शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

नेहमीइतकेच पाणी मिळूनही अडचणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2018 03:06 IST

शहरात पाणी टंचाई निर्माण होत असेल तर दिवाळीनंतर प्रत्यक्ष १ हजार १५० एमएलडी पाणी रोज मिळू लागले तर काय असा प्रश्न पुणेकरांना भेडसावू लागला आहे.

पुणे : पाटबंधारे खात्याने १ हजार १५० एमएलडी दररोज, असा इशारा दिला असला तरी सध्याही महापालिका खडकवासला धरणातून रोज त्यापेक्षा जास्त म्हणजे १२७० एमएलडी पाणी उचलत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. शहरात पाणी टंचाई निर्माण होत असेल तर दिवाळीनंतर प्रत्यक्ष १ हजार १५० एमएलडी पाणी रोज मिळू लागले तर काय असा प्रश्न पुणेकरांना भेडसावू लागला आहे.खडकवासला धरणातून १० नोव्हेंबर २०१८ पर्यंत महापालिका रोज १ हजार ५७४ एमएलडी पाणी घेत होती. त्यानंतर ११ नोव्हेंबरपासून आजपर्यंत दररोज १ हजार २७० एमएलडी पाणी उचलले जात आहे. तरीही पाणी कमी पडत आहे. पाटबंधारे खात्याने महापालिकेला दिवाळीनंतर १ हजार १५० एमएलडीच पाणी मिळेल, असे लेखी कळवले तर आहेच. शिवाय त्यापेक्षा जास्त पाणी उचलले तर पुन्हा पंप बंदची कारवाई करण्याची तंबीही दिली आहे. त्यामुळेच महापालिकेने पाणी नियोजनाच्या नावाखाली आताच कपात सुरू केली असल्याचे बोलले जात आहे.पाण्याचे वितरण कागदोपत्री बरोबर असले तरीही पाणी टंचाई होते याची अनेक कारणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातून सांगितली जातात. शहरातंर्गत असलेली सर्व वितरण व्यवस्था जुनी झाली आहे. सलग पाणी सोडले गेले तर फारशी अडचण होत नाही, मात्र पाणी सोडणे थांबवले तर पाईपलाईन रिकामी होते. त्यात हवा भरली जाते. त्यानंतर पाणी सोडले की पाईप फुटतात. दुरूस्ती केल्यानंतर पुन्हा सर्व यंत्रणा नीट होऊन पाणी पुरवठा सुरळीत होण्यास वेळ लागतो, असे पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणारपुण्याची अधिकृत लोकसंख्या, उद्योग तसेच ग्रामपंचायती यांना द्यावे लागणारे पाणी, अशी सर्व सांख्यिकी माहिती सादर करून मुख्यमंत्र्यांकडे पाण्याचा कोटा वाढवून मागणार असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी जाहीर केले आहे.मात्र, महापालिकेने काही वर्षांपूर्वीच असा प्रस्ताव दिलेला असून त्याकडे सरकारी स्तरावर पूर्ण दुर्लक्ष झाले आहे, असे अधिकाºयांनी सांगितले.

टॅग्स :WaterपाणीDamधरणPuneपुणे