शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
3
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
4
Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
5
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
6
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
7
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
8
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
9
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
10
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
11
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
12
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
13
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
14
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
15
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
16
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
17
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
18
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
19
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
20
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळाच्या भूसंपादनापूर्वी सरकारने आमच्याशी चर्चा करावी; पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 13:14 IST

मोबदला कसा आणि कशा पद्धतीने दिला जाईल, पैशांचे विभाजन कसे होईल, याबाबत डुडी यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केले.

पुणे : प्रस्तावित पुरंदरविमानतळाबाबत आतापर्यंत केवळ चर्चा सुरू असून, आमच्याशी सरकार चर्चा करत नाही. मात्र, भूसंपादनापूर्वी सरकारने आमच्याशी चर्चा करावी, अशी मागणी विमानतळासाठी संपादित करण्यात येणाऱ्या सहा गावांमधील गावकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. विमानतळासाठी भूसंपादन करण्यात येणार आहे. मात्र, त्या जागेबाबत मोबदला कसा आणि किती दिला जाणार, असा प्रश्न करून या प्रकल्पामुळे ग्रामस्थ विस्थापित होणार आहेत, त्यामुळे आम्ही चिंतित आहोत, असेही ग्रामस्थ म्हणाले.

पुरंदर तालुक्यातील वनपुरी, कुंभारवळण, उदाचीवाडी, एखतपूर, मुंजवडी, खानवडी या सहा गावांतील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची भेट घेतली. त्यावेळी विमानतळासाठी आमची सात गावे विस्थापित होणार आहेत. शेती हे आमचे उत्पन्नाचे साधन आहे. प्रकल्पासाठी जमिनी गेल्यावर आम्हाला उत्पन्नाचे साधन कोणते, नोकऱ्या उपलब्ध होणार नाही या सारख्या विविध तक्रारी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे उपस्थित केल्या.

या गावांमध्ये अंजीर पिकाचे मोठे उत्पादन घेण्यात येत आहे. सर्वाधिक उत्पादन हे पुरंदर तालुक्यात होत आहे. त्यामुळे आमचे नुकसान होत आहे. या गावातील शेतकरी अल्पभूधारक असून, यापुढे आम्ही शेती कशी करायची?, असा प्रश्न त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना विचारला. त्यामुळे आमचा या प्रकल्पाला विरोध आहे, असे त्यांनी दुधी यांना सांगितले.

पुरंदर विमानतळ झाल्यानंतर तुमच्या अंजिराच्या उत्पादनासाठी निर्यातीचा मार्ग खुला होईल. तसेच, विमानतळाच्या माध्यमातून पुरंदरच्या अंजिराची जगभर प्रचार प्रसिद्धी करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना दिले. भूसंपादनापूर्वी शेतकरी, जमीनमालकांशी चर्चा केली जाईल. शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही. सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात येणार आहे. त्यामुळे त्याचा मोबदला कसा आणि कशा पद्धतीने दिला जाईल, पैशांचे विभाजन कसे होईल, याबाबत डुडी यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केले.

भूसंपादनापूर्वी शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी प्रथमच जिल्हा प्रशासनाचे अधिकारी पुरंदर तालुक्यात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जाणार आहेत. तेथील शेतकरी, जमीन मालकांशी थेट चर्चा करणार आहेत. प्रकल्पाबाबत माहिती दिली जाणार आहे. प्रकल्पामुळे काय होईल, त्यासाठी भूसंपादन किती महत्त्वाचे आहे, मोबदला कशा पद्धतीने मिळेल, स्वेच्छेने दिल्यास मोबदला किती आणि विरोध केल्यास सक्तीने संपादन करून मोबदला किती मिळू शकेल, याबाबतची माहिती या बैठकीत शेतकऱ्यांना दिली जाईल, असे जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPurandarपुरंदरAirportविमानतळ