शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

बोधकथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:11 IST

स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या काळात महाराष्ट्राला लाभलेलं प्रतिभासंपन्न राजकीय व्यक्तिमत्त्व म्हणजे बॅरिस्टर नाथ पै. कोकणातील वेंगुर्ले गावात मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या पंढरीनाथ ...

स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या काळात महाराष्ट्राला लाभलेलं प्रतिभासंपन्न राजकीय व्यक्तिमत्त्व म्हणजे बॅरिस्टर नाथ पै. कोकणातील वेंगुर्ले गावात मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या पंढरीनाथ पै यांच्या प्रखर बुद्धिमत्तेची झलक अल्पवयातच दिसून आली. ते पुढे कायद्याचे निष्णात पंडित बनले. त्यांना महत्त्वाकांक्षा व चांगल्या-वाईटाची पारख लहान वयातच कशी होती, हे अधोरेखित करणारा हा प्रसंग.

नाथ पै एकपाठी होते. कोणत्याही गोष्टीचं आकलन त्यांना पटकन होई, पण शाळेत असताना त्यांचा गणित विषय कच्चा होता. गणितात वारंवार चुका होत. एकदा असंच गणित चुकलं म्हणून पंढरीनाथांना शिक्षकांचा खरपूस मार खावा लागला. नाथाने घरात या गोष्टीची वाच्यता केली नाही, मात्र हाता पायांवरील काळेनिळे डाग पाहून गुरुजींनी केलेली शिक्षा घरात सर्वांना समजली. नाथ घरातील शेंडेफळ असल्याने सर्वांनाच खूप वाईट वाटलं. नाथांचा वडीलभाऊ तर संतापलाच. दुसऱ्या दिवशी शाळेत जाऊन गुरुजींना जाब विचारायचा, असं त्याने ठरवूनही टाकलं. नाथाला हे समजताच रात्री जेवणाच्या वेळी ते सर्वांना उद्देशून म्हणाले, "माझ्या हितासाठीच गुरुजींनी मला शिक्षा केली. माझा गणित हा कच्चा विषय सुधारावा, असं गुरुजींना मनापासून वाटतं. तुम्ही शाळेत येऊन त्यांना जाब विचारल्यास यापुढे गुरुजी मला शिक्षा करणार नाहीत. माझ्याकडे दुर्लक्ष करतील. त्यामुळे नुकसान माझंच होईल. घरातील मंडळी मला पाठीशी घालतात, असा समज होऊन स्वतःतील दोष दूर करण्यापेक्षा मी त्यांचं समर्थनच करायला लागेन. त्यामुळे कृपया गुरुजींच्या या शिक्षेकडे सर्वांनी दुर्लक्ष करावं."

गुरुजींच्या शिक्षेमुळे आपल्यातच सुधारणा होणार आहे, अशी लहान वयातच असलेली पंढरीनाथ यांची समज त्यांच्या कणखर मानसिकतेची साक्ष देणारी आहे. या वृत्तीमुळेच भविष्यात नाथ पै यांनी स्वतःमधील कच्च्या दुव्यांवर मात करीत प्रतिभासंपन्न नेता म्हणून लौकिक कमावला.

- प्रसाद भडसावळे