शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

नेहमीइतकेच पाणी मिळूनही अडचणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2018 03:06 IST

शहरात पाणी टंचाई निर्माण होत असेल तर दिवाळीनंतर प्रत्यक्ष १ हजार १५० एमएलडी पाणी रोज मिळू लागले तर काय असा प्रश्न पुणेकरांना भेडसावू लागला आहे.

पुणे : पाटबंधारे खात्याने १ हजार १५० एमएलडी दररोज, असा इशारा दिला असला तरी सध्याही महापालिका खडकवासला धरणातून रोज त्यापेक्षा जास्त म्हणजे १२७० एमएलडी पाणी उचलत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. शहरात पाणी टंचाई निर्माण होत असेल तर दिवाळीनंतर प्रत्यक्ष १ हजार १५० एमएलडी पाणी रोज मिळू लागले तर काय असा प्रश्न पुणेकरांना भेडसावू लागला आहे.खडकवासला धरणातून १० नोव्हेंबर २०१८ पर्यंत महापालिका रोज १ हजार ५७४ एमएलडी पाणी घेत होती. त्यानंतर ११ नोव्हेंबरपासून आजपर्यंत दररोज १ हजार २७० एमएलडी पाणी उचलले जात आहे. तरीही पाणी कमी पडत आहे. पाटबंधारे खात्याने महापालिकेला दिवाळीनंतर १ हजार १५० एमएलडीच पाणी मिळेल, असे लेखी कळवले तर आहेच. शिवाय त्यापेक्षा जास्त पाणी उचलले तर पुन्हा पंप बंदची कारवाई करण्याची तंबीही दिली आहे. त्यामुळेच महापालिकेने पाणी नियोजनाच्या नावाखाली आताच कपात सुरू केली असल्याचे बोलले जात आहे.पाण्याचे वितरण कागदोपत्री बरोबर असले तरीही पाणी टंचाई होते याची अनेक कारणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातून सांगितली जातात. शहरातंर्गत असलेली सर्व वितरण व्यवस्था जुनी झाली आहे. सलग पाणी सोडले गेले तर फारशी अडचण होत नाही, मात्र पाणी सोडणे थांबवले तर पाईपलाईन रिकामी होते. त्यात हवा भरली जाते. त्यानंतर पाणी सोडले की पाईप फुटतात. दुरूस्ती केल्यानंतर पुन्हा सर्व यंत्रणा नीट होऊन पाणी पुरवठा सुरळीत होण्यास वेळ लागतो, असे पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणारपुण्याची अधिकृत लोकसंख्या, उद्योग तसेच ग्रामपंचायती यांना द्यावे लागणारे पाणी, अशी सर्व सांख्यिकी माहिती सादर करून मुख्यमंत्र्यांकडे पाण्याचा कोटा वाढवून मागणार असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी जाहीर केले आहे.मात्र, महापालिकेने काही वर्षांपूर्वीच असा प्रस्ताव दिलेला असून त्याकडे सरकारी स्तरावर पूर्ण दुर्लक्ष झाले आहे, असे अधिकाºयांनी सांगितले.

टॅग्स :WaterपाणीDamधरणPuneपुणे