शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

...अन्यथा आगीत आणखी होरपळले असते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 4:12 AM

पुणे : सिरम इन्स्टिट्यूटला गुरुवारी (दि. २२) लागलेल्या आगीत ५ जणांचा मृत्यू झाला. आग लागली त्या वेळी जेवणाची सुट्टी ...

पुणे : सिरम इन्स्टिट्यूटला गुरुवारी (दि. २२) लागलेल्या आगीत ५ जणांचा मृत्यू झाला. आग लागली त्या वेळी जेवणाची सुट्टी झाली होती. त्यामुळे बहुतांश कामगार इमारतीबाहेर पडले होते. जेवण झाल्यानंतर जे कामगार वरच्या मजल्यावर गेले, तेच प्रामुख्याने या आगीच्या कचाट्यात सापडले. आग थोडी उशिरा किंवा आधी लागली असती तर आगीमुळे जखमी अथवा मृत होणाऱ्यांची संख्या वाढली असती, अशी भीती तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

पोलिसांकडून या आगीच्या वेळी तेथे कामावर असलेल्या कामगारांचे जबाब घेण्याचे काम सुरु आहे. त्यात आग पाहिल्याचे सांगणारे अजून कोणीही पुढे आलेले नाही. अनेकांनी जबाब देताना ‘आग’ ‘आग’ असा आरडाओरडा ऐकल्याने आम्ही आग लागल्याचे पाहून हातातील कामे टाकून बाहेर पळाल्याचे सांगत आहेत. प्रत्यक्ष आग लागल्याचे आपण पाहिले, असे सांगणारे आतापर्यंत कोणीही पुढे आले नाही.

चौकट

८-१० ठेकेदारांचे काम

या ठिकाणी एकाच वेळी ८ ते १० ठेकेदारांचे कामगार काम करीत होते. त्यात काही इलेक्ट्रिक, काही फर्निचरचे काम करत होते. काही जण वातानुलुकीत यंत्रणेचे काम करत होते. छताचे पीओपी करणारे काही कामगार होते. तेथेच वेल्डिंगचे कामही सुरु होते. त्यामुळे आग नेमकी कोणाच्या चुकीमुळे लागली, याचा तपास करणे किचकट असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

चौकट

अंत्यसंस्कार गावाकडे

या आगीत मृत्युमुखी पडलेल्या पाच जणांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर शुक्रवारी (दि. २२) पहाटे नातेवाईकांच्या ताब्यात पार्थिव देण्यात आले. प्रतीक पाष्टे याच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. महेंद्र इंगळे हे इलेक्ट्रिक इंजिनिअर होते. त्यांचा भाऊ संदीप इंगळे धायरीत राहात होते. महेंद्र यांचे पार्थिव त्यांचे मूळ गाव अकोला तालुक्यातील चांदूरगावला नेण्यात आले. उमा शंकर हरिजन हे उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील असून बिपिन सरोज हेही प्रतापगड जिल्ह्यातील आहेत. दोघांचे मृतदेह गावी नेण्यात आले. सुशीलकुमार पांडे यांचे पार्थिव बिहारमधील पश्चिम चंपारण्य जिल्ह्यातील जोगिया गावी रुग्णवाहिकेतून नेण्यात आले.