शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोधासाठी विरोध हाच एकमेव अजेंडा : विजया रहाटकर 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 12:37 PM

जनतेसमोर मांडण्यासाठी त्यांच्याकडे कोणतेही मुद्दे नाहीत. त्यांचा विरोध केवळ विरोधासाठी आहे

पुणे  - पंतप्रधान मोदींना विरोधासाठी विरोध करणे हा विरोधकांचा एकमेव अजेंडा आहे. याखेरीज त्यांच्याकडे बोलण्यासारखे काही उरले नाही, अशी टीका भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय महिला मोर्चाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केली. कसबा विधानसभा मतदार संघ आणि कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाच्या वतीने महायुतीचा महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या. आरपीआयच्या राष्ट्रीय नेत्या सीमा आठवले, महापौर मुक्ताताई टिळक, भाजपच्या महिला शहर प्रमुख शशिकला मेंगडे, स्वरदा बापट, शिवसेनेच्या नेत्या तृष्णा विश्वासराव , वैशाली नाईक , संगीता आठवले , त्याचप्रमाणे भाजप , शिवसेना,आरपीआय आणि अन्य घटक पक्षाच्या महिला पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होत्या. मेळाव्यास महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. विरोधकांकडे धोरण नाही आणि नेता नाही असे स्पष्ट करून रहाटकर म्हणाल्या, जनतेसमोर मांडण्यासाठी त्यांच्याकडे कोणतेही मुद्दे नाहीत. त्यांचा विरोध केवळ विरोधासाठी आहे. विकासाचा कोणताही कार्यक्रम नाही.  म्हणूनच देशाच्या विकासासाठी पुन्हा एकदा मोदी सरकार हवे आहे. हे सरकार सक्षम आणि मजबूत असावे यासाठी बहुमताने सरकारला निवडून द्या  केवळ पुण्यात नाही तर राज्यात आणि देशात जास्तीतजास्त जागा आपणास मिळाल्या पाहिजेत यासाठी प्रयन्त करा. महिलांसाठी सरकारने अनेकविध योजना आणल्या. त्याची माहिती घरोघरी पोचवा, असे त्या म्हणाल्या. आरपीआय नेत्या आठवले म्हणाल्या, समाजातील गरीब, शेतकरी, कष्टकरी, अशा विविध घटकासाठी सरकारने योजना आणल्या आहेत त्याची माहिती महिलांनी स्वत: करून घ्यावी आणि इतरांना सांगावी. राज्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या फरकाने निवडून आणा. महापौर टिळक यांनी सांगितले की , गेल्या पाच वर्षात मोदी सरकारने केवळ महिला सक्षमीकरणासाठी योजना आणल्या नाहीत तर जगात देशाची प्रतिष्ठा उंचावली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा सरकारला आपणाला संधी  द्यायची आहे. 

टॅग्स :PuneपुणेVijaya Rahatkarविजया रहाटकरBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदी