शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
5
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
6
इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
7
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
9
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
10
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
11
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
12
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
14
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
15
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
16
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
19
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
20
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याची पातळी पाहताना तोल गेला; विहिरीत पडून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 11:53 IST

विहिरीतील पाण्याची पातळी व वीजपंपाची स्थिती पाहण्यासाठी ते विहिरीजवळ गेले. यावेळी अचानक पाय घसरल्याने त्यांचा तोल जाऊन ते विहिरीत कोसळले.

रांजणगाव सांडस (पुणे जि. ) : शिरूर तालुक्यातील उरळगाव व परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, त्याच पार्श्वभूमीवर एका तरुण शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि. २७) घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

विशाल गेनभाऊ होलगुंडे (वय २६, रा. उरळगाव, ता. शिरूर, जि. पुणे) असे मृत्यू झालेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद त्यांचे चुलते भानुदास आप्पा होलगुंडे (वय ५५) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल होलगुंडे हे नेहमीप्रमाणे सकाळपासून शेतात काम करत होते. दरम्यान, विहिरीतील पाण्याची पातळी व वीजपंपाची स्थिती पाहण्यासाठी ते विहिरीजवळ गेले. यावेळी अचानक पाय घसरल्याने त्यांचा तोल जाऊन ते विहिरीत कोसळले. पोहता न आल्याने किंवा अपघाताच्या धक्क्यामुळे त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

घटनेच्या वेळी त्यांची आई अलका होलगुंडे यांनी विहिरीत पाहिले असता विशाल पाण्यात बुडत असल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ आरडाओरडा करून मदत मागितली. त्यांचा आवाज ऐकून जवळच शेतात काम करणारे भानुदास होलगुंडे व इतर शेतकरी घटनास्थळी धावून आले. स्थानिकांच्या मदतीने विशाल यांना बाहेर काढून तातडीने न्हावरे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणाचा पुढील तपास शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार दीपक पवार करीत आहेत.

दुष्काळाची झळ अधिक तीव्र

उरळगाव व पूर्व भागातील अनेक गावांमध्ये सध्या भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. विहिरी व बोअरवेलची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात घटली असून, शेतकरी उरलेल्या पाण्यावर पिके जगविण्यासाठी धडपड करत आहेत. अशा परिस्थितीत विहिरीतील पाणी तपासण्यासाठी गेलेल्या तरुण शेतकऱ्याला जीव गमवावा लागल्याने दुष्काळाची झळ किती तीव्र आहे, याची जाणीव पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Young farmer dies falling into well while checking water level.

Web Summary : A young farmer from Uralgaon, Shirur, died after falling into a well while checking the water level. Vishal Holgunde, 26, lost his balance and drowned. The incident highlights the severe water scarcity in the region, where farmers struggle to save their crops.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेHeat Strokeउष्माघात