडण्यात आले होते.तरीही धरणात मुबलक पाणी शिल्ल्क होते.जलसंपदा विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार मागील वर्षी 24 जानेवारी ते 28 फेब्रुवारी या कालावधीत कालव्यातून पाणी सोडण्यात आले होते.मागील वर्षी चांगला पाऊस झाल्याने २४ मार्च २०१८ ते १७ जून २०१८ पर्यंत कालव्यातून विसर्ग सोडण्यात आला होता. एकाही दिवसाचा खंड न ठेवता सुमारे तीन महिने कालव्यातून विसर्ग सोडण्यात आला होता.परंतु,यंदा पाऊस कमी झाल्याने शेती व पिण्यासाठी काटकसरीने पाणी वापरावे लागणार आहे. खडकवासल्यापासून सोडलेले पाणी २०२ कि.मी. चा प्रवास करून इंदापूरपर्यंत पोहचते. त्यामुळे पाणी पोहचण्यास आणखी काही दिवस लागणार आहेत.

टॅग्स :DamधरणFarmerशेतकरीwater scarcityपाणी टंचाई