शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

देहूतील काही भागात वीज पुरवठा खंडीत; २४ तासाहून अधिक काळ बत्ती गुल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 1:06 PM

परिसरातील नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत असून त्यांनी महावितरणचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.

ठळक मुद्देनागरिकांना सोसायट्यांना जमिनीतील टाक्यांमधुन पाणी इमारतीवर चढवता येत नसल्याने वापराचे पाणीच नसल्याने चांगलीच तारांबळ

देहूगाव: देहूगावच्या गावठाण परिसरात गेल्या २४ तासांपासुन विद्यूत पुरवठा खंडीत झाला झाल्याने या परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भर पावसात पाण्याच्या एटीएमवर रांगा लावाव्या लागत आहेत. परिसरातील नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत असून त्यांनी महावितरणचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.

देहूगाव गावठाण भागातील सुतार आळी, बाजारआळी या भागात भूमीगत विद्यूत वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. या भागातील विद्यूत पुरवठा मंगळवारी सकाळी ११ वाजल्या पासुन खंडीत झाला आहे. तर विठ्ठलनगर भागातही मंगळवार रात्रीपासून विद्यूत पुरवठा खंडीत होता. तो सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सुरळीत झाला. मात्र तोही डीम आहे. या बाबत येथील महावितरणच्या कार्यालयात तक्रारही दिली असून येथील अधिकाऱ्यांशी चर्चा देखील करूनही अद्याप विद्यूत बुधवार दुपारी १२ वाजे पर्यंतही विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला नव्हता.

परिणामी या भागात साधारण अडीच ते तीन हजार लोकसंख्या आहे. या भागात सोसायट्या विकसित झाल्या आहेत. या परिसरात विद्यूत पुरवठा खंडीत झाल्याने या सोसायट्यांना जमिनीतील टाक्यांमधुन पाणी इमारतीवर चढवता येत नसल्याने वापराचे पाणीच नसल्याने चांगलीच तारांबळ उडाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी या भागातील नागरिकांना भर पावसातत पाण्याच्या एटीएमवर रांगा लावाव्या लागत आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत असून त्यांनी महावितरणचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.

या बाबत येथील शाखा अभियंता अनिल गौडा म्हणाले की, या भागात भूमीगत विद्यूत वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. या भागातील विद्यूत वाहिनी तपासली असून दोष शोधला आहे. यासाठी केबल दोष काढणाऱ्या व त्याचे जोडारी एजन्सीकडे पाठपुरावा करूनही कर्मचारी उपलब्ध होत नसल्याने कामाला वेळ लागत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र बुधवार दुपार पर्यंत हे काम होईल असे सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेelectricityवीजdehuदेहूPoliceपोलिसSocialसामाजिक