शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

धरणग्रस्तांचे प्रश्न मार्गी लागल्यावरच पाणी उचलू

By admin | Updated: April 17, 2017 06:33 IST

भामा आसखेड धरणग्रस्तांचे सर्व प्रश्न मार्गी लागल्याशिवाय जॅकवेलमधून पाणी उचलणार नाही, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी भामा आसखेड

पाईट : भामा आसखेड धरणग्रस्तांचे सर्व प्रश्न मार्गी लागल्याशिवाय जॅकवेलमधून पाणी उचलणार नाही, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी भामा आसखेड धरणग्रस्तांच्या बैठकीत धरणग्रस्तांना रविवारी आश्वासन दिले.भामा आसखेड धरणग्रस्तांचे पुनर्वसन व त्यांना द्यावयाचे विशेष पॅकेज हे प्रश्न तातडीने सोडविण्याच्या मागण्यांसाठी आमदार सुरेश गोरे यांच्या पुढाकाराने भामा आसखेड विश्रामगृहावर धरणग्रस्त, संबंधित खात्याचे मंत्री व अधिकारी यांची बापट यांच्या अध्यक्षतेखाली बैैठक झाली. याप्रसंगी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, पुनर्वसन राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार सुरेश गोरे, महेश लांडगे, महापौर मुक्ता टिळक, प्रभारी जिल्हाधिकारी रमेश काळे, पुणे महानगरपालिका आयुक्त कुणाल कुमार, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त पी. जी. वाघमारे, प्रांतधिकारी सुनील गाढे, तहसीलदार सुनील जोशी, जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, शरद बुट्टे-पाटील, अधीक्षक अभियंता अतुल कपोल, कार्यकारी अभियंता व्ही. एन. जाधव, उपविभागीय अधिकारी सर्जेराव मेमाणे आदी मान्यवर व धरणग्रस्त उपस्थित होते.भामा आसखेडमाधील १३०३ शेतकऱ्यांना अगोदर न्याय मिळाला पाहिजे. ६ गावांचे खास बाब पुनर्वसन झाले पाहिजे, या प्रमुख मागण्यांसह ११२ खातेदारांना जमिनीचा ताबा, ३८८ खातेदारांना न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे जमिनी, तालुक्यातील बंधारे भरण्याव्यतिरिक्त पाणी सोडू नये, कॅनॉलसाठी घेतलेल्या जमिनीचे शिक्के काढावे, या मागण्या आमदार सुरेश गोरे, जिल्हा नियोजन समिती सदस्य व जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, शरद बुट्टे पाटील, एल. बी. तनपुरे, चांगदेव शिवेकर, सत्यवान नवले, दत्ता होले, देविदास बांदल यांनी धरणग्रस्तांच्या वतीने या वेळी केल्या.यावर पालकमंत्री गिरीश बापट यांनी, धरणग्रस्तांवर अन्याय झाला, हे मान्य आहे. पण सर्व प्रश्न आता आंदोलनाने सुटणार नाहीत. शासन मदतीचा हात देत असताना आपण पुणे व पिंपरी महानगरपालिकेच्या जलवाहिनीला विरोध करू नये, असे आवाहन केले. या वेळी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी धरणग्रस्तांना होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन राज्यात ३५०० बुडित बंधाऱ्याची मागणी असताना येथे सर्वप्रथम १४ बुडित बंधाऱ्यांना मान्यता दिली आहे. यासाठी ७० लाख रुपयांची तरतूदही केली आहे. जलवाहिनीचे व धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचे काम एकाच वेळी गुंजवणी धरणग्रस्तांप्रमाणे सोडविण्यात येर्ईल, असे सांगितले. पुनर्वसन राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी राज्य सरकारची पुनर्वसनासाठी भूमिका सकारात्मक असून ९५ टक्के प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहेत. ज्या दिवशी प्रश्न सुटेल त्या दिवशी लाभक्षेत्रातील शिक्के काढले जातील, असे सांगितले. (वार्ताहर)