शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
4
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
5
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
6
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
7
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
8
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
9
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
10
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
11
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
12
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
13
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
14
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
15
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
16
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
17
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
18
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
19
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
20
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
Daily Top 2Weekly Top 5

पारंपरिक अभ्यासक्रम विद्याथ्र्याच्या पसंतीस

By admin | Updated: October 4, 2014 01:42 IST

चांगल्या पगाराची नोकरी मिळत नसल्यामुळे केवळ व्यावसायिक अभ्यासक्रमांनाच प्रवेश घेणारे विद्यार्थी आता पारंपरिक अभ्यासक्रमांनाही प्रवेश घेत असल्याचे आश्वासक चित्र दिसून येत आहे.

पुणो : चांगल्या पगाराची नोकरी मिळत नसल्यामुळे केवळ व्यावसायिक अभ्यासक्रमांनाच प्रवेश घेणारे विद्यार्थी आता पारंपरिक अभ्यासक्रमांनाही प्रवेश घेत असल्याचे आश्वासक चित्र दिसून येत आहे. पुण्यात पारंपरिक अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी येणा:या विद्याथ्र्याचा टक्क दरवर्षी वाढत चालला आहे. परंतु, शिक्षणशास्त्र (बीएड) अभ्यासक्रमास प्रवेश घेणा:या विद्याथ्र्याची संख्या घटत चालली आहे.
कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या विविध अभ्यासक्रमास प्रवेश घेणा:या विद्याथ्र्याची संख्या काही वर्षापूर्वी घटत चालली असल्याचे दिसून येते होते. परंतु, शासकीय कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीच्या आधारे पुण्यात पारंपरिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यास येणा:या विद्यार्थाच्या संख्येत गेल्या पाच वर्षापासून सातत्याने वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. परिणामी विद्यार्थी व्यवसाय अभ्यासक्रमालाच पसंती देत नाहीत तर पारंपरिक अभ्यासक्रमाकडेही वळत असल्याचे स्पष्ट होत आहे.
इयत्ता बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर पुण्यात पदवीचे शिक्षण घेणा:यासाठी राज्यातील विविध ठिकाणचे विद्यार्थी येत असतात. या विद्याथ्र्याची आकडेवारी विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाने महाविद्यालयांकडून जमा केली आहे. त्यानुसार पुण्यात प्रथम वर्षाचे शिक्षण घेण्यासाठी येणा:या विद्याथ्र्याच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. 2011-12 या शैक्षणिक वर्षात कला शाखेत 97 हजार 955 विद्याथ्र्यानी प्रवेश घेतला तर 2012-13 या शैक्षणिक वर्षात 1 लाख 56 विद्याथ्र्यानी प्रवेश घेतला. परंतु, बीएड अभ्यासक्रमास प्रवेश घेणा:या विद्याथ्र्याची संख्या गेल्या दोन वर्षात दोन हजाराने कमी झाली आहे. देशाच्या विकासासाठी विविध क्षेत्रंत संशोधन होणो आवश्यक आहे. परंतु संशोधनासाठी पायाभूत शिक्षण गरजेचे असते. त्याचप्रमाणो विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेतील काही विषयांचा अभ्यासक्र उपयुक्त ठरतो. त्यामुळे केवळ अभियांत्रिकी, मेडिकल, फार्मसी, आर्किटेक्चर आदी अभ्यासक्रमांना प्रवेश न घेता नामांकित महाविद्यालयांत पारंपरिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणा:या विद्याथ्र्याची संख्या वाढत आहे. इयत्ता बारावीचा निकालाचा टक्का वाढल्यामुळेही पारंपरिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणा:यांची संख्या वाढत चालली असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.(प्रतिनिधी)