शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

भरधाव गाडीचा टायर फुटून अपघात; एकाचा मृत्यू; वडगाव निंबाळकर पोलिसात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 10:34 IST

टायर अचानक फुटल्याने गाडीवरील नियंत्रण सुटले व ती रस्त्याच्या उजव्या बाजूस रॉंग साईडने खाली गेली

सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील मुरटी गावाच्या हद्दीत जय मल्हार ढाब्याजवळ भरधाव चारचाकी गाडीचा टायर फुटून झालेल्या अपघातात एका २५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे. या अपघातात मृत झालेला युवकच गाडी चालवत होता.  हा अपघात १३ फेब्रुवारी २०२५ रोजी झाला असून याबाबत काल दि. १२ मे रोजी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिकच्या माहितीनुसार, या प्रकरणी डॉ. शुभम हरीभाऊ जगताप (वय २८, रा. धायरी, सिंहगड रोड, बेनकर वस्ती, रो हाउस नं. २४, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. हा अपघात १३ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी १.३० च्या सुमारास, ह्युंदाई कंपनीची वेरणा कार (क्रमांक MH 12 TK 9217) मयुर जगताप यांच्या ताब्यात होती. गाडी अत्यंत वेगात चालवली जात असताना उजव्या बाजूचा टायर अचानक फुटल्याने गाडीवरील नियंत्रण सुटले व ती रस्त्याच्या उजव्या बाजूस रॉंग साईडने खाली गेली. या अपघातात  मयुर जगताप यांचा जागीच मृत्यू झाला.या अपघातात कारचेही मोठे नुकसान झाले आहे. फिर्यादीने आपल्या निवेदनात मृत व्यक्तीच अपघातास जबाबदार असल्याचे स्पष्ट केले आहे. यावरून वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलीस करत असून, गुन्हा नोंद १२ मे २०२५ रोजी  करण्यात आली. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAccidentअपघात