शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
2
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
3
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
4
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
5
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
6
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
7
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
8
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
9
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
10
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
11
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
12
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
13
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
14
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
15
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
16
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
17
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
18
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
19
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
20
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...

नेहमीइतकेच पाणी मिळूनही अडचणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2018 03:06 IST

शहरात पाणी टंचाई निर्माण होत असेल तर दिवाळीनंतर प्रत्यक्ष १ हजार १५० एमएलडी पाणी रोज मिळू लागले तर काय असा प्रश्न पुणेकरांना भेडसावू लागला आहे.

पुणे : पाटबंधारे खात्याने १ हजार १५० एमएलडी दररोज, असा इशारा दिला असला तरी सध्याही महापालिका खडकवासला धरणातून रोज त्यापेक्षा जास्त म्हणजे १२७० एमएलडी पाणी उचलत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. शहरात पाणी टंचाई निर्माण होत असेल तर दिवाळीनंतर प्रत्यक्ष १ हजार १५० एमएलडी पाणी रोज मिळू लागले तर काय असा प्रश्न पुणेकरांना भेडसावू लागला आहे.खडकवासला धरणातून १० नोव्हेंबर २०१८ पर्यंत महापालिका रोज १ हजार ५७४ एमएलडी पाणी घेत होती. त्यानंतर ११ नोव्हेंबरपासून आजपर्यंत दररोज १ हजार २७० एमएलडी पाणी उचलले जात आहे. तरीही पाणी कमी पडत आहे. पाटबंधारे खात्याने महापालिकेला दिवाळीनंतर १ हजार १५० एमएलडीच पाणी मिळेल, असे लेखी कळवले तर आहेच. शिवाय त्यापेक्षा जास्त पाणी उचलले तर पुन्हा पंप बंदची कारवाई करण्याची तंबीही दिली आहे. त्यामुळेच महापालिकेने पाणी नियोजनाच्या नावाखाली आताच कपात सुरू केली असल्याचे बोलले जात आहे.पाण्याचे वितरण कागदोपत्री बरोबर असले तरीही पाणी टंचाई होते याची अनेक कारणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातून सांगितली जातात. शहरातंर्गत असलेली सर्व वितरण व्यवस्था जुनी झाली आहे. सलग पाणी सोडले गेले तर फारशी अडचण होत नाही, मात्र पाणी सोडणे थांबवले तर पाईपलाईन रिकामी होते. त्यात हवा भरली जाते. त्यानंतर पाणी सोडले की पाईप फुटतात. दुरूस्ती केल्यानंतर पुन्हा सर्व यंत्रणा नीट होऊन पाणी पुरवठा सुरळीत होण्यास वेळ लागतो, असे पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणारपुण्याची अधिकृत लोकसंख्या, उद्योग तसेच ग्रामपंचायती यांना द्यावे लागणारे पाणी, अशी सर्व सांख्यिकी माहिती सादर करून मुख्यमंत्र्यांकडे पाण्याचा कोटा वाढवून मागणार असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी जाहीर केले आहे.मात्र, महापालिकेने काही वर्षांपूर्वीच असा प्रस्ताव दिलेला असून त्याकडे सरकारी स्तरावर पूर्ण दुर्लक्ष झाले आहे, असे अधिकाºयांनी सांगितले.

टॅग्स :WaterपाणीDamधरणPuneपुणे