शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

मुबलक पाऊस, तरीही तहानलेली गावे; भीमा नदीचे पात्र कोरडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 18:49 IST

- धरणे परिसरातच, पण पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती; शेतकरी-ग्रामस्थांची आवर्तन थांबविण्याची मागणी

डेहणे : खेड तालुक्याच्या पश्चिमेकडील आदिवासी भागातील पाणीटंचाई तेथील वास्तव अधोरेखित करीत आहे. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांनी व्यापलेल्या या परिसरात पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडतो; मात्र, उन्हाळा आला की पिण्याच्या पाण्यासाठी गावोगावी भटकंती करावी लागते. चासकमान आणि कळमोडी ही धरणे या भागात असूनही स्थानिकांना त्याचा लाभ होत नसल्याची खंत ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

धरण उभारणीसाठी अनेक ग्रामस्थांनी आपल्या शेत जमिनी दिल्या. या धरणांमुळे परिसरात हरितक्रांती घडेल, अशी अपेक्षा होती; मात्र, आज परिस्थिती अशी आहे की, शेतीसाठी सोडाच पण पिण्यासाठीही पाणी मिळणे कठीण झाले आहे.

खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील भीमा नदीचे पात्र कोरडे पडल्याने खरोशी, डेहणे, शेंदुर्ली, वांजाळे, धुवोली, शिरगाव, टोकावडे या नदीकाठच्या गावांमध्ये पिण्याचे पाणी व जनावरांच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. आव्हाट गाव धरणालगत असले तरी बुरुडवाडी, भागीतवाडी, भगतवाडी, तरपाडेवाडी तसेच कारकुडी, उगलेवाडी, येलवळी, धामणगाव, नायफड येथील अनेक वाड्या-वस्त्यांमध्ये स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीतही पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरूच आहे.

भीमा नदीकाठावरील शेतांतील हिरवीगार पिके पाण्याअभावी करपण्याच्या मार्गावर आहेत. काही शेतकरी नदीतील उरलेल्या डोहांमधून आणि झऱ्यांमधून पाणी आणून पिके वाचविण्याचा प्रयत्न करताना दिसतात. भीमा नदीच्या पाण्यावर दौंड आणि शिरूर तालुक्यातील अनेक बंधारे भरून वाहत असताना, धरणासाठी जमीन दिलेल्या पश्चिम भागातील गावे मात्र तहानलेलीच असल्याची भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत.

नदीची पाणीपातळी तळाला गेल्याने कृषिपंप नदीच्या मध्यभागी असतानाही उपयोग होत नाही. सलग आवर्तन सुरू ठेवल्याने नदीपात्र पूर्णपणे कोरडे पडले आहे. आवर्तन थांबवून शिल्लक पाणी स्थानिकांसाठी राखून ठेवावे, अशी मागणी या परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.

गेल्या तीन वर्षांपासून रब्बी हंगाम पाण्याअभावी वाया जात आहे. विहिरी, कूपनलिका आटल्या असून, अनेक गावे टँकरच्या निकषातही बसत नसल्याने पाणीटंचाई अधिकच तीव्र झाली आहे. माणसांनाच पिण्याचे पाणी मिळत नाही तर जनावरांचे काय, असा प्रश्न दुग्धउत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे. चाऱ्याअभावी आणि पाण्याअभावी जनावरांच्या आरोग्यावरही परिणाम होत असल्याचे चित्र दिसत आहे.

भूमिगत बंधारे कागदावरच

पश्चिम भागातील आदिवासी पट्ट्यात भीमा नदीवर किमान नऊ ठिकाणी बंधारे उभारता येऊ शकतात. कृष्णा खोरे लवादाच्या नियमांनुसार हे काम शक्य असल्याचे सांगितले जाते. स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रस्ताव दिल्याचे अनेक वर्षे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात काम सुरू झालेले नाही.

कोल्हापूर पद्धतीचे बंधारे उभारल्यास पावसाळ्यानंतरही सहा महिन्यांपर्यंत पाणी साठवता येऊ शकते, असे जाणकारांचे मत आहे. त्यामुळे पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाय होण्यासाठी या बंधाऱ्यांसाठी जनमताचा रेटा आवश्यक असल्याची भावना व्यक्त होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Abundant Rain, Thirsty Villages: Bhima Riverbed Runs Dry.

Web Summary : Despite heavy rainfall and dams, villages in Khed face severe water scarcity. The Bhima riverbed is dry, impacting drinking water and agriculture. Residents demand water reserves and blame continuous irrigation for the crisis. Delayed dam projects exacerbate the issue.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेWaterपाणी