शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
4
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
5
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
6
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
7
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
8
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
9
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
10
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
11
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
12
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
13
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
14
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
15
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
16
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
17
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
18
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
19
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
20
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीच्या टंचाईग्रस्त गावांमध्ये पुरंदरचे पाणी

By admin | Updated: August 18, 2014 23:16 IST

तालुक्याच्या जिरायती भागासाठी पुरंधर उपसा सिंचन योजना संजीवनी ठरणारी आहे. मात्र, या पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा वापर करणो गरजेचे आहे.

बारामती : तालुक्याच्या जिरायती भागासाठी पुरंधर उपसा सिंचन योजना संजीवनी ठरणारी आहे. मात्र, या पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा वापर करणो गरजेचे आहे. ठिबक सिंचन योजनेचे तंत्रज्ञान  ग्रामीण शेतक:यांनी अवलंबले पाहिजे. देशाच्या प्रत्येक भागातील बळीराजाने इस्त्रईल तंत्रज्ञानाचा वापर करणो ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी  केले.
आज  तालुक्याच्या 16 गावांसाठी वरदान ठरलेल्या पुरंधर उपसा सिंचन योजनेच्या पाण्याच्या जलपूजन व लोकार्पण सोहळा तरडोली गावच्या अंतर्गत भोईटेवाडी (ता.  बारामती) येथे पार पडला.  पहिल्या टप्प्यात 7 गावांतील तलावांमध्ये पाणी सोडण्यात आले. यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात पवार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार,  प्रमुख पाहुणो जलसंपदामंत्री शशिकांत ¨शदे होते. यावेळी जिल्हा परिषद बांधकाम सभापती भाऊसाहेब करे,  पंचायत समिती सभापती अमृता गारडे,  जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगांबर दुर्गाडे, विजय कोलते, किरण गुजर, अशोक टेकवडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, खरेदी विकी संघाचे अध्यक्ष अंकुश रसाळ,  युवक अध्यक्ष विक्रम भोसले,  सुनिल भगत,  किरण तावरे, लालासो नलवडे,  अनिल सोरटे यासह जिरायती भागातील सर्व गावांचे सरपंच, उपसरपंच, संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, जिरायती भागातील शेतक:यांच्या जीवनातील आजचा आनंदाचा दिवस उगवला आहे.  या भागातील सलग चार वर्ष पाण्याची टंचाई लक्षात घेऊन राज्य सरकारच्या तिजोरीतून या योजनेचे वीजबिल भरण्यात येणार आहे. पुरंधर उपसा योजनेचा हवेली, पुरंधर, दौंड, बारामती या तालुक्यातील गावांना फायदा होणार आहे. त्यासाठी दरमहा जवळपास 9क् हजार रुपये वीजबिल आकारणी होईल. दुष्काळी परिस्थितीमुळे राज्य शासन वीज बिलाचा भार सहन करणार आहे. परंतु, भविष्यात लाभक्षेत्रतील शेतक:यांनी नियमित पाणीपट्टी भरल्यास वीज बिलाचा प्रश्न मार्गी लागेल. उजनी धरणाला 13क्क् कोटी रुपये खर्च झाले. त्यावर दरवर्षी 5 ते 6 कोटी रुपये शेती उत्पन्न घेणारे 3 जिल्ह्यातील शेतकरी आहेत. त्याच प्रमाणो या योजनेचा देखील वीज बिलाचा प्रश्न सोडविण्यासाठी भविष्यात लोकसहभाग महत्त्वाचा ठरला आहे.  देशातील सांडपाण्याचा वापर करणारी व जमिनीपासून 1क्क्क् फुट उंच पाणी उचलणारी 6 टप्प्यातील शेती सिंचनाची ही पहिली योजना आहे. आता सध्या येणा:या पाण्याला वास येईल. परंतु, पुणो शहर व ¨पपरी चिंचवड महानगर पालिकेला या पाण्यावर पक्रिया करूनच ते नदीमध्ये सोडण्याचे सुचित केले आहे. यामुळे भविष्यात शेतीसाठी हे पाणी स्वच्छ मिळणार आहे.  आंबी ते बारामती दरम्यान क:हा नदी स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. नदीवरील 19 बंधा:यातील  गाळ काढण्यात येत आहे. यावेळी जलसंपदामंत्री शशीकांत ¨शदे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन शशांक मोहिते तर  नाना नेवसे यांनी केले. (प्रतिनिधी)
 
गुढय़ा उभारून केले पाण्याचे स्वागत..
लोकसभा निवडणुकीत अडचणीच्या ठरलेला 22 गावातील पाणी प्रश्न पुरंधर उपसाच्या माध्यमातून 6 ते 7 गावांचा आज सोडविण्यात आला आहे. योजनेचे पाणी तळ्यांमध्ये सोडले. पाणी प्रश्नावर या भागातील ग्रामस्थांनी आक्रमक आंदोलने केली. उपोषण, मोर्चा, महिलांचा हंडामोर्चा, काळ्या गुढय़ा उभारणो अशी आंदोलने झाली. आज मात्र याच गावांमध्ये पाणी आल्याचे स्वागत गुढय़ा उभारून करण्यात आले. ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला. 
 
दुष्काळी परिस्थितीमुळे राज्य शासन वीज बिलाचा भार सहन करणार आहे. परंतु, भविष्यात लाभक्षेत्रतील शेतक:यांनी नियमित पाणीपट्टी भरल्यास वीज बिलाचा प्रश्न मार्गी लागेल. उजनी धरणाला 13क्क् कोटी रुपये खर्च झाले. त्यावर दरवर्षी 5 ते 6 कोटी रुपये शेती उत्पन्न घेणारे 3 जिल्ह्यातील शेतकरी आहेत. 
-अजित पवार, उपमुख्यमंत्री
 
इस्त्रईल  हा देश फक्त पुणो जिल्ह्या एवढा आहे. पावसाचे दुर्भीक्ष्य येथे नेहमीच जाणवते. मात्र शेती उत्पन्नात जगात एक नंबरवर आहे.  अशा पद्धतीने तालुक्याच्या जिरायती भागातील शेतक:यांनी  शेती केली तर पाण्याची टंचाई जाणवणार नाही. उपलब्ध पाणी 4क् टक्के र्पयतच वापरता येणो शक्य आहे.  प्रत्येक गावातील शेतक:यांनी सामुहिक शेतीवर भर द्यावा. जमिनीच्या प्रतनुसार या भागातील शेतक:यांनी डाळींब व द्राक्ष यासारख्या फळबागांची लागवड केल्यास निश्चितच प्रत्येक भाग सुजलाम होईल. समाजाच्या मुख्य प्रवाहात सर्वाना आणण्यासाठी जातपात, धर्माचा विचार न करता सर्वसोयी देणो गरजेचे आहे.
-शरद पवार, माजी केंद्रीय कृषीमंत्री